शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

Kargil Vijay Diwas : शहिदांना मोदींचा सलाम, अटलबिहारी वाजपेयींचाही केला सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 10:55 IST

Kargil Vijay Diwas : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल युद्धातील जवानांना आदरांजली वाहिली. 1999 सालच्या युद्धातील शहिदांच्या बलिदानाला देश सदैव स्मरणात ठेवेल. तर ऑपरेशन विजयमधून भारतीय सैन्याने आपली वीरता दाखवून दिल्याचे मोदींनी म्हटले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल युद्धात वीरमरण पत्कारणाऱ्या जवानांना आदरांजली वाहिली. कारगिल युद्धातील शहिदांच्या बलिदानाला देश सदैव स्मरणात ठेवेल. या 'ऑपरेशन विजय'मधून भारतीय सैन्याने आपली वीरता दाखवून दिली आहे. कूटनितीने भारतभूमीकडे नजर उठवणाऱ्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ हेच भारतीय सैन्याने जगाले दाखवून दिल्याचे ट्विट मोदींनी केले. तसेच अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.

मोदींनी ट्विट करुन कारगिल युद्धातील 527 जवांनाच्या बलिदान आणि शौर्याला सलाम केला आहे. तसेच जवानांच्या धाडसी कार्याचे कौतूक करताना भारत हा शांतीप्रिय देश असून जर कोणी आम्हाला अशांत करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ, असेही मोदींनी आपल्या ट्विटमधून सूचवले आहे. तसेच संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनीही दिल्लीतील कारगिल युद्धातील जवानांना श्रद्धांजली वाहिली. सितारमण यांच्यासह लष्करप्रमुख बिपीन रावत, भारतीय नेव्ही दलाचे प्रमुख सुनिल लांबा आणि वायूदलाचे प्रमुख मार्शल बिरेंदर सिंग धनोआ यांनीही शहिदांना मानवंदना दिली. भारतीय जवानांच्या शौर्याची आणि विजयाची गाथा सांगणारा आजचा दिवस आहे.

देशभरात 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला होता. आजच्याचदिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानला काश्मीरमधून पळता भुई थोडी करुन सोडले होते. तर काश्मीरमध्ये तिरंगा फडवला होता. कारगिलच्या युद्धात 527 जवानांना वीरमरण आले, तर 1300 पेक्षा अधिक जवान जखमी झाले होते. मात्र, भारतीय सैन्याने मरते दम तक लढेंगे हे आपल्या बलिदानातून दाखवून दिले. या वीर जवानांना स्मरण करत देशातून कारगिल शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सरकारमधील मंत्री, राजकीय नेते आणि सर्वसामान्य नागरिकांकडूनही शहिदांना मानवंदना अर्पण केली जात आहे. 

राजनाथसिंह यांच्याकडून शहिदांना मानवंदना

 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनNarendra Modiनरेंद्र मोदीAtal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयी