शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 05:53 IST

कारगिल विजयदिनी वीर मातेने दिला संदेश

लामोचेन (कारगील) : १९९९च्या कारगील युद्धात वयाच्या २०व्या वर्षी विनोद कंवरच्या पतीला हौतात्म्य प्राप्त झाले. दोघांच्या पोटी आलेला एक मुलगा आता मोठा झाला आहे. हा तेजवीरसिंह राठोडही लष्करात दाखल झाला असून त्याला या वीरमातेनेही प्रोत्साहन दिले. ही माता म्हणते, ‘आपण स्वार्थी होऊ शकत नाहीत. अगोदर राष्ट्राचाच विचार आणि देशाचे संरक्षण महत्त्वाचे आहे.’ तेजवीर याचे पिता नायक भंवरसिंह राठोड १० जुलै १९९९ रोजी पॉईंट ४७०० वर यशस्वीरीत्या पुन्हा ताबा मिळवताना देशासाठी शहीद झाले होते. आज विनोद कंवर यांचे वय ४६ वर्षांचे आहे. 

तेव्हा एक वर्ष वय...१० जुलै १९९९ रोजी पिता भंवरसिंह शहीद झाले तेव्हा तेजवीरचे वय अवघे सहा महिन्याचे होते. त्याने पित्याला पाहिलेलेही नाही. तो मोठा होईल तसे त्याला लष्कराचे आकर्षण वाटू लागले. मग आईनेही प्रोत्साहन दिले आणि एका शहीद जवानाचा पुत्र आता लष्करात दाखल झाला आहे. डेहराडूनमध्ये भारतीय सैन्य अकादमीत सध्या त्याचे प्रशिक्षण सुरू असून लवकरच तो पूर्ण वेळ लष्करात दाखल होईल.

कंवरची तिसरी पिढीविनोद कंवर सांगतात, ‘देशासाठी सेवा देणारी तेजवीरच्या रुपाने आमची ही तिसरी पिढी आहे. माझे वडीलही सैनिक होते. पतीने देशासाठी बलिदान दिले. आता मुलगाही देशाची सेवा करेल.’युद्धात काय घडले होते?कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी केलेल्या घुसखोरीनंतर भारतीय लष्कराने या अत्यंत आव्हानात्मक अशा बर्फाळ पर्वत भागांत शत्रूला हुसकावून लावण्यासाठी मोहीम सुरू केली. जवळपास तीन महिने ही मोहीम सुरू होती. २६ जुलै १९९९ रोजी हे ‘ऑपरेशन विजय’ यशस्वीरीत्या पूर्ण झाले होते. नायक भंवरसिंह यांनी या कारवाईदरम्यान बलिदान दिले होते.‘ड्रोन शो’ने वेधले लक्षकारगिल विजय दिनानिमित्त लष्कराने द्रास भागात आयोजित केलेल्या ड्रोन शोमध्ये भारतीय तंत्रज्ञानाच्या विकासाचे आधुनिक रूप पहावयास मिळाले. या ड्रोनने अनेक क्षमतांचे दर्शन घडवले. सुमारे ४ हजार मीटर उंचीवर हे ड्रोन सहजपणे ऑपरेट होऊ शकतात. या ड्रोन शोमध्ये रोबोटिक श्वानही सहभागी होते. यांचा वापर अत्यंत दुर्गम भागांत स्फोटके शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. याने लडाखसारख्या दुर्गम भागांत वातावरणाचे आव्हान असताना सैनिकांना असलेला धोका कमी करता येणार आहे. १९९९मध्ये शत्रूच्या घुसखोरीनंतर भारतीय लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट हे ड्रोन म्हणजे एक उडते सुरक्षा कवच ठरणार आहे.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndiaभारतIndian Armyभारतीय जवान