शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

माझ्या आजोबांना मंत्री का बनवलं नाही?; ७ वर्षीय नातीचं थेट राहुल गांधींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 10:07 IST

२० मे रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याशिवाय आठ मंत्र्यांनी शपथ घेतली.

बंगळुरू - कर्नाटकात काँग्रेसकडून भाजपानं सत्ता खेचून आणली. त्यानंतर सत्तास्थापन करून आता मंत्रिमंडळ शपथविधी पार पडला. मात्र मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचं दिसून आले. त्यात काँग्रेस आमदार टीबी जयचंद्र यांच्या नातीनं थेट राहुल गांधींना पत्र लिहिलं आहे. अवघ्या ७ वर्षीय मुलीनं माझ्या आजोबांना मंत्री का बनवलं नाही अशी तक्रारच तिने राहुल गांधींकडे मांडली आहे. 

या पत्रात मुलीने आजोबांना कर्नाटक सरकारमध्ये मंत्री न बनवल्याने दुखी असल्याचे म्हटलं आहे. माझ्या आजोबांना कॅबिनेटमध्ये जागा द्या अशी मागणीही तिने राहुल गांधींना केली आहे. टीबी जयचंद्र यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चाही होती परंतु यादीत त्यांचे नाव समाविष्ट नव्हते. जयचंद्र यांना मंत्री न केल्याने कंचितिगा समुदायातील लोक नाराज झाले आहेत. कुंचितिगा समाजावर काँग्रेसने अन्याय केला असा आरोप समाजातील नेते करत आहेत. 

या पत्रात ७ वर्षीय आरना संदीप यांनी म्हटलंय की, प्रिय राहुल गांधीजी, मी टीबी जयचंद्र यांची नात आहे. माझ्या आजोबांना मंत्री बनवले नाही. त्यासाठी मी दुखी आहे. माझ्या आजोबांना मंत्री बनवायला हवे होते कारण ते मेहनती आहेत. लोकांवर प्रेम करतात आणि कायम त्यांना मदत करतात त्यांना तुम्ही मंत्री बनवायला हवे अशी मागणी तिने पत्रात केली. आरना ही तिसरीच्या वर्गात शिकते. जयचंद्र यांचा दुसरा मुलगा संदीप टीजे यांची ती मुलगी आहे. टीव्हीवर जेव्हा कळालं, माझ्या आजोबांना मंत्री बनवणार नाहीत तेव्हा मी ते पाहून खूप रडले असंही तिने म्हटलं आहे.

टीबी जयचंद्र मंत्रिपदापासून वंचित२० मे रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याशिवाय आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिपदासाठी पक्ष नेतृत्वावर दबाव वाढत असताना पक्षाने विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन बोलावले आहे. शनिवारी २४ नवीन मंत्र्यांचा समावेश करून मंत्रिमंडळ विस्ताराची कसरत पूर्ण झाली. जयचंद्र मात्र मंत्रीपदापासून वंचित राहिले. त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती पण शेवटच्या क्षणी त्यांचे नाव यादीत नव्हते. त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची ऑफर आली होती, मात्र त्यांनी ती फेटाळून लावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कर्नाटकात अनेक आमदार नाराजकर्नाटक राजभवनात शनिवारी २४ नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. ज्यात अनेक वरिष्ठ आमदारांचे नाव नव्हते त्यामुळे ही नाराजी शपथविधीवेळी दिसून आली. नाराज आमदारांनी राजभवनाबाहेरच घोषणाबाजी सुरू केली. बंगळुरूशिवाय तुमाकुरुच्या सिरा, म्हैसूर, हावेरी, कोडागु आणि अन्य जिल्ह्यातही निदर्शने झाली. अनेक आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस