शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याला आगीतून वाचवण्यासाठी कुशीत घेऊन धावला; शूरवीराचा फोटो पाहून तुम्हीही कराल 'कडक सॅल्युट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 15:51 IST

नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून तुम्हीही त्या पोलिसाला नक्कीच कडक सॅल्युट कराल.

जनतेच्या संरक्षणासाठी पोलीस सदैव तत्पर असतात. नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून तुम्हीही त्या पोलिसाला नक्कीच कडक सॅल्युट कराल. राजस्थानमध्ये (Rajasthan) नवसंवत्सर निमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीवर (Bike Rally) झालेल्या दगडफेकीनंतर जाळपोळीचे प्रकार घडले. शनिवारी या घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) वर व्हायरल झाले. यातच एक असा फोटोही समोर आला जो पाहून लोकांनी पोलिसांच्या शूरपणाचं कौतुक केलं. 

दरम्यान, व्हायरल झालेल्या फोटोंपैकी हा फोटो राजस्थान पोलिसातील हवालदार नेत्रेश शर्मा यांचा आहे. फोटोमध्ये हवालदार नेत्रेश एका चिमुकल्याला आगीमधून वाचवून आपल्या कुशीत घेऊन सुरक्षित स्थळी नेताना दिसत आहेत. बाजारात खरेदीसाठी आलेल्या दोन महिला हिंसाचारानंतर झालेल्या जाळपोळीपासून बचाव करण्यासाठी जवळच्या घरात लपल्या. त्यावेळी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्याचं सांगण्यात येत आहे.

घरही चारही बाजूंनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावर त्यांच्यासोबत असलेल्या महिला आणि लहान मूल रडायला लागले. मुलाचा आवाज ऐकून हवालदार नेत्रेश धावत आले आणि मुलाला आपल्या कुशीत घेऊन बाहेरच्या दिशेने धावले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलाही त्यांच्या मागे धावल्या. यामुळे तिघांचेही प्राण बचावले.राजस्थान पोलिसांकडूनही कौतुकराजस्थान पोलिसांनीही ट्वीट करून आपल्या कॉन्स्टेबलच्या धैर्याला सलाम केला आहे. राजस्थान पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांचा फोटोही शेअर केला आहे. करौली येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं.नेत्रेश यांनी सांगितला संपूर्ण प्रकार"मी सिग्मा गाडीवर तैनात होतो. बाईक रॅली सकाळी साडेतीन वाजता रवाना झाली. ५ वाजता ती हटवाड्यात पोहोचली. मी २०० मीटर पुढे गणेश गेटवर होतो. हिंसाचाराची माहिती मिळताच मी घटनास्थळी पोहोचलो. त्या ठिकाणी आगही लागली होती. याचदरम्यान, त्या ठिकाणी आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेलं घर पाहिलं. महिलांच्या रडण्याचाही आवाज येत होता आणि एका महिलेच्या कडेवर चार वर्षांचं बाळही होतं," असं नेत्रेश म्हणाले.

भीषण परिस्थितीत पाहता मी त्वरित निर्णय घेतला आणि सिग्मा गाडीतून उतरून धावत आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेल्या घराकडे गेलो. त्या महिलांच्या चेहऱ्यावर जी भीती होती ती कधीही विसरता येणार नसल्याचंही ते म्हणाले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानSocial Mediaसोशल मीडिया