शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:29 IST

Karnatak Congress: राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या दाव्यावर टीका करणे काँग्रेसच्या मंत्र्यांना चांगलेच महागात पडले.

Karnatak Congress: काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी सोमवारी निवडणूक आयोगाविरुद्ध मोठे निदर्शने केली. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत आहेत. मात्र, या संपूर्ण घटनेबाबत कर्नाटक सरकारचे सहकार मंत्री के.एन. राजन्ना यांनी राहुल गांधी आणि पक्षाच्या विचारसरणीपेक्षा वेगळे विधान केले. राजन्ना यांनी म्हटले की, मतदार यादी काँग्रेसच्या राजवटीत तयार करण्यात आली होती. मात्र, हे विधान मंत्री राजन्ना यांना महागात पडले आहे. काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजन्ना यांचा राजीनामा घेतला आहे.

केएन राजन्ना काय म्हणाले?कर्नाटकचे सहकार मंत्री आणि काँग्रेस नेते के.एन. राजन्ना यांनी रविवारी तुमकुरु येथे बोलताना राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर टीका केली. ते म्हणाले, "असे बोलण्याची गरज नाही. मतदार याद्या कधी बनवण्यात आल्या? या याद्या काँग्रेसच्या राजवटीत बनवण्यात आल्या आहेत. त्यावेळी कोणी का बोलले नाही? डोळे का मिटले होते? जर मी आता जास्त बोललो तर परिस्थिती आणखी बिघडेल. भाजपने चूक केली, हे खरंय. हे नाकारता येत नाही. पण हे सर्व आपल्या डोळ्यांसमोर घडले, हे देखील विचार करण्यासारखे आहे, अशी टीका राजन्ना यांनी केली होती"

'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात

राहुल गांधी चिडलेमुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जाणारे मंत्री केएन राजन्ना यांच्या विधानावर राहुल गांधी खूप संतापले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्र्यांना हायकमांडकडून स्पष्ट सूचना मिळाल्या होत्या की, राजन्ना यांना तात्काळ मंत्रिमंडळातून काढून टाकावे लागेल. त्यानुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजन्ना यांचा राजीनामा घेतला आहे. राजन्ना राजीनामा देण्यास तयार नव्हते, परंतु मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळपर्यंतची मुदत दिली आणि सांगितले की, जर त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला नाही, तर त्यांना काढून टाकले जाईल. त्यानंतर राजन्ना यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाKarnatakकर्नाटक