शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

Karnal Farmers Protest: “इथं कुणीही आला तरी सरळ डोकं फोडा”; शेतकरी आंदोलनाआधीचा खळबळजनक Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 21:35 IST

हरियाणातील करनालमध्ये मुख्यमंत्री खट्टर आणि भाजपाच्या आमदार, खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकावरून मागील १० महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु भाजपाशासित हरियाणा राज्यात शेतकरी आणि पोलीस यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता. आता याठिकाणी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि अटक करण्याचा आरोप पोलिसांवर लावण्यात आला आहे. त्यातच हरियाणातील करनालमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवरुन नेटीझन्सनं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. ज्यात करनालचे उपन्यायदंडाधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांना आंदोलकांची डोकी फोडा असे आदेश देताना दिसत आहेत. एसडीएम आयुष सिन्हा यांच्या व्हिडीओनंतर सोशल मीडियात आंदोलक शेतकऱ्यांचे रक्तबंबाळ झालेले अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. पोलिसांच्या लाठीचार्जचा व्हिडीओही शेअर केला जात आहे.

दिल्लीतील आम आदमी पार्टीचे आमदार नरेश बालियान यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच उपन्यायदंडाधिकारी पोलिसांना म्हणताना दिसतात की, सरळ गोष्ट आहे याठिकाणाहून कुणीही पुढे जाणार नाही, मी स्पष्ट सांगतो, डोकं फोडा, मी डेप्युटी मॅजिस्ट्रेट आहे, मी लिखित सांगतो की, सरळ काठी डोक्यात मारा, काही शंका? उचलून मारा, कोणत्याही आदेशाची वाट पाहू नका. आपण दोन दिवसांपासून इथं ड्युटी करतोय. येथून कुणीही पुढे जायला नाही पाहिजे. जर गेलाच तर त्याचं डोकं फुटायला हवं असं व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.

भाजपा नेत्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

हरियाणातील करनालमध्ये मुख्यमंत्री खट्टर आणि भाजपाच्या आमदार, खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपाविरोधात काही शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. डेप्युटी मॅजिस्ट्रेटच्या आदेशानंतर जेव्हा शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटली, रक्त वाहिलं. जखमी शेतकऱ्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आयुष सिन्हा यांचा बचावात्मक पवित्रा

सोशल मीडियात व्हायरल व्हिडीओनंतर आयएएस अधिकारी आयुष सिन्हा यांना विचारण्यात आले असता त्यांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दगडफेक सुरु केली होती. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा बळाचा वापर करावा असं कर्मचाऱ्यांना सांगितले होते.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपा