शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:00 IST

एका लॉजिस्टिक्स कंपनीने बंगळुरू सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटक सरकारवर टीका होऊ लागली. त्यातून केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला.

बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी यांना खास आवाहन केले आहे. सिद्धरामय्या यांनी पत्र लिहून दिग्गज उद्योगपती अजीम प्रेमजी यांना शहरातील आउटर रिंग रोडवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी बंगळुरूतील त्यांच्या कंपनी परिसरातून मर्यादित वाहनांची वाहतुकीसाठी परवानगी मागितली आहे. १९ सप्टेंबरला सिद्धरामय्या यांनी हे पत्र पाठवले आहे.

या पत्रात मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलंय की, शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने करत असलेल्या आढावा बैठकीत या पर्यायाने ODR च्या आसपासची वाहतूक कोंडी ३० टक्क्यांनी कमी होऊ शकते असं बोलले जाते. विशेषत: ऑफिस पीक आवर्समध्ये कोंडी सुटू शकते. व्यस्त वेळेत होणारी वाहतूक व्यवस्था गतिशीलता, उत्पादकता आणि शहरी जीवनाच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम करते. विप्रोच्या पाठिंब्याचे महत्त्व सांगताना हा उपक्रम वाहतूक कोंडी कमी करण्यात, प्रवाशांचा अनुभव सुधारण्यात आणि अधिक कार्यक्षम बेंगळुरूमध्ये योगदान देण्यास खूप मदत करेल असं त्यांनी अजीम प्रेमजी यांनी म्हटलं. तुमची टीम आणि सरकारी अधिकारी यांच्या टीमने एकत्रितपणे यावर सहमती बनवून प्लॅनिंग करायला हवे असं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं.

रस्त्यावर खड्डे आणि कोंडीचा सामना

सरकारकडून हा प्रस्ताव आउटर रिंग रोडवर होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीतून प्रवाशांना होणारा त्रास आणि सामाजिक संघटनांकडून वारंवार व्यक्त होणाऱ्या चिंतेनंतर उचलण्यात आलेले पाऊल आहे. हा रोड शहरातील आयटी हबच्या दृष्टीने महत्त्वाचा कॉरिडोर आहे. अलीकडेच लॉजिस्टिक्स टेक्नोलॉजी फर्म ब्लॅकबक को फाऊंडरने शहरातील रस्त्यांची दुरावस्था, खड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी याचे कारण देत बंगळुरूतील ऑफिस शिफ्ट करत असल्याचे म्हटले होते. सरकारकडून कुठलीही ठोस पाऊले उचलली जात नाही. कमीत कमी पुढचे ५ वर्ष ही स्थिती बदलण्याचीही शक्यता नाही अशी नाराजी ब्लॅकबकचे सीईओ राजेश याबाजी यांनी व्यक्त केली होती. 

एका लॉजिस्टिक्स कंपनीने बंगळुरू सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटक सरकारवर टीका होऊ लागली. त्यातून केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. उद्योगपतींचा विश्वास संपुष्टात आला आहे. ते शेजारील राज्यात जाऊ लागलेत. सरकारने राज्याचा विकास वंचित ठेवत कन्नड लोकांच्या अस्मितेचा अपमान केला आहे असं त्यांनी म्हटलं. विरोधकांकडून होणारी टीका आणि नागरिकांमध्ये पसरत असलेला असंतोष यातून शहरातील वाहतूक कोंडीशी निगडित समस्या सोडवण्याचा दबाव निर्माण झाला. त्यातूनच मुख्यमंत्री सिद्धराम्मया यांनी उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र लिहिले आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकPotholeखड्डेTrafficवाहतूक कोंडीBengaluruबेंगळूर