शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, महाराष्ट्रातील नेत्यांना कुत्र्यांची उपमा दिली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 19:34 IST

बेळगाव येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर जोरदार टीका केली.  

बेळगाव - कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणावरून महाराष्ट्रातील नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांना प्रत्युत्तर देताना लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना कुत्र्यांची उपमा दिली आहे. कुत्रे भुंकतात म्हणून आपणही त्यांना चावायचे का? सीमाप्रश्न हा कधीच संपला असून, आता बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे, असे विधान सवदी यांनी यांनी केले. बेळगाव येथे आयोजित एका कार्यक्रमाला लक्ष्मण सवदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर जोरदार टीका केली.  तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विवेकबुद्धीने विधाने करावीत, असा सल्लाही दिला. यादरम्यान, चंदगडच्या आमदारांनी केलेल्या विधानांबाबत विचारले असता सवदी यांनी कुत्रे भुंकतात म्हणून आपणही त्यांना चावायचे का? कुणी काही बोलले तरी त्याबाबत फारसा विचारक करण्याची गरज नाही, असे विधान केले.  कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी उधळलेल्या या मुक्ताफळांमुळे सीमाभागात मराठी आणि कानडी भाषिकांमधील वाद अधिकच उफाळण्याची शक्यता आहे.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी कानडी भाषकांची संघटना असलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषकांविरोधात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती, मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सीमेवर उभे करून गोळ्या झाडल्या पाहिजेत, असे विधान त्यांनी केले होते. मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन आता 60 वर्षे पूर्ण होत आली असली तरी कन्नड भाषिक कर्नाटकमध्ये समाविष्ट झालेले बेळगाव, निपाणी, कारवार हे मराठी भाषिक प्रदेश अद्याप महाराष्ट्रात सामील होऊ शकलेले नाही. त्यामुळे या सीमाभागात मराठी भाषिक आणि कानडी भाषिकांमध्ये वारंवार तणाव निर्माण होत असतो.   

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक