शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

"कर्नाटक म्हणजे लोकसभा नाही, हुरळून जाऊ नका!" शशी थरुर यांचा काँग्रेसला सल्लावजा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 08:20 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला. परंतु आता यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आपल्या पक्षाला हुरळून न जाण्याचा सल्ला दिलाय.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला. परंतु आता यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आपल्या पक्षाला हुरळून न जाण्याचा सल्ला दिलाय. राज्य आणि लोकसभेदरम्यान मतदार आपले विचार बदलू शकतात, त्यामुळे हुरळून जाऊ नये, असं शशी थरुर म्हणाले. यासाठी त्यांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या वेळी काँग्रेसच्या विजयानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीचा दाखला दिला.

"२०१८ मध्ये आम्ही केवळ कर्नाटकातच नाही, तर राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशातही विजय मिळवला होता. यानंतरही जेव्हा लोकसभेच्या निवडणुका आल्या तेव्हा त्या त्या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचं आमचा पराभव केला. कर्नाटकात केवळ एकच जागा मिळाली होती," असं थरुर म्हणाले. शशी थरूर यांनी नुकत्याच झालेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या वॅलाडोलिड एडिशनच्या निमित्ताने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना यावर भाष्य केलं.

"लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये असलेल्या काही महिन्यांत मतदार आपले विचार बदलू शकतात. त्यामुळे आपण आत्मसंतुष्ट राहू नये," असं ते म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २२४ पैकी १३५ जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला केवळ ६६ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मजबूत आणि प्रभावी स्थानिक नेतृत्वामुळे, तसंच स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिल्यानं कर्नाटकात विजय मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

स्थानिक नेत्यांचं नेतृत्व"काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हेदेखील कर्नाटकातील आहेत. राहुल आणि प्रियांका गांधीदेखील या ठिकाणी प्रचारासाठी पोहोचले होते. परंतु स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं हे महत्त्वाचं आहे. स्थानिक मुद्दे , आर्थिक मुद्दे, बंगळुरूतील पायाभूत सुविधांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता," असं थरुर यांनी स्पष्ट केलं.

म्हणून भाजपचा पराभव"भाजपचा निवडणूक प्रचार केंद्राने चालवला होता. भाजप स्थानिक पातळीवर कमकुवत आहे. लोकांना माहीत होतं की, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह कर्नाटकात सरकार चालवायला येणार नाहीत. लोकांना बदल हवा होता," असंही त्यांनी नमूद केलं. "मतभेद स्वाभाविक आहेत. राजकारणात लोकांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा असणं स्वाभाविक आहे. ते पक्षाच्या विचारधारेशी आणि पक्षाच्या एकूण अजेंडासाठी वचनबद्ध असू शकतात. तो अजेंडा पुढे चालवण्यासाठी आपण अधिक योग्य आहोत असं प्रत्येक व्यक्तीला वाटू शकतं," असं थरुर म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूरKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकlok sabhaलोकसभा