शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात 'हे' नेते ठरले काँग्रेससाठी 'गेमचेंजर', बघा कशी आखली रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 09:11 IST

गेमचेंजर रणनितीची इनसाईड स्टोरी

बंगळुरु: येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं भाजपाचं सरकार कोसळलं आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठता न आल्यानं बहुमत चाचणी होण्याआधीच येडियुरप्पा यांनी राजीनाम्याची घोषणा केली. आधी भाजपानं काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. मात्र ही जुळवाजुळव होऊ न शकल्यानं येडियुरप्पा मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले. त्यामुळे आता राज्यपाल काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतील. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या या सत्ता संघर्षात काही काँग्रेस नेत्यांनी निर्णायक आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडली. गुलाम नबी आझाद: काँग्रेसचे महासचिव असलेल्या आझाद यांनी निवडणुकीच्या निकालाआधीच बंगळुरु गाठलं. निकालानंतर त्यांनी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करुन रणनिती आखली. जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याची कल्पना आझाद यांची होती. देवेगौडा यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांनी सीपीएमच्या सीताराम येचुरी, केरळमधील सीपीएमचे नेते पी. विजयन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासोबतही संवाद साधला. यानंतर देवेगौडा यांनी काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारला.

अशोक गेहलोत: राजस्थानचे माजी मुख्यमंत्री असलेले गेहलोत सध्या काँग्रेसचे महासचिव आहेत. जेडीएस आणि अपक्ष आमदारांना एकत्र आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपाकडून फोडाफोडीचा प्रयत्न होणार, हे लक्षात घेऊन त्यांनी रणनिती आखली. गेहलोत पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीची माहिती राहुल यांना दिली जात होती. 

मल्लिकार्जुन खरगे: लोकसभेतील काँग्रेसचे नेते असलेल्या खरगे यांनी अशोक गेहलोत यांच्यासोबत मिळून रणनिती आखली. याशिवाय रणनितीची अंमलबजावणी होईल, याची खबरदारीही घेतली. भाजपाकडून आमदारांना पैशांची ऑफर दिली जाईल, याचा अंदाज घेऊन त्यांनी पुढील खबरदारी घेतली. आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी खरगे यांनी पार पाडली. 

सिद्धारमय्या: काँग्रेसला बहुमत न मिळाल्यानं मुख्यमंत्रीपद गमावलेल्या सिद्धरामय्या यांनी निवडणुकीनंतर भाजपाला सत्तेपासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका पार पडली. रणनिती आखण्यात कुशल असलेल्या सिद्धरामय्यांनी भाजपाच्या चाणक्यांची प्रत्येक खेळी हाणून पार पडली. भाजपानं काँग्रेस आणि जेडीएसच्या ज्या ज्या आमदारांशी संपर्क साधला, त्या त्या आमदारांनी निष्ठा बदलू नये, याची काळजी त्यांनी घेतली. काँग्रेसच्या आमदारांसोबतच जेडीएसच्या आमदारांनाही एकत्र ठेवण्याचे शिवधनुष्य त्यांनी यशस्वीपणे पेललं.

अभिषेक मनू सिंघवी: काँग्रेस नेते सिंघवी यांनी कपिल सिब्बल यांच्या मदतीनं दिल्लीत किल्ला लढवला. राज्यपालांचा कौल भाजपाच्या बाजूनं गेल्यावर सिंघवी यांनी एकही क्षण न गमावता रात्रीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राज्यपालांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. सिंघवी यांच्या न्यायालयातील युक्तीवादामुळे हा कालावधी थेट दीड दिवसावर आला. माजी महाधिवक्ते मुकूल रोहतगी भाजपाच्या बाजूनं युक्तिवाद करत असताना सिंघवी यांनी काँग्रेसची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यामुळेच भाजपाला आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी फक्त दीड दिवसांचा अवधी मिळाला.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Floor Testबहुमत चाचणीsiddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेसYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपा