शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

Karnataka Election 2018 : मतदार केंद्रांवर गोंधळ, पोलिग एजंट रद्द केल्याने वाद, उपाशी कर्मचारीही चिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 12:27 IST

कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काही मतदान केंद्रांवर गोंधळ झाला. तसेच आदल्या दिवशी निवडणूक ड्युटीवरील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची सोय न करण्यात आल्याने त्यांनीही संताप व्यक्त केला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु होण्यापूर्वी आणि मतदानाच्यावेळीही काही मतदानकेंद्रांवर गोंधळ झाला. निवडणूक ड्युटीवर नेमण्यात आलेल्या सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी अन्न-पाण्याची सोय करण्यात आलेली नसल्याने त्यांचा संताप उफळून आला. तर मतदान सुरु झाल्यावर पोलिंग एजंट हे त्याच बुधमधील मतदार असणे आवश्यक असल्याचा नियम सांगण्यात आल्याने काही ठिकाणी बाचाबाचीही झाली. 

बेळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. राज्यात इतरत्रही तसेच चित्र आहे. त्यामुळे अकरापर्यंतच मतदानाची टक्केवारी २४ टक्क्यांवर पोहचली. आज मतदानाची वेळ एकतासाने वाढवली असल्याने टक्केवारी चांगली वाढण्याची शक्यता आहे. मात्र सकाळी मतदान सुरु झाल्यावर काही मतदानकेंद्रांवर गोंधळ झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानकेंद्रांवरील राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे पोलिंग एजंट हे त्याच केंद्रातील मतदार असावेत असा नियम सांगितल्याने वाद निर्माण झाला. अनेक उमेदवारांसाठी ऐनवेळी प्रभाव नसलेल्या ठिकाणी पोलिंग एजंट मिळवणे कठिण होते. मात्र या गोंधळाची सुरुवात शुक्रवारपासूनच झाली. मतदानयंत्रे, व्हीव्हीपॅट युनिट आणि इतर साहित्य घेऊन मतदान केंद्रावर निघालेल्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी काहीच व्यवस्था नव्हती. काही ठिकाणी या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्थाच केलेली नव्हती, त्यामुळे त्यांच्यात नाराजी निर्माण झाली. हुबळीसारख्या ठिकाणी तर घोषणाही देण्यात आल्या. दुपारनंतरही भोजनाची व्यवस्था न झाल्याने अनेकांना त्रास झाल्याच्याही तक्रारी आल्या. “आमच्यापैकी बहुतेक चाळीशी ओलांडलेले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना हायपरटेन्शन, ह्रदयविकार, मधुमेह असे त्रास आहेत. त्यामुळे त्यांना वेळेवर जेवण तसेच पाणी मिळणे आवश्यक होते. मात्र त्याची व्यवस्था केली नव्हती. आम्ही काही भिकारी नाही, असे वागवायला...” अशा संतप्त प्रतिक्रिया निवडणूक ड्युटीवरील कर्मचारी व्यक्त करीत होते. 

काही ठिकाणी भोजन-पाण्याची व्यवस्था होती. मात्र मतदान ड्युटीवरील कर्मचाऱ्यांच्या संख्येचा अंदाज न घेता केली गेल्याने ती व्यवस्था पुरेशी नव्हती. विजयपुरात कर्मचाऱ्यांना साहित्य वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचे निधन झाले. ते मतदान यंत्र देत असताना त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू ओढवला. याच भागात कर्मचारी आणि साहित्य पाठवण्यासाठीच्या गाड्यांमध्ये इंधन भरलेले नसल्याने त्या निघू शकल्या नव्हत्या. त्यामुळे उशीर झाला. त्याची गंभीर दखल घेत तीन अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावcongressकाँग्रेसBJPभाजपाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)