शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

“सिद्धरामय्याच आमच्यासाठी राम, मग अयोध्येला जाण्याची गरज काय?”; काँग्रेस नेत्याचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 14:56 IST

Siddaramaiah News: अयोध्येमध्ये भाजपाचे राम आहेत. तिथे जाऊन दर्शन घेण्याची गरज काय आहे, असे विधान करत काँग्रेस नेत्याने भाजपवर सडकून टीका केली.

Siddaramaiah News: आताच्या घडीला देशभरात राम मंदिराचीच चर्चा जोरदार सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुका आणि राम मंदिर हेच दोन विषय राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चिले जात आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र, विरोधकांकडून या सोहळ्याला कोण जाणार, जायचे की नाही, याबाबत संभ्रम असल्याचे दिसत आहे. आमच्यासाठी सिद्धरामय्या हेच राम असून, अयोध्येला जायची गरज काय, असे विधान एका काँग्रेस नेत्याने केले आहे. 

अयोध्येत सध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राम मंदिराच्या लोकार्पणाचा घाट घातला जात असल्याची टीका विरोधकांकडून केंद्र सरकारवर केली जात आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून विरोधकांमध्ये एकवाक्यता नसून, संमिश्र प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. यातच आता कर्नाटकमधील काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते एच. अंजनेय यांनी केलेले एक विधान चर्चेचा मुद्दा बनले आहे. 

सिद्धरामय्याच आमच्यासाठी राम, मग अयोध्येला जाण्याची गरज काय?

सिद्धरामय्या राम मंदिराच्या सोहळ्याला जाण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अंजनेय म्हणाले की, सिद्धरामय्या हे स्वत:च राम आहेत. सिद्धरामय्या आमच्यासाठीही राम आहेत. अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेण्याची काय गरज आहे? अयोध्येमध्ये भाजपाचे राम आहेत. सिद्धरामय्यांच्या गावात रामाचे मंदिर आहे. तिथे जाऊन ते रामाचे दर्शन घेतील. भाजपाकडून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा जाणून बुजून तापवला जात आहे. राम सर्वत्र आहेत. राम आपल्या हृदयात आहेत. माझे नाव अंजनेय आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रामायणात अंजनेयाने काय केले होते, असे एच. अंजनेय यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, धर्माच्या आधारावर फोडा आणि राज्य करा अशीच भाजपाची नीती राहिली आहे. भाजपाला असे वाटतेय की जर त्यांनी एका धर्मावर सातत्याने हल्ले केले तर इतर धर्माचे लोक त्यांना मत देतील. आम्हीही हिंदू आहोत. त्यांनी काही हिंदू धर्म किंवा हिंदू लोकांना विकत घेतलेले नाही. आजही काही दलित लोक अशा ठिकाणी राहतात जी जागा राहण्यासाठीही योग्य नाही. या लोकांसाठी घरे बांधून त्यांना तिथे हलवायला हवे. या घरांना राम मंदिर म्हणा. मग खरे राम तुम्हाला आशीर्वाद देतील. रामाचा वापर मतांच्या राजकारणासाठी करू नका, या शब्दांत एच. अंजनेय यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरsiddaramaiahसिद्धारामय्याKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस