शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कर्नाटकात 'हे' नेते ठरले काँग्रेससाठी 'गेमचेंजर', बघा कशी आखली रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 09:11 IST

गेमचेंजर रणनितीची इनसाईड स्टोरी

बंगळुरु: येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं भाजपाचं सरकार कोसळलं आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठता न आल्यानं बहुमत चाचणी होण्याआधीच येडियुरप्पा यांनी राजीनाम्याची घोषणा केली. आधी भाजपानं काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. मात्र ही जुळवाजुळव होऊ न शकल्यानं येडियुरप्पा मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले. त्यामुळे आता राज्यपाल काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतील. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या या सत्ता संघर्षात काही काँग्रेस नेत्यांनी निर्णायक आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडली. गुलाम नबी आझाद: काँग्रेसचे महासचिव असलेल्या आझाद यांनी निवडणुकीच्या निकालाआधीच बंगळुरु गाठलं. निकालानंतर त्यांनी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करुन रणनिती आखली. जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याची कल्पना आझाद यांची होती. देवेगौडा यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांनी सीपीएमच्या सीताराम येचुरी, केरळमधील सीपीएमचे नेते पी. विजयन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासोबतही संवाद साधला. यानंतर देवेगौडा यांनी काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारला.

अशोक गेहलोत: राजस्थानचे माजी मुख्यमंत्री असलेले गेहलोत सध्या काँग्रेसचे महासचिव आहेत. जेडीएस आणि अपक्ष आमदारांना एकत्र आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपाकडून फोडाफोडीचा प्रयत्न होणार, हे लक्षात घेऊन त्यांनी रणनिती आखली. गेहलोत पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीची माहिती राहुल यांना दिली जात होती. 

मल्लिकार्जुन खरगे: लोकसभेतील काँग्रेसचे नेते असलेल्या खरगे यांनी अशोक गेहलोत यांच्यासोबत मिळून रणनिती आखली. याशिवाय रणनितीची अंमलबजावणी होईल, याची खबरदारीही घेतली. भाजपाकडून आमदारांना पैशांची ऑफर दिली जाईल, याचा अंदाज घेऊन त्यांनी पुढील खबरदारी घेतली. आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी खरगे यांनी पार पाडली. 

सिद्धारमय्या: काँग्रेसला बहुमत न मिळाल्यानं मुख्यमंत्रीपद गमावलेल्या सिद्धरामय्या यांनी निवडणुकीनंतर भाजपाला सत्तेपासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका पार पडली. रणनिती आखण्यात कुशल असलेल्या सिद्धरामय्यांनी भाजपाच्या चाणक्यांची प्रत्येक खेळी हाणून पार पडली. भाजपानं काँग्रेस आणि जेडीएसच्या ज्या ज्या आमदारांशी संपर्क साधला, त्या त्या आमदारांनी निष्ठा बदलू नये, याची काळजी त्यांनी घेतली. काँग्रेसच्या आमदारांसोबतच जेडीएसच्या आमदारांनाही एकत्र ठेवण्याचे शिवधनुष्य त्यांनी यशस्वीपणे पेललं.

अभिषेक मनू सिंघवी: काँग्रेस नेते सिंघवी यांनी कपिल सिब्बल यांच्या मदतीनं दिल्लीत किल्ला लढवला. राज्यपालांचा कौल भाजपाच्या बाजूनं गेल्यावर सिंघवी यांनी एकही क्षण न गमावता रात्रीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राज्यपालांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. सिंघवी यांच्या न्यायालयातील युक्तीवादामुळे हा कालावधी थेट दीड दिवसावर आला. माजी महाधिवक्ते मुकूल रोहतगी भाजपाच्या बाजूनं युक्तिवाद करत असताना सिंघवी यांनी काँग्रेसची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यामुळेच भाजपाला आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी फक्त दीड दिवसांचा अवधी मिळाला.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Floor Testबहुमत चाचणीsiddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेसYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपा