शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

“खरेच आता राज्यपालांची गरज राहिली आहे का”; ६ मुद्दे अन् कपिल सिब्बल यांचा थेट प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 13:06 IST

Kapil Sibal: राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत असून, राज्यपालांच्या पदाविषयीच कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

Kapil Sibal: देशातील काही राज्यांमध्ये राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा वाद असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, तसेच तामिळनाडू, केरळ, पंजाब या राज्यांमध्ये राज्यपालांकडून अनेक महत्त्वाची विधेयके कोणत्याही निर्णयाविना प्रलंबित ठेवली जात असल्यावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यावरून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी एक्सवर एक पोस्ट लिहून खरेच आता राज्यपालांची गरज राहिली आहे का, अशी विचारणा केली आहे. 

तामिळनाडू, केरळ, पंजाब राज्यांमधील राज्यपालांकडून अनेक महत्त्वाची विधेयके कोणत्याही निर्णयाविना प्रलंबित ठेवली जात आहे. या विरोधात या राज्यांमधील सरकारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही विधेयके तर तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांना सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित विधेयकांवर लवकरात लवकर निर्णय घ्या, असे आदेश दिले. यासंदर्भात कपिल सिब्बल यांनी एक पोस्ट लिहिली आहे. 

खरेच आता राज्यपालांची गरज राहिली आहे का

कपिल सिब्बल यांनी एक्सवर म्हटले आहे की, बरीच वर्षे विधेयके मंजूर न करणे, राजकारण करणे, पहाटे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी करणे, विरोधकांची सरकारे पाडणे, आरएसएसशी एकनिष्ठ असल्याची सार्वजनिक ग्वाही देणे, घटनात्मक औचित्याचा अपमान करणे, असे प्रकार घडत असताना, राज्यपालांची खरेच गरज आहे का? असा थेट प्रश्न कपिल सिब्बल यांनी केला आहे. 

दरम्यान, तामिळनाडूच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. याचिकेच्या सुनावणीवेळी, राज्यपाल म्हणतात की, १३ नोव्हेंबर रोजी ही विधेयके निकाली काढली. १० नोव्हेंबरला आम्ही यासंदर्भात आदेश दिले होते. ही विधेयके जानेवारी २०२० पासून प्रलंबित होती. याचा अर्थ आम्ही आदेश काढल्यानंतरच राज्यपालांनी विधेयकांवर निर्णय घेतला. गेली तीन वर्षं राज्यपाल काय करत होते? या प्रकरणातील पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात येण्याची राज्यपाल वाट का पाहात होते?, अशी विचारणा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली.

 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बल