शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:00 IST

एका लॉजिस्टिक्स कंपनीने बंगळुरू सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटक सरकारवर टीका होऊ लागली. त्यातून केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला.

बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी यांना खास आवाहन केले आहे. सिद्धरामय्या यांनी पत्र लिहून दिग्गज उद्योगपती अजीम प्रेमजी यांना शहरातील आउटर रिंग रोडवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी बंगळुरूतील त्यांच्या कंपनी परिसरातून मर्यादित वाहनांची वाहतुकीसाठी परवानगी मागितली आहे. १९ सप्टेंबरला सिद्धरामय्या यांनी हे पत्र पाठवले आहे.

या पत्रात मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलंय की, शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने करत असलेल्या आढावा बैठकीत या पर्यायाने ODR च्या आसपासची वाहतूक कोंडी ३० टक्क्यांनी कमी होऊ शकते असं बोलले जाते. विशेषत: ऑफिस पीक आवर्समध्ये कोंडी सुटू शकते. व्यस्त वेळेत होणारी वाहतूक व्यवस्था गतिशीलता, उत्पादकता आणि शहरी जीवनाच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम करते. विप्रोच्या पाठिंब्याचे महत्त्व सांगताना हा उपक्रम वाहतूक कोंडी कमी करण्यात, प्रवाशांचा अनुभव सुधारण्यात आणि अधिक कार्यक्षम बेंगळुरूमध्ये योगदान देण्यास खूप मदत करेल असं त्यांनी अजीम प्रेमजी यांनी म्हटलं. तुमची टीम आणि सरकारी अधिकारी यांच्या टीमने एकत्रितपणे यावर सहमती बनवून प्लॅनिंग करायला हवे असं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं.

रस्त्यावर खड्डे आणि कोंडीचा सामना

सरकारकडून हा प्रस्ताव आउटर रिंग रोडवर होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीतून प्रवाशांना होणारा त्रास आणि सामाजिक संघटनांकडून वारंवार व्यक्त होणाऱ्या चिंतेनंतर उचलण्यात आलेले पाऊल आहे. हा रोड शहरातील आयटी हबच्या दृष्टीने महत्त्वाचा कॉरिडोर आहे. अलीकडेच लॉजिस्टिक्स टेक्नोलॉजी फर्म ब्लॅकबक को फाऊंडरने शहरातील रस्त्यांची दुरावस्था, खड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी याचे कारण देत बंगळुरूतील ऑफिस शिफ्ट करत असल्याचे म्हटले होते. सरकारकडून कुठलीही ठोस पाऊले उचलली जात नाही. कमीत कमी पुढचे ५ वर्ष ही स्थिती बदलण्याचीही शक्यता नाही अशी नाराजी ब्लॅकबकचे सीईओ राजेश याबाजी यांनी व्यक्त केली होती. 

एका लॉजिस्टिक्स कंपनीने बंगळुरू सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटक सरकारवर टीका होऊ लागली. त्यातून केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. उद्योगपतींचा विश्वास संपुष्टात आला आहे. ते शेजारील राज्यात जाऊ लागलेत. सरकारने राज्याचा विकास वंचित ठेवत कन्नड लोकांच्या अस्मितेचा अपमान केला आहे असं त्यांनी म्हटलं. विरोधकांकडून होणारी टीका आणि नागरिकांमध्ये पसरत असलेला असंतोष यातून शहरातील वाहतूक कोंडीशी निगडित समस्या सोडवण्याचा दबाव निर्माण झाला. त्यातूनच मुख्यमंत्री सिद्धराम्मया यांनी उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र लिहिले आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकPotholeखड्डेTrafficवाहतूक कोंडीBengaluruबेंगळूर