शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

Kargil Vijay Diwas : शहिदांना मोदींचा सलाम, अटलबिहारी वाजपेयींचाही केला सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 10:55 IST

Kargil Vijay Diwas : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल युद्धातील जवानांना आदरांजली वाहिली. 1999 सालच्या युद्धातील शहिदांच्या बलिदानाला देश सदैव स्मरणात ठेवेल. तर ऑपरेशन विजयमधून भारतीय सैन्याने आपली वीरता दाखवून दिल्याचे मोदींनी म्हटले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल युद्धात वीरमरण पत्कारणाऱ्या जवानांना आदरांजली वाहिली. कारगिल युद्धातील शहिदांच्या बलिदानाला देश सदैव स्मरणात ठेवेल. या 'ऑपरेशन विजय'मधून भारतीय सैन्याने आपली वीरता दाखवून दिली आहे. कूटनितीने भारतभूमीकडे नजर उठवणाऱ्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ हेच भारतीय सैन्याने जगाले दाखवून दिल्याचे ट्विट मोदींनी केले. तसेच अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.

मोदींनी ट्विट करुन कारगिल युद्धातील 527 जवांनाच्या बलिदान आणि शौर्याला सलाम केला आहे. तसेच जवानांच्या धाडसी कार्याचे कौतूक करताना भारत हा शांतीप्रिय देश असून जर कोणी आम्हाला अशांत करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ, असेही मोदींनी आपल्या ट्विटमधून सूचवले आहे. तसेच संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनीही दिल्लीतील कारगिल युद्धातील जवानांना श्रद्धांजली वाहिली. सितारमण यांच्यासह लष्करप्रमुख बिपीन रावत, भारतीय नेव्ही दलाचे प्रमुख सुनिल लांबा आणि वायूदलाचे प्रमुख मार्शल बिरेंदर सिंग धनोआ यांनीही शहिदांना मानवंदना दिली. भारतीय जवानांच्या शौर्याची आणि विजयाची गाथा सांगणारा आजचा दिवस आहे.

देशभरात 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला होता. आजच्याचदिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानला काश्मीरमधून पळता भुई थोडी करुन सोडले होते. तर काश्मीरमध्ये तिरंगा फडवला होता. कारगिलच्या युद्धात 527 जवानांना वीरमरण आले, तर 1300 पेक्षा अधिक जवान जखमी झाले होते. मात्र, भारतीय सैन्याने मरते दम तक लढेंगे हे आपल्या बलिदानातून दाखवून दिले. या वीर जवानांना स्मरण करत देशातून कारगिल शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सरकारमधील मंत्री, राजकीय नेते आणि सर्वसामान्य नागरिकांकडूनही शहिदांना मानवंदना अर्पण केली जात आहे. 

राजनाथसिंह यांच्याकडून शहिदांना मानवंदना

 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनNarendra Modiनरेंद्र मोदीAtal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयी