शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

Karnataka Election: एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला आघाडी, पण हे दोन टप्पे ठरवणार कर्नाटकमधील विजेता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 10:20 IST

Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीला दोन टप्प्यांमध्ये विभाजित करता येऊ शकेल. एका टप्प्यामध्ये काँग्रेस आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये भाजपाचं वर्चस्व दिसून आलं.  

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी बुधवारी मतदान झाले आहे. या मतदानानंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमधून काँग्रेसला आघाडी मिळत असल्याचा अंदाज वर्तवला आहे.  मात्र १३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीमधूनच अंतिम निकाल स्पष्ट होणार आहे. त्यातूनच काँग्रेस २६ एप्रिलपर्यंत राखलेल्या आपल्या गतीमधून सत्ता मिळवण्यात यशस्वी होणार की, शेवटच्या पंधरवड्यात राबवलेल्या आक्रमक अभियानामधून जनतेला आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाला आहे, हे स्पष्ट होईल.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीला दोन टप्प्यांमध्ये विभाजित करता येऊ शकेल. एका टप्प्यामध्ये काँग्रेस आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये भाजपाचं वर्चस्व दिसून आलं.  या निवडणुकीतील पहिला टप्पा हा २६ एप्रिल पूर्वीपर्यंतचा होता. तेव्हा काँग्रेसजवळ स्पष्टपणे स्थानिक अभियानाच्या आधारावर आघाडी होती. भाजपाविरोधात काँग्रेसने ४० टक्के कमिशन चार्ज आणि जनतेला दिलेल्या पाच हमींवर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यासाठी पक्षाकडून घरोघरी जाऊन मतदारांना माहिती देण्यात आली होती. त्यात महिला आणि बेरोजगारांना रोख मदत, २०० युनिट मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाला १० किलो तांदूळ आणि महिलांना मोफत बस प्रवास यांचं आश्वासन देण्यात आलं होतं.

तर या निवडणुकीतील दुसरा टप्पा हा गेल्या आठवड्यामधील होता. जिथे काँग्रेसकडून झालेल्या तीन चुका भाजपाच्या पथ्थ्यावर पडल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभा आणि रोड शोमुळ भाजपाने प्रचारात कमबॅक केले. तसेच काँग्रेसने मिळवलेल्या आघाडीवर मात करण्याचाही प्रयत्न केला. 

प्रचारादरम्यान, काँग्रेसने पहिला सेल्फ गोल २७ एप्रिल रोजी केला. तेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख विषारी साप असा केला होता. तर २ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये बजरंग दलावर निर्बंध घालण्याचं आश्वासन देऊन काँग्रेसने दुसरी चूक केली. तर ७ मे रोजी सोनिया गांधी यांना सार्वभौमत्वाबाबतच्या विधानासाठी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जबाबदार ठरवण्यात आलं. प्रत्यक्षात सोनिया गांधी यांनी हे विधान केलंच नव्हतं.

कर्नाटकमधील सर्व प्रचार मोहिमेमध्ये काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत थेट संघर्ष टाळून प्रचार स्थानिक पातळीवर केंद्रीत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भाजपाचा डबल इंजिनच्या विकास मॉडेलच्या माध्यमातून निवडणुकीचा अजेंडा राष्ट्रीय बनवण्याचा प्रयत्न होता. मात्र गेल्या १४ दिवसांमध्ये भाजपाने काँग्रेसने केलेल्या चुकांचा पुरेपूर फायदा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार मोहिमेमधून भाजपाला योग्य मार्गावर आणलं. 

२७ एप्रिल रोजी आपल्या विषारी साप या टिप्पणीसाठी मल्लिकार्जुन खर्गे यांनी खेद व्यक्त केला होता. तर बजरंग दलावरील बंदीच्या आश्वासनाचा संबंध बजरंगबलीशी जोडून भाजपाने अखेरच्या टप्पात हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला. त्यानंतर मोदींचे रोड शो आणि सार्वभौमत्वाबाबतच्या सोनिया गांधी यांच्या टिप्पणीवर भाजपाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे नेते, कार्यकर्त्यांना उत्साहित केले.

शेवटच्या दोन आठवड्यात काँग्रेसने केलेल्या तथाकथित चुका अंतिम निकालांमध्ये काँग्रेसला महागात पडू शकतात, असा भाजपाचा दावा आहे. तर मतदारांनी आपलं मत आधीच बनवलं आहे, या प्रश्नाचं उत्तर १३ मे रोजी येणाऱ्या निकालांमधून मिळेल. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा