शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

Karnataka Election 2018 : मतदार केंद्रांवर गोंधळ, पोलिग एजंट रद्द केल्याने वाद, उपाशी कर्मचारीही चिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 12:27 IST

कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काही मतदान केंद्रांवर गोंधळ झाला. तसेच आदल्या दिवशी निवडणूक ड्युटीवरील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची सोय न करण्यात आल्याने त्यांनीही संताप व्यक्त केला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु होण्यापूर्वी आणि मतदानाच्यावेळीही काही मतदानकेंद्रांवर गोंधळ झाला. निवडणूक ड्युटीवर नेमण्यात आलेल्या सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी अन्न-पाण्याची सोय करण्यात आलेली नसल्याने त्यांचा संताप उफळून आला. तर मतदान सुरु झाल्यावर पोलिंग एजंट हे त्याच बुधमधील मतदार असणे आवश्यक असल्याचा नियम सांगण्यात आल्याने काही ठिकाणी बाचाबाचीही झाली. 

बेळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. राज्यात इतरत्रही तसेच चित्र आहे. त्यामुळे अकरापर्यंतच मतदानाची टक्केवारी २४ टक्क्यांवर पोहचली. आज मतदानाची वेळ एकतासाने वाढवली असल्याने टक्केवारी चांगली वाढण्याची शक्यता आहे. मात्र सकाळी मतदान सुरु झाल्यावर काही मतदानकेंद्रांवर गोंधळ झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानकेंद्रांवरील राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे पोलिंग एजंट हे त्याच केंद्रातील मतदार असावेत असा नियम सांगितल्याने वाद निर्माण झाला. अनेक उमेदवारांसाठी ऐनवेळी प्रभाव नसलेल्या ठिकाणी पोलिंग एजंट मिळवणे कठिण होते. मात्र या गोंधळाची सुरुवात शुक्रवारपासूनच झाली. मतदानयंत्रे, व्हीव्हीपॅट युनिट आणि इतर साहित्य घेऊन मतदान केंद्रावर निघालेल्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी काहीच व्यवस्था नव्हती. काही ठिकाणी या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्थाच केलेली नव्हती, त्यामुळे त्यांच्यात नाराजी निर्माण झाली. हुबळीसारख्या ठिकाणी तर घोषणाही देण्यात आल्या. दुपारनंतरही भोजनाची व्यवस्था न झाल्याने अनेकांना त्रास झाल्याच्याही तक्रारी आल्या. “आमच्यापैकी बहुतेक चाळीशी ओलांडलेले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना हायपरटेन्शन, ह्रदयविकार, मधुमेह असे त्रास आहेत. त्यामुळे त्यांना वेळेवर जेवण तसेच पाणी मिळणे आवश्यक होते. मात्र त्याची व्यवस्था केली नव्हती. आम्ही काही भिकारी नाही, असे वागवायला...” अशा संतप्त प्रतिक्रिया निवडणूक ड्युटीवरील कर्मचारी व्यक्त करीत होते. 

काही ठिकाणी भोजन-पाण्याची व्यवस्था होती. मात्र मतदान ड्युटीवरील कर्मचाऱ्यांच्या संख्येचा अंदाज न घेता केली गेल्याने ती व्यवस्था पुरेशी नव्हती. विजयपुरात कर्मचाऱ्यांना साहित्य वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचे निधन झाले. ते मतदान यंत्र देत असताना त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू ओढवला. याच भागात कर्मचारी आणि साहित्य पाठवण्यासाठीच्या गाड्यांमध्ये इंधन भरलेले नसल्याने त्या निघू शकल्या नव्हत्या. त्यामुळे उशीर झाला. त्याची गंभीर दखल घेत तीन अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावcongressकाँग्रेसBJPभाजपाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)