शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

“सिद्धरामय्याच आमच्यासाठी राम, मग अयोध्येला जाण्याची गरज काय?”; काँग्रेस नेत्याचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 14:56 IST

Siddaramaiah News: अयोध्येमध्ये भाजपाचे राम आहेत. तिथे जाऊन दर्शन घेण्याची गरज काय आहे, असे विधान करत काँग्रेस नेत्याने भाजपवर सडकून टीका केली.

Siddaramaiah News: आताच्या घडीला देशभरात राम मंदिराचीच चर्चा जोरदार सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुका आणि राम मंदिर हेच दोन विषय राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चिले जात आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र, विरोधकांकडून या सोहळ्याला कोण जाणार, जायचे की नाही, याबाबत संभ्रम असल्याचे दिसत आहे. आमच्यासाठी सिद्धरामय्या हेच राम असून, अयोध्येला जायची गरज काय, असे विधान एका काँग्रेस नेत्याने केले आहे. 

अयोध्येत सध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राम मंदिराच्या लोकार्पणाचा घाट घातला जात असल्याची टीका विरोधकांकडून केंद्र सरकारवर केली जात आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून विरोधकांमध्ये एकवाक्यता नसून, संमिश्र प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. यातच आता कर्नाटकमधील काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते एच. अंजनेय यांनी केलेले एक विधान चर्चेचा मुद्दा बनले आहे. 

सिद्धरामय्याच आमच्यासाठी राम, मग अयोध्येला जाण्याची गरज काय?

सिद्धरामय्या राम मंदिराच्या सोहळ्याला जाण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अंजनेय म्हणाले की, सिद्धरामय्या हे स्वत:च राम आहेत. सिद्धरामय्या आमच्यासाठीही राम आहेत. अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेण्याची काय गरज आहे? अयोध्येमध्ये भाजपाचे राम आहेत. सिद्धरामय्यांच्या गावात रामाचे मंदिर आहे. तिथे जाऊन ते रामाचे दर्शन घेतील. भाजपाकडून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा जाणून बुजून तापवला जात आहे. राम सर्वत्र आहेत. राम आपल्या हृदयात आहेत. माझे नाव अंजनेय आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रामायणात अंजनेयाने काय केले होते, असे एच. अंजनेय यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, धर्माच्या आधारावर फोडा आणि राज्य करा अशीच भाजपाची नीती राहिली आहे. भाजपाला असे वाटतेय की जर त्यांनी एका धर्मावर सातत्याने हल्ले केले तर इतर धर्माचे लोक त्यांना मत देतील. आम्हीही हिंदू आहोत. त्यांनी काही हिंदू धर्म किंवा हिंदू लोकांना विकत घेतलेले नाही. आजही काही दलित लोक अशा ठिकाणी राहतात जी जागा राहण्यासाठीही योग्य नाही. या लोकांसाठी घरे बांधून त्यांना तिथे हलवायला हवे. या घरांना राम मंदिर म्हणा. मग खरे राम तुम्हाला आशीर्वाद देतील. रामाचा वापर मतांच्या राजकारणासाठी करू नका, या शब्दांत एच. अंजनेय यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरsiddaramaiahसिद्धारामय्याKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस