शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, महाराष्ट्रातील नेत्यांना कुत्र्यांची उपमा दिली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 19:34 IST

बेळगाव येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर जोरदार टीका केली.  

बेळगाव - कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणावरून महाराष्ट्रातील नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांना प्रत्युत्तर देताना लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना कुत्र्यांची उपमा दिली आहे. कुत्रे भुंकतात म्हणून आपणही त्यांना चावायचे का? सीमाप्रश्न हा कधीच संपला असून, आता बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे, असे विधान सवदी यांनी यांनी केले. बेळगाव येथे आयोजित एका कार्यक्रमाला लक्ष्मण सवदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर जोरदार टीका केली.  तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विवेकबुद्धीने विधाने करावीत, असा सल्लाही दिला. यादरम्यान, चंदगडच्या आमदारांनी केलेल्या विधानांबाबत विचारले असता सवदी यांनी कुत्रे भुंकतात म्हणून आपणही त्यांना चावायचे का? कुणी काही बोलले तरी त्याबाबत फारसा विचारक करण्याची गरज नाही, असे विधान केले.  कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी उधळलेल्या या मुक्ताफळांमुळे सीमाभागात मराठी आणि कानडी भाषिकांमधील वाद अधिकच उफाळण्याची शक्यता आहे.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी कानडी भाषकांची संघटना असलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषकांविरोधात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती, मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सीमेवर उभे करून गोळ्या झाडल्या पाहिजेत, असे विधान त्यांनी केले होते. मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन आता 60 वर्षे पूर्ण होत आली असली तरी कन्नड भाषिक कर्नाटकमध्ये समाविष्ट झालेले बेळगाव, निपाणी, कारवार हे मराठी भाषिक प्रदेश अद्याप महाराष्ट्रात सामील होऊ शकलेले नाही. त्यामुळे या सीमाभागात मराठी भाषिक आणि कानडी भाषिकांमध्ये वारंवार तणाव निर्माण होत असतो.   

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक