शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कर्नाटकात काँग्रेस सरकारमध्ये बंडखोरी? सिद्धरामय्या-डीके शिवकुमारांकडून आमदारांची मनधरणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 14:11 IST

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत प्रत्येकाला तक्रार थेट करण्याचा सल्ला दिला आहे.

कर्नाटकातकाँग्रेसचे सरकार स्थापन होऊन अवघे दोन महिने झाले आहेत. पण, आतापासूनच बंडखोरीच्या बातम्या येत आहेत. यापूर्वीच आमदारांकडून मंत्री आणि निधीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. येथे आमदारांनी उघडपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत प्रत्येकाला तक्रार थेट करण्याचा सल्ला दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार बीआर पाटील यांच्या नावाचे एक कथित पत्र व्हायरल झाले होते. यामध्ये त्यांनी सरकारच्या मंत्र्यांबद्दल उघड नाराजी दर्शवली आहे. चर्चेविना अधिकाऱ्यांच्या बदल्या, विकासासाठी निधीचे वाटप न होणे आदी मुद्दे आमदारांनी उपस्थित केले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही हाच मुख्य विषय असल्याचे सांगितले जात आहे.

का नाराज आहेत आमदार?दोन डझनहून अधिक आमदारांनी आपल्या मतदारसंघासाठी निधी न देणे हा मुख्य मुद्दा असल्याचे सांगत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या नाराजीवर आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे विधान आले होते, ज्यात त्यांनी आमदारांना सांगितले होते की, पाच हमीभाव पूर्ण करण्यात सरकारचा पैसा खर्च होत आहे, त्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागेल. 

सरकार पाडण्याचे षडयंत्र - डीके शिवकुमारदरम्यान, आजच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी पक्षात नाराजी नसल्याचे सांगितले आहे. आमदारांनी केवळ आपल्या मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष वेधले. यामुळेच विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावून आता सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, डीके शिवकुमार यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे. सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे, परंतु हे षडयंत्र बंगळुरूऐवजी सिंगापूरमधून घडत आहे, असा आरोप डीके शिवकुमार यांनी केला आहे. मात्र, डीके शिवकुमार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नाही.

बंडखोरीच्या बातम्या समोर येतायेतकर्नाटकमध्ये दोन महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या. यानंतर राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. कर्नाटकात काँग्रेसचे १३५ आमदार आहेत तर भाजपचे ६६ आमदार आहेत. काँग्रेससाठी सरकार स्थापनेदरम्यान मुख्यमंत्री निवडण्याचे आव्हान होते, कारण तेव्हा सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात रस्सीखेच सुरू होती. आता सरकार स्थापन होऊन अवघे दोन महिने झाले असतानाच बंडखोरीच्या बातम्या समोर येत आहेत.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेस