शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

कर्नाटकात 'हे' नेते ठरले काँग्रेससाठी 'गेमचेंजर', बघा कशी आखली रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 09:11 IST

गेमचेंजर रणनितीची इनसाईड स्टोरी

बंगळुरु: येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं भाजपाचं सरकार कोसळलं आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठता न आल्यानं बहुमत चाचणी होण्याआधीच येडियुरप्पा यांनी राजीनाम्याची घोषणा केली. आधी भाजपानं काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. मात्र ही जुळवाजुळव होऊ न शकल्यानं येडियुरप्पा मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले. त्यामुळे आता राज्यपाल काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतील. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या या सत्ता संघर्षात काही काँग्रेस नेत्यांनी निर्णायक आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडली. गुलाम नबी आझाद: काँग्रेसचे महासचिव असलेल्या आझाद यांनी निवडणुकीच्या निकालाआधीच बंगळुरु गाठलं. निकालानंतर त्यांनी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करुन रणनिती आखली. जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याची कल्पना आझाद यांची होती. देवेगौडा यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांनी सीपीएमच्या सीताराम येचुरी, केरळमधील सीपीएमचे नेते पी. विजयन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासोबतही संवाद साधला. यानंतर देवेगौडा यांनी काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारला.

अशोक गेहलोत: राजस्थानचे माजी मुख्यमंत्री असलेले गेहलोत सध्या काँग्रेसचे महासचिव आहेत. जेडीएस आणि अपक्ष आमदारांना एकत्र आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपाकडून फोडाफोडीचा प्रयत्न होणार, हे लक्षात घेऊन त्यांनी रणनिती आखली. गेहलोत पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीची माहिती राहुल यांना दिली जात होती. 

मल्लिकार्जुन खरगे: लोकसभेतील काँग्रेसचे नेते असलेल्या खरगे यांनी अशोक गेहलोत यांच्यासोबत मिळून रणनिती आखली. याशिवाय रणनितीची अंमलबजावणी होईल, याची खबरदारीही घेतली. भाजपाकडून आमदारांना पैशांची ऑफर दिली जाईल, याचा अंदाज घेऊन त्यांनी पुढील खबरदारी घेतली. आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी खरगे यांनी पार पाडली. 

सिद्धारमय्या: काँग्रेसला बहुमत न मिळाल्यानं मुख्यमंत्रीपद गमावलेल्या सिद्धरामय्या यांनी निवडणुकीनंतर भाजपाला सत्तेपासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका पार पडली. रणनिती आखण्यात कुशल असलेल्या सिद्धरामय्यांनी भाजपाच्या चाणक्यांची प्रत्येक खेळी हाणून पार पडली. भाजपानं काँग्रेस आणि जेडीएसच्या ज्या ज्या आमदारांशी संपर्क साधला, त्या त्या आमदारांनी निष्ठा बदलू नये, याची काळजी त्यांनी घेतली. काँग्रेसच्या आमदारांसोबतच जेडीएसच्या आमदारांनाही एकत्र ठेवण्याचे शिवधनुष्य त्यांनी यशस्वीपणे पेललं.

अभिषेक मनू सिंघवी: काँग्रेस नेते सिंघवी यांनी कपिल सिब्बल यांच्या मदतीनं दिल्लीत किल्ला लढवला. राज्यपालांचा कौल भाजपाच्या बाजूनं गेल्यावर सिंघवी यांनी एकही क्षण न गमावता रात्रीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राज्यपालांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. सिंघवी यांच्या न्यायालयातील युक्तीवादामुळे हा कालावधी थेट दीड दिवसावर आला. माजी महाधिवक्ते मुकूल रोहतगी भाजपाच्या बाजूनं युक्तिवाद करत असताना सिंघवी यांनी काँग्रेसची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यामुळेच भाजपाला आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी फक्त दीड दिवसांचा अवधी मिळाला.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Floor Testबहुमत चाचणीsiddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेसYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपा