शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

कर्नाटकात 'हे' नेते ठरले काँग्रेससाठी 'गेमचेंजर', बघा कशी आखली रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 09:11 IST

गेमचेंजर रणनितीची इनसाईड स्टोरी

बंगळुरु: येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं भाजपाचं सरकार कोसळलं आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठता न आल्यानं बहुमत चाचणी होण्याआधीच येडियुरप्पा यांनी राजीनाम्याची घोषणा केली. आधी भाजपानं काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. मात्र ही जुळवाजुळव होऊ न शकल्यानं येडियुरप्पा मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले. त्यामुळे आता राज्यपाल काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतील. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या या सत्ता संघर्षात काही काँग्रेस नेत्यांनी निर्णायक आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडली. गुलाम नबी आझाद: काँग्रेसचे महासचिव असलेल्या आझाद यांनी निवडणुकीच्या निकालाआधीच बंगळुरु गाठलं. निकालानंतर त्यांनी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करुन रणनिती आखली. जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याची कल्पना आझाद यांची होती. देवेगौडा यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांनी सीपीएमच्या सीताराम येचुरी, केरळमधील सीपीएमचे नेते पी. विजयन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासोबतही संवाद साधला. यानंतर देवेगौडा यांनी काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारला.

अशोक गेहलोत: राजस्थानचे माजी मुख्यमंत्री असलेले गेहलोत सध्या काँग्रेसचे महासचिव आहेत. जेडीएस आणि अपक्ष आमदारांना एकत्र आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपाकडून फोडाफोडीचा प्रयत्न होणार, हे लक्षात घेऊन त्यांनी रणनिती आखली. गेहलोत पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीची माहिती राहुल यांना दिली जात होती. 

मल्लिकार्जुन खरगे: लोकसभेतील काँग्रेसचे नेते असलेल्या खरगे यांनी अशोक गेहलोत यांच्यासोबत मिळून रणनिती आखली. याशिवाय रणनितीची अंमलबजावणी होईल, याची खबरदारीही घेतली. भाजपाकडून आमदारांना पैशांची ऑफर दिली जाईल, याचा अंदाज घेऊन त्यांनी पुढील खबरदारी घेतली. आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी खरगे यांनी पार पाडली. 

सिद्धारमय्या: काँग्रेसला बहुमत न मिळाल्यानं मुख्यमंत्रीपद गमावलेल्या सिद्धरामय्या यांनी निवडणुकीनंतर भाजपाला सत्तेपासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका पार पडली. रणनिती आखण्यात कुशल असलेल्या सिद्धरामय्यांनी भाजपाच्या चाणक्यांची प्रत्येक खेळी हाणून पार पडली. भाजपानं काँग्रेस आणि जेडीएसच्या ज्या ज्या आमदारांशी संपर्क साधला, त्या त्या आमदारांनी निष्ठा बदलू नये, याची काळजी त्यांनी घेतली. काँग्रेसच्या आमदारांसोबतच जेडीएसच्या आमदारांनाही एकत्र ठेवण्याचे शिवधनुष्य त्यांनी यशस्वीपणे पेललं.

अभिषेक मनू सिंघवी: काँग्रेस नेते सिंघवी यांनी कपिल सिब्बल यांच्या मदतीनं दिल्लीत किल्ला लढवला. राज्यपालांचा कौल भाजपाच्या बाजूनं गेल्यावर सिंघवी यांनी एकही क्षण न गमावता रात्रीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राज्यपालांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. सिंघवी यांच्या न्यायालयातील युक्तीवादामुळे हा कालावधी थेट दीड दिवसावर आला. माजी महाधिवक्ते मुकूल रोहतगी भाजपाच्या बाजूनं युक्तिवाद करत असताना सिंघवी यांनी काँग्रेसची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यामुळेच भाजपाला आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी फक्त दीड दिवसांचा अवधी मिळाला.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Floor Testबहुमत चाचणीsiddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेसYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपा