शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

“सिद्धरामय्याच आमच्यासाठी राम, मग अयोध्येला जाण्याची गरज काय?”; काँग्रेस नेत्याचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 14:56 IST

Siddaramaiah News: अयोध्येमध्ये भाजपाचे राम आहेत. तिथे जाऊन दर्शन घेण्याची गरज काय आहे, असे विधान करत काँग्रेस नेत्याने भाजपवर सडकून टीका केली.

Siddaramaiah News: आताच्या घडीला देशभरात राम मंदिराचीच चर्चा जोरदार सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुका आणि राम मंदिर हेच दोन विषय राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चिले जात आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र, विरोधकांकडून या सोहळ्याला कोण जाणार, जायचे की नाही, याबाबत संभ्रम असल्याचे दिसत आहे. आमच्यासाठी सिद्धरामय्या हेच राम असून, अयोध्येला जायची गरज काय, असे विधान एका काँग्रेस नेत्याने केले आहे. 

अयोध्येत सध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राम मंदिराच्या लोकार्पणाचा घाट घातला जात असल्याची टीका विरोधकांकडून केंद्र सरकारवर केली जात आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून विरोधकांमध्ये एकवाक्यता नसून, संमिश्र प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. यातच आता कर्नाटकमधील काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते एच. अंजनेय यांनी केलेले एक विधान चर्चेचा मुद्दा बनले आहे. 

सिद्धरामय्याच आमच्यासाठी राम, मग अयोध्येला जाण्याची गरज काय?

सिद्धरामय्या राम मंदिराच्या सोहळ्याला जाण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अंजनेय म्हणाले की, सिद्धरामय्या हे स्वत:च राम आहेत. सिद्धरामय्या आमच्यासाठीही राम आहेत. अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेण्याची काय गरज आहे? अयोध्येमध्ये भाजपाचे राम आहेत. सिद्धरामय्यांच्या गावात रामाचे मंदिर आहे. तिथे जाऊन ते रामाचे दर्शन घेतील. भाजपाकडून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा जाणून बुजून तापवला जात आहे. राम सर्वत्र आहेत. राम आपल्या हृदयात आहेत. माझे नाव अंजनेय आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रामायणात अंजनेयाने काय केले होते, असे एच. अंजनेय यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, धर्माच्या आधारावर फोडा आणि राज्य करा अशीच भाजपाची नीती राहिली आहे. भाजपाला असे वाटतेय की जर त्यांनी एका धर्मावर सातत्याने हल्ले केले तर इतर धर्माचे लोक त्यांना मत देतील. आम्हीही हिंदू आहोत. त्यांनी काही हिंदू धर्म किंवा हिंदू लोकांना विकत घेतलेले नाही. आजही काही दलित लोक अशा ठिकाणी राहतात जी जागा राहण्यासाठीही योग्य नाही. या लोकांसाठी घरे बांधून त्यांना तिथे हलवायला हवे. या घरांना राम मंदिर म्हणा. मग खरे राम तुम्हाला आशीर्वाद देतील. रामाचा वापर मतांच्या राजकारणासाठी करू नका, या शब्दांत एच. अंजनेय यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरsiddaramaiahसिद्धारामय्याKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस