शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लिंगायतांना बाजूला केले, भाजपने राज्य गमावले; येदियुरप्पा, शेट्टर, सवदींचे खच्चीकरण पडले महागात

By श्रीनिवास नागे | Updated: May 14, 2023 07:48 IST

लिंगायतांची लोकसंख्या १७ टक्के असून, १४ जिल्ह्यांत त्यांचा प्रभाव आहे.

बंगळुरु : माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा आणि जगदीश शेट्टर, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी या लिंगायत समाजाच्या ‘पॉवरफुल’ नेत्यांना बाजूला करणे भाजपला भोवले. स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता देण्याचा प्रस्ताव फेटाळण्याच्या  भूमिकेचाही फटका बसल्याचे दिसते. 

लिंगायतांची लोकसंख्या १७ टक्के असून, १४ जिल्ह्यांत त्यांचा प्रभाव आहे. भाजपने येदियुरप्पा आणि शेट्टर यांना वयाचे कारण देत बाजूला केले होते. पण, येदियुरप्पा सोबत नसतील तर लिंगायत मते काँग्रेसकडे वळू शकतात, याची जाणीव झाल्याने भाजपने नंतर त्यांना काही जबाबदारी दिली. परंतु त्यांचे खच्चीकरण स्पष्ट दिसून आले. तिकीट नाकारल्याने शेट्टर व सवदी काँग्रेसमध्ये गेले. भाजपने मुस्लिमांचे चार टक्के ओबीसी आरक्षण रद्द करून लिंगायत व वक्कलिगांना विभागून दिले. पण, स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता देण्याऐवजी भाजपने हिंदुत्वावर भर दिला. लिंगायतांऐवजी सगळे हिंदू एकत्र करून राजकारण करू, अशी जाहीर भूमिका घेतली. परिणामी, लिंगायत समाजाची नाराजी वाढली.

मुस्लिमांचे ध्रुवीकरण, काँग्रेसला फायदामुस्लीम समाजाचे चार टक्के ओबीसी आरक्षण रद्द करणे, सरकार पुन्हा आल्यास राज्यात कट्टर हिंदुत्वाचे ‘योगी मॉडेल’ राबविण्याची घोषणा यामुळे १३ टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लिमांत भाजपबद्दलचा रोष वाढत गेला. बजरंग दलावरील बंदीचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरल्यानंतर भाजपने बजरंग दलाचे जोरदार समर्थन केले, त्यामुळे मुस्लीम मतांचे आपोआपच ध्रुवीकरण झाले. जनता दलाकडे जाणारी मुस्लीम मतेही काँग्रेसच्याच पारड्यात पडली. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपा