शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Kargil Vijay Diwas : पाकिस्तानच्या 48 जवानांना ठार करत या जवानाने फडकवला होता तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 14:26 IST

कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला आज 20 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशभरात शहीद जवानांना मानवंदना देण्यात येत आहे.

नवी दिल्ली -  कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला आज 20 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशभरात शहीद जवानांना मानवंदना देण्यात येत आहे. या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रमांची शर्थ करत पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांना हुसकावून लावत विजय मिळवला होता. जम्मू-काश्मीरमधीलकारगिल, द्रास आणि बटालिक या विभागात लढल्या गेलेल्या या युद्धात भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय मोहीम राबून शत्रूला सळो की पळो करून सोडले होते. या युद्धात भारताकडून अजेक जवानांनी पराक्रमांची शर्थ केली. त्यांच्यापैकी एक म्हणजे निवृत्त जवान दिगेंद्र सिंह.  राजस्थानमधील सीकर येथील रहिवासी असलेल्या दिगेंद्र सिंह यांनी कारगिलच्या युद्धाता पाकिस्तानशी लढताना अतुल्य पराक्रम गाजवला होता. युद्धादरम्यान दिगेंद्र सिंह यांना पाच गोळ्या लागल्या. अशा परिस्थितीतही जिद्दीने लढा देत त्यांनी पाकिस्तानचे 48 जवान आणि घुसखोरांना ठार मारले होते.  दरम्यान, आजही युद्धाची घोषणा झाल्यास आपण आपल्या बटालियनसोबत युद्ध लढण्यास जाऊ. जर बटालियन आणि सराकारने लढण्याची परवानगी दिली नाही , तर त्यांना समजावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे दिगेंद्र सिंह सांगतात. दिगेंद्र सिंह हे लष्कराती सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या 2 राजपुताना रायफल्सकडून लढले होते.   कारगिल युद्धादरम्यान दिगेंद्र सिंह यांनी पाकिस्तानचा मेजर अन्वयाचे शीर धडापासून वेगळे करून त्यावर तिरंगा फडकवला होता. दिगेंद्र म्हणतात, माझ्याकडे युद्धाचा अनुभव आहे. लढण्याची संधी मिळाली नाही तरी सहकारी जवांनांची काही तरी मदत नक्कीच करू शकतो. दरम्यान, कारगिल युद्धाच्या समाप्तीनंतर दिगेंद्र सिंह यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्याहस्ते महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते. दिगेंद्र सिंह हे 2005 साली लष्करातून निवृत्त झाले होते.    

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत