शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

कर्नाटकात काँग्रेस सरकारमध्ये बंडखोरी? सिद्धरामय्या-डीके शिवकुमारांकडून आमदारांची मनधरणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 14:11 IST

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत प्रत्येकाला तक्रार थेट करण्याचा सल्ला दिला आहे.

कर्नाटकातकाँग्रेसचे सरकार स्थापन होऊन अवघे दोन महिने झाले आहेत. पण, आतापासूनच बंडखोरीच्या बातम्या येत आहेत. यापूर्वीच आमदारांकडून मंत्री आणि निधीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. येथे आमदारांनी उघडपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत प्रत्येकाला तक्रार थेट करण्याचा सल्ला दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार बीआर पाटील यांच्या नावाचे एक कथित पत्र व्हायरल झाले होते. यामध्ये त्यांनी सरकारच्या मंत्र्यांबद्दल उघड नाराजी दर्शवली आहे. चर्चेविना अधिकाऱ्यांच्या बदल्या, विकासासाठी निधीचे वाटप न होणे आदी मुद्दे आमदारांनी उपस्थित केले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही हाच मुख्य विषय असल्याचे सांगितले जात आहे.

का नाराज आहेत आमदार?दोन डझनहून अधिक आमदारांनी आपल्या मतदारसंघासाठी निधी न देणे हा मुख्य मुद्दा असल्याचे सांगत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या नाराजीवर आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे विधान आले होते, ज्यात त्यांनी आमदारांना सांगितले होते की, पाच हमीभाव पूर्ण करण्यात सरकारचा पैसा खर्च होत आहे, त्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागेल. 

सरकार पाडण्याचे षडयंत्र - डीके शिवकुमारदरम्यान, आजच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी पक्षात नाराजी नसल्याचे सांगितले आहे. आमदारांनी केवळ आपल्या मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष वेधले. यामुळेच विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावून आता सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, डीके शिवकुमार यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे. सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे, परंतु हे षडयंत्र बंगळुरूऐवजी सिंगापूरमधून घडत आहे, असा आरोप डीके शिवकुमार यांनी केला आहे. मात्र, डीके शिवकुमार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नाही.

बंडखोरीच्या बातम्या समोर येतायेतकर्नाटकमध्ये दोन महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या. यानंतर राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. कर्नाटकात काँग्रेसचे १३५ आमदार आहेत तर भाजपचे ६६ आमदार आहेत. काँग्रेससाठी सरकार स्थापनेदरम्यान मुख्यमंत्री निवडण्याचे आव्हान होते, कारण तेव्हा सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात रस्सीखेच सुरू होती. आता सरकार स्थापन होऊन अवघे दोन महिने झाले असतानाच बंडखोरीच्या बातम्या समोर येत आहेत.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेस