शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

“सिद्धरामय्याच आमच्यासाठी राम, मग अयोध्येला जाण्याची गरज काय?”; काँग्रेस नेत्याचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 14:56 IST

Siddaramaiah News: अयोध्येमध्ये भाजपाचे राम आहेत. तिथे जाऊन दर्शन घेण्याची गरज काय आहे, असे विधान करत काँग्रेस नेत्याने भाजपवर सडकून टीका केली.

Siddaramaiah News: आताच्या घडीला देशभरात राम मंदिराचीच चर्चा जोरदार सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुका आणि राम मंदिर हेच दोन विषय राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चिले जात आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र, विरोधकांकडून या सोहळ्याला कोण जाणार, जायचे की नाही, याबाबत संभ्रम असल्याचे दिसत आहे. आमच्यासाठी सिद्धरामय्या हेच राम असून, अयोध्येला जायची गरज काय, असे विधान एका काँग्रेस नेत्याने केले आहे. 

अयोध्येत सध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राम मंदिराच्या लोकार्पणाचा घाट घातला जात असल्याची टीका विरोधकांकडून केंद्र सरकारवर केली जात आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून विरोधकांमध्ये एकवाक्यता नसून, संमिश्र प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. यातच आता कर्नाटकमधील काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते एच. अंजनेय यांनी केलेले एक विधान चर्चेचा मुद्दा बनले आहे. 

सिद्धरामय्याच आमच्यासाठी राम, मग अयोध्येला जाण्याची गरज काय?

सिद्धरामय्या राम मंदिराच्या सोहळ्याला जाण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अंजनेय म्हणाले की, सिद्धरामय्या हे स्वत:च राम आहेत. सिद्धरामय्या आमच्यासाठीही राम आहेत. अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेण्याची काय गरज आहे? अयोध्येमध्ये भाजपाचे राम आहेत. सिद्धरामय्यांच्या गावात रामाचे मंदिर आहे. तिथे जाऊन ते रामाचे दर्शन घेतील. भाजपाकडून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा जाणून बुजून तापवला जात आहे. राम सर्वत्र आहेत. राम आपल्या हृदयात आहेत. माझे नाव अंजनेय आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रामायणात अंजनेयाने काय केले होते, असे एच. अंजनेय यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, धर्माच्या आधारावर फोडा आणि राज्य करा अशीच भाजपाची नीती राहिली आहे. भाजपाला असे वाटतेय की जर त्यांनी एका धर्मावर सातत्याने हल्ले केले तर इतर धर्माचे लोक त्यांना मत देतील. आम्हीही हिंदू आहोत. त्यांनी काही हिंदू धर्म किंवा हिंदू लोकांना विकत घेतलेले नाही. आजही काही दलित लोक अशा ठिकाणी राहतात जी जागा राहण्यासाठीही योग्य नाही. या लोकांसाठी घरे बांधून त्यांना तिथे हलवायला हवे. या घरांना राम मंदिर म्हणा. मग खरे राम तुम्हाला आशीर्वाद देतील. रामाचा वापर मतांच्या राजकारणासाठी करू नका, या शब्दांत एच. अंजनेय यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरsiddaramaiahसिद्धारामय्याKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस