शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Anti-Conversion Law : 10 वर्षे तुरुंगवास आणि लाखोंचा दंड! जाणून घ्या, कर्नाटकच्या धर्मांतर विरोधी कायद्यातील काही तरतुदी... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 13:18 IST

Anti-Conversion Law : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अलीकडेच पत्रकारांना सांगितले होते की, विविध मठांतील संतांनी धर्मांतरावर बंदी घालण्यासाठी कायदा आणण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे.

बेळगाव : उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशानंतर आता कर्नाटकातही धर्मांतर विरोधी विधेयक (Karnataka Anti-Conversion Bill) आणले जाणार आहे. याअंतर्गत सामूहिक धर्मांतर करणाऱ्यांना तीन ते दहा वर्षांच्या तुरुंगवासासह एक लाख रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. राज्य सरकारने या विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. 

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अलीकडेच पत्रकारांना सांगितले होते की, विविध मठांतील संतांनी धर्मांतरावर बंदी घालण्यासाठी कायदा आणण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे. दरम्यान, बेळगावमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात राज्यातील भाजप सरकार हे विधेयक मांडू शकते. या प्रस्तावित धर्मांतर विरोधी विधेयकात काही तरतुदी काय असू शकतात हे सविस्तर जाणून घेऊया....

धर्मांतर करण्यापूर्वी एक महिन्याची नोटीस : विधेयकाच्या मसुद्यात असे नमूद केले आहे की, धर्मांतर करणाऱ्यांना एका महिन्याची नोटीस जिल्हा दंडाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या दर्जाच्या खाली नसलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला द्यावी लागेल.

अवैध होईल धर्मांतर : बेकायदेशीर धर्मांतराच्या हेतूने केलेले विवाह किंवा विवाहाच्या उद्देशाने केलेले बेकायदेशीर धर्मांतर अवैध मानले जाईल, असे प्रस्तावित मसुद्यात नमूद करण्यात आले आहे.

पीडित नातेवाईक FIR दाखल करू शकतील : प्रस्तावित कायद्यानुसार, कोणतीही पीडित व्यक्ती, त्याचे आई-वडील, भाऊ, बहीण किंवा रक्ताचे नाते असलेली कोणतीही व्यक्ती कलम-3 च्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या अशा धर्मांतरासाठी एफआयआर दाखल करू शकते.

शिक्षेची तरतूद : अनुसूचित जाती/जमाती आणि अल्पवयीनांनी धर्मांतर केल्यास, त्याचे परिणाम कठोर होतील. अल्पवयीन, महिला किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील व्यक्तीचे बेकायदेशीरपणे धर्मांतर केल्यास तीन ते दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे या मसुद्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच, कमीत कमी 50,000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.

पीडितांना भरपाई : प्रस्तावित कायद्यानुसार पीडितेला दंडाव्यतिरिक्त पाच लाख रुपयांपर्यंतची भरपाई मिळू शकते. बेकायदेशीर धर्मांतराच्या एकमेव उद्देशाने केलेला विवाह झाल्यास, कौटुंबिक न्यायालयाने विवाह रद्द ठरवला जाईल. जर कौटुंबिक न्यायालये नसतील, तर अशी प्रकरणे चालवण्याचे अधिकार असलेले न्यायालय देखील असे विवाह रद्द ठरवू शकते.

अजामीनपात्र गुन्हा : प्रस्तावित कायद्यातील तरतुदी अजामीनपात्र श्रेणीत ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय, ज्याला धर्म बदलायचा असेल त्याला 'फॉर्म-I' मध्ये किमान 60 दिवस अगोदर लिखित स्वरूपात जिल्हा दंडाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांना कळवावे लागेल.

संघटनेवरही कारवाई होईल : माहिती मिळाल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावित धर्मांतराचा खरा हेतू, हेतू आणि कारणाबाबत पोलिसांमार्फत चौकशी करावी. प्रस्तावित कायद्यात म्हटले आहे की, उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही संस्था किंवा संघटनेवरही कारवाई होईल.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगाव