शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

Kargil Vijay Diwas : कारगिल युद्ध का झालं? जाणून घ्या, इतिहास अन् कारणं... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 15:49 IST

कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला आज २१ वर्षे पूर्ण होत आहेत.

ठळक मुद्देभारत-पाकिस्तान यांच्यात १९७१ मध्ये झालेले दुसरे युद्धही भारताने जिंकले होते. पण, दोनदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन शेजाऱ्यांमधील छत्तीसचा आकडा जगाला माहीत आहे. भारतानेपाकिस्तानला 'टाळी' देण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण पाकिस्तानचे कांगावे आणि कुरापतींमुळे ही मैत्री होऊ शकलेली नाही. उलट, काश्मीरवर पाकिस्तानने हक्क दाखविला आणि नियंत्रण रेषेवर नापाक कारवाया केल्या, यामुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानला पुन्हा एकदा कारगिलसारखा दणका द्यायला हवा', अशी इच्छा अनेक जण व्यक्त करतात. त्याच अनुषंगाने, कारगिल विजय दिवसाच्या (२६ जुलै) निमित्ताने या युद्धाचा इतिहास आणि कारणे जाणून घेऊ या.....

भारत-पाकिस्तान यांच्यात १९७१ मध्ये झालेले दुसरे युद्धही भारताने जिंकले होते. पण, दोनदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे. उलट, हे पराभव त्यांच्या इतके जिव्हारी लागलेत की, भारताला अस्थिर करण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. पण, भारतीय लष्कराच्या जिगरबाज जवानांनी त्यांचे सगळे कट उधळून लावले. त्यापैकी सगळ्यात मोठा कट होता, तो म्हणजे 'ऑपरेशन बद्र'. 

अणुचाचणीच्या मुद्द्यावरून भारत-पाकमधील संबंध टोकाला गेले होते. हे वातावरण निवळावं, सीमांवर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये लाहोर इथे करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार, काश्मीर प्रश्नावर द्विपक्षीय चर्चा करून शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचं निश्चित करण्यात आले होते. परंतु, 'हम नही सुधरेंगे' वृत्तीच्या पाकिस्तानने कुरापती सुरूच ठेवल्या. लष्कराच्या आणि निमलष्करी दलाच्या जवानांना लपूनछपून नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यास त्यांनी सुरुवात केली. हेच होतं, 'ऑपरेशन बद्र'. 

काश्मीर आणि लडाखला जोडणारा मार्ग तोडून भारतीय जवानांना सियाचीनमधून हटवण्याचे कारस्थान त्यांनी रचले होते. कारण, या भागात तणाव निर्माण झाल्यास काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल आणि भारतावर दबाव वाढवता येईल, असे पाकिस्तान समजत होता. सुरुवातीला ही घुसखोरी भासवण्यात आली. पण, भारतीय जवान डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. नियंत्रण रेषेवर शोधमोहीमेदरम्यान पाकिस्तानचा कट उघड झाला. मोठा हल्ला करण्याच्या तयारीने पाकने आपल्या जवानांनाच LoC पार पाठवले असल्याचे बिंग फुटले आणि भारताचे तब्बल २ लाख जवान 'ऑपरेशन विजय' यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले. तब्बल ६० दिवस ते जिद्दीने लढले आणि जिंकले.

कारगिल हा भाग समुद्रसपाटीपासून १३ ते १८ हजार फूट उंचीवर आहे. तेथील तापमान उणे ३० ते उणे ४० अंश सेल्सियस इतके असते. अशा वातावरणात आपले जिगरबाज जवान न डगमगता शत्रूशी मुकाबला करत होते. इतक्या उंचीवर कधीच कुठलंच युद्ध झाले नव्हते. या युद्धात २६ जुलै १९९९ च्या दिवशी शेवटचा पाकिस्तानी सैनिक मारला गेला आणि भारतीय जवानांनी कारगिलवर अभिमानाने तिरंगा फडकवला. भारतीय लष्कराचे ५४३ अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले. 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान