शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

Karnal Farmers Protest: “इथं कुणीही आला तरी सरळ डोकं फोडा”; शेतकरी आंदोलनाआधीचा खळबळजनक Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 21:35 IST

हरियाणातील करनालमध्ये मुख्यमंत्री खट्टर आणि भाजपाच्या आमदार, खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकावरून मागील १० महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु भाजपाशासित हरियाणा राज्यात शेतकरी आणि पोलीस यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता. आता याठिकाणी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि अटक करण्याचा आरोप पोलिसांवर लावण्यात आला आहे. त्यातच हरियाणातील करनालमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवरुन नेटीझन्सनं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. ज्यात करनालचे उपन्यायदंडाधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांना आंदोलकांची डोकी फोडा असे आदेश देताना दिसत आहेत. एसडीएम आयुष सिन्हा यांच्या व्हिडीओनंतर सोशल मीडियात आंदोलक शेतकऱ्यांचे रक्तबंबाळ झालेले अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. पोलिसांच्या लाठीचार्जचा व्हिडीओही शेअर केला जात आहे.

दिल्लीतील आम आदमी पार्टीचे आमदार नरेश बालियान यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच उपन्यायदंडाधिकारी पोलिसांना म्हणताना दिसतात की, सरळ गोष्ट आहे याठिकाणाहून कुणीही पुढे जाणार नाही, मी स्पष्ट सांगतो, डोकं फोडा, मी डेप्युटी मॅजिस्ट्रेट आहे, मी लिखित सांगतो की, सरळ काठी डोक्यात मारा, काही शंका? उचलून मारा, कोणत्याही आदेशाची वाट पाहू नका. आपण दोन दिवसांपासून इथं ड्युटी करतोय. येथून कुणीही पुढे जायला नाही पाहिजे. जर गेलाच तर त्याचं डोकं फुटायला हवं असं व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.

भाजपा नेत्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

हरियाणातील करनालमध्ये मुख्यमंत्री खट्टर आणि भाजपाच्या आमदार, खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपाविरोधात काही शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. डेप्युटी मॅजिस्ट्रेटच्या आदेशानंतर जेव्हा शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटली, रक्त वाहिलं. जखमी शेतकऱ्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आयुष सिन्हा यांचा बचावात्मक पवित्रा

सोशल मीडियात व्हायरल व्हिडीओनंतर आयएएस अधिकारी आयुष सिन्हा यांना विचारण्यात आले असता त्यांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दगडफेक सुरु केली होती. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा बळाचा वापर करावा असं कर्मचाऱ्यांना सांगितले होते.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपा