शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

"माझा स्वाभिमान दुखावला तर राजीनामा देईन", कर्नाटकात काँग्रेस आमदार बीआर पाटील यांनी का दिली धमकी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 18:41 IST

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या समस्या मांडल्याबद्दल माफी मागितली नसल्याचे त्यांनी सांगितले.

कलबुर्गी : कर्नाटकातकाँग्रेसचे सरकार स्थापन होऊन अवघे दोन महिने झाले आहेत. पण, आतापासूनच बंडखोरीच्या बातम्या येत आहेत. कर्नाटकमधील आमदार बी. आर. पाटील यांनी बंडखोर वृत्ती दाखवत राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बी. आर. पाटील यांनी 'स्वाभिमाना'चा हवाला देत राजीनामा देण्याचे भाष्य केले होते. तसेच, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या समस्या मांडल्याबद्दल माफी मागितली नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या गुरुवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. येथे आमदारांनी उघडपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली होती. जवळपास ३० आमदारांनी सिद्धरामय्या आणि पक्षनेतृत्वाला पत्र लिहून आपल्या मतदारसंघात विकासकामे न झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. आमदार बी. आर. पाटील म्हणाले की, काही मंत्र्यांच्या वागणुकीमुळे काही आमदार नाराज झाले आहेत. यात सुधारणा न झाल्यास आपला लढा सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, गुरुवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीबद्दल आणि तिथे काय घडले याबद्दल समाधानी असल्याचेही बी. आर. पाटील यांनी सांगितले.

याबाबत विचारले असता गृहमंत्री जी. परमेश्वरा यांच्यासह काही मंत्र्यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणाऱ्यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माफी मागितली होती. दरम्यान, बी. आर. पाटील म्हणाले, "मी मीडिया आणि वृत्तपत्रांचे वृत्तही पाहिले आहे. कोणी माफी मागितली हे मला माहीत नाही. मी माफी मागितलेली नाही आणि माफीही मागणार नाही. आम्ही माफी मागावी असा आम्ही काही गुन्हा केला आहे की आमच्याकडून मोठी चूक झाली आहे." याचबरोबर, राजीनामा देणार असल्याचे बैठकीत सांगितले होते का? असे विचारले असता, "माझा स्वाभिमान दुखावला असेल तर मी राजीनामा देईन आणि जाईन, असे मी एका क्षणी सांगितले होते, असेही बी. आर. पाटील यांनी सांगितले.

का नाराज आहेत आमदार?दोन डझनहून अधिक आमदारांनी आपल्या मतदारसंघासाठी निधी न देणे हा मुख्य मुद्दा असल्याचे सांगत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या नाराजीवर आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे विधान आले होते, ज्यात त्यांनी आमदारांना सांगितले होते की, पाच हमीभाव पूर्ण करण्यात सरकारचा पैसा खर्च होत आहे, त्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागेल.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस