शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Kargil Vijay Diwas : यांच्या शौर्यासमोर मृत्यूही हरला; 15 गोळ्या झेलूनही शत्रूला मात देणाऱ्या योगेंद्र यादव यांची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 09:42 IST

1999 मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय लष्करामधील अनेक जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले होते. याच शूरवीरांमधील एक नाव म्हणजे सुभेदार योगेंद्र यादव.

नवी दिल्ली - देशात आज कारगिल विजयाचा 20 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 1999 मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय लष्करामधील अनेक जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले होते. याच शूरवीरांमधील एक नाव म्हणजे सुभेदार योगेंद्र यादव.  टायगर हिलवर असलेल्या शत्रूचे तीन बंकर्स उद्ध्वस्त करण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईदरम्यान, योगेंद्र यादव पाकिस्तानी सैनिक आणि घुसखोरांनी केलेल्या गोळीबारात जबर जखमी झाले होते. मात्र शरीरात 15 गोळ्या घुसल्या असतानाही योगेंद्र यादव लढत राहिले. यादरम्यान, त्यांनी पाकिस्तानच्या अनेक सैनिकांना ठार केले. गंभीर जखमी असतानाही त्यांनी दाखवलेले शौर्य आणि मिळवलेल्या महत्त्वपूर्ण माहितीमुळे भारतीय लष्कराला टायगर हिलवर तिरंगा फडकवणे सोपे गेले. या अतुलनीय शौर्याबद्दल सुभेदार योगेंद्र यादव यांना परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आले. हयात असताना परमवीर चक्र मिळवणारे सुभेदार योगेंद्र यादव मोजक्या जवानांपैकी एक आहेत. 

सध्या लष्करात सुभेदार मेजर पदावर कार्यरत असलेले योगेंद्र यादव 1999 मध्ये कारगिल युद्धाची पार्श्वभूमी तयार होत असताना नुकतेच प्रशिक्षण संपवून लष्करात दाखल झाले होते. लष्करातील 18 ग्रेनेडियर्समध्ये असलेल्या योगेंद्र यादव यांना आपल्याला युद्ध आघाडीवर जावे लागेल याची कल्पनाही नव्हती. दरम्यान, त्यांच्या घातक प्लाटूनकडे कारगिल युद्धात सर्वात महत्त्वाचे ठरलेले टायगर हिल शिखर फत्ते करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. योगेंद्र यादव यांच्यासह 21 जवानांनी खडा कडा पार करत टायगर हिलच्या दिशेने कूच केले. दरम्यान, या तुकडीने पाकिस्तानी सैन्याचा एक बंकर उद्ध्वस्त केला. मात्र पुढे आगेकूच करेपर्यंत योगेंद्र यादव यांच्यासह केवळ 7 जवान बचावले. दरम्यान, या जवानांचा शोध घेण्यासाठी आलेल्या 10-12 पाकिस्तानी जवानांना योगेंद्र यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठार केले. मात्र त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने पुन्हा हल्ला केला. यात योगेंद्र यादव यांचे सर्व सहकारी शहीद झाले. त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी वीरमरण आलेल्या भारतीय जवानांच्या शरीरावर गोळ्या झाडणे सुरू ठेवले. योगेंद्र यादव असहायपणे हे सारे पाहत होते. दरम्यान, गंभीर जखमी झालेले योगेंद्र यादव निपचित पडून राहिले. त्यांच्यावरही गोळ्या झाडल्या गेल्या मात्र त्या वेदना सहन करत त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. अखेरीस एका पाकिस्तानी सैनिकाने योगेंद्र यादव यांच्या छातीच्या दिशेने बंदूक रोखून गोळी झाडली. मात्र खिशात असलेल्या पाच-पाच रुपयांची नाणी ठेवलेल्या पाकिटामुळे योगेंद्र यादव बचावले.  काही वेळाने शुद्ध आली तेव्हा आपल्या आसपास पाकिस्तानी सैनिक उभे असल्याचे योगेंद्र यादव यांनी पाहिले. त्यावेळी बाजूला पडलेले एक ग्रेनेड योगेंद्र यादव यांना दिसले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता ते ग्रेनेड शत्रू सैनिकांच्या दिशेने फेकले. यात तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले.  
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या योगेंद्र यादव यांना चालता येणेही अशक्य झाले होते. गोळ्यांमुळे चाळण झालेला एक हात लटकत होता. अशा परिस्थितीतही आजूबाजूला पडलेल्या रायफल्स पोझीशनवर घेत यादव यांनी समोरून चाल करून आलेल्या पाकिस्तानी सैनिकांवर गोळीबार सुरू केला. त्यामुळे पाकिस्तानी सैनिक गोंधळले आणि मागे हटले. दरम्यान, मुच्छित झालेले योगेंद्र यादव उरातावरून घरंगळत खालच्या दिशेने आले. तेवढ्यात भारताची दुसरी तुकडी तिथे पोहोचली. त्यांनी योगेंद्र यादव यांना प्रथमोपचार करून बेस कॅम्पकडे हलवले. यादरम्यान, शत्रूबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती योगेंद्र यादव यांनी सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर भारतीय जवानांनी कारवाई सुरू करून अल्पावधीत टायगर हिल फत्ते केले.  गंभीर जखमी झाल्यानंतरही पाकिस्तानी सैन्याला थोपवून धरणाऱ्या योगेंद्र यादव यांनी नंतर मृत्यूलाही मात दिली. कारगिल युद्धादरम्यान त्यांनी दाखवलेल्या या साहसासाठी योगेंद्र यादव यांना सैन्य दलातील सर्वोच्च असे परमवीर चक्र देऊन सन्मानीत करण्यात आले. 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndian Armyभारतीय जवानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर