शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

"कर्नाटक म्हणजे लोकसभा नाही, हुरळून जाऊ नका!" शशी थरुर यांचा काँग्रेसला सल्लावजा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 08:20 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला. परंतु आता यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आपल्या पक्षाला हुरळून न जाण्याचा सल्ला दिलाय.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला. परंतु आता यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आपल्या पक्षाला हुरळून न जाण्याचा सल्ला दिलाय. राज्य आणि लोकसभेदरम्यान मतदार आपले विचार बदलू शकतात, त्यामुळे हुरळून जाऊ नये, असं शशी थरुर म्हणाले. यासाठी त्यांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या वेळी काँग्रेसच्या विजयानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीचा दाखला दिला.

"२०१८ मध्ये आम्ही केवळ कर्नाटकातच नाही, तर राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशातही विजय मिळवला होता. यानंतरही जेव्हा लोकसभेच्या निवडणुका आल्या तेव्हा त्या त्या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचं आमचा पराभव केला. कर्नाटकात केवळ एकच जागा मिळाली होती," असं थरुर म्हणाले. शशी थरूर यांनी नुकत्याच झालेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या वॅलाडोलिड एडिशनच्या निमित्ताने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना यावर भाष्य केलं.

"लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये असलेल्या काही महिन्यांत मतदार आपले विचार बदलू शकतात. त्यामुळे आपण आत्मसंतुष्ट राहू नये," असं ते म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २२४ पैकी १३५ जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला केवळ ६६ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मजबूत आणि प्रभावी स्थानिक नेतृत्वामुळे, तसंच स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिल्यानं कर्नाटकात विजय मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

स्थानिक नेत्यांचं नेतृत्व"काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हेदेखील कर्नाटकातील आहेत. राहुल आणि प्रियांका गांधीदेखील या ठिकाणी प्रचारासाठी पोहोचले होते. परंतु स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं हे महत्त्वाचं आहे. स्थानिक मुद्दे , आर्थिक मुद्दे, बंगळुरूतील पायाभूत सुविधांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता," असं थरुर यांनी स्पष्ट केलं.

म्हणून भाजपचा पराभव"भाजपचा निवडणूक प्रचार केंद्राने चालवला होता. भाजप स्थानिक पातळीवर कमकुवत आहे. लोकांना माहीत होतं की, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह कर्नाटकात सरकार चालवायला येणार नाहीत. लोकांना बदल हवा होता," असंही त्यांनी नमूद केलं. "मतभेद स्वाभाविक आहेत. राजकारणात लोकांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा असणं स्वाभाविक आहे. ते पक्षाच्या विचारधारेशी आणि पक्षाच्या एकूण अजेंडासाठी वचनबद्ध असू शकतात. तो अजेंडा पुढे चालवण्यासाठी आपण अधिक योग्य आहोत असं प्रत्येक व्यक्तीला वाटू शकतं," असं थरुर म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूरKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकlok sabhaलोकसभा