शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास पोरांनो! कायद्याचं शिक्षण घेऊन ११ वर्षांनी वडिलांची केली निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 19:43 IST

एका व्यक्तीने ११ वर्षे जेलमध्ये काढली. पण आता त्यांच्या मुलांनी धडपड करून वडिलांना न्याय मिळवून दिला आहे.

कानपूरमधील एका व्यक्तीने ११ वर्षे जेलमध्ये काढली. पण आता त्यांच्या मुलांनी धडपड करून वडिलांना न्याय मिळवून दिला आहे. कायद्याचं शिक्षण घेऊन ११ वर्षांनी वडिलांची निर्दोष मुक्तता केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. वडील जेलमध्ये गेले तेव्हा मुलं लहान होती. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वडिलांची सुटका करता आली नाही. 

आपल्या वडिलांची निर्दोष मुक्तता व्हावी आणि त्यांना जेलमधून लवकर बाहेर काढता यावं यासाठी दोन्ही मुलांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला, शिक्षणं घेतलं. एवढंच नाही तर पदवी घेतल्यानंतर वडिलांची केस लढवली आणि खोट्या सामूहिक बलात्कार प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता केली. कानपूरच्या बिथूर पोलीस स्टेशन परिसरातील हे प्रकरण आहे. 

२०१३ मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये अनिल गौर यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने शेतीवरून झालेल्या वादामुळे जेलमध्ये टाकलं. त्याच्यावर सामूहिक बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे अनिल यांना खोट्या खटल्यात जेलमध्ये जावं लागलं. पती जेलमध्ये गेल्यावर पत्नी एकटी पडली. तिने पतीसाठी घरोघरी मदत मागितली, पण काहीच फायदा झाला नाही. 

दोन्ही मुलं घरातील परिस्थिती पाहत होते. पण पैसे नसल्यामुळे वकील देखील त्यांची केस घेत नव्हते. याच दरम्यान मुलं मोठी होत असताना त्यांनी वडिलांची निर्दोष मुक्तता करण्यासाठी कायद्याचं शिक्षण घेतलं. अनिल यांची मुलगी उपासना आणि मुलगा ऋषभ वकील झाले. त्यांनी आपल्या वडिलांसाठी आयुष्यातील पहिली केस लढली आणि ११ वर्षांनंतर कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

सामूहिक बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटल्यानंतर आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर अनिल गौर म्हणाले की, त्यांची मुलं त्यांच्यासाठी देवदूतापेक्षा कमी नाहीत. देव प्रत्येकाला त्यांच्यासारखीच मुलं देवो. तर मुलांनी सांगितलं की, गेल्या ११ वर्षांत अनेक समस्या जवळून पाहिल्या आहेत. घरात पैसे नव्हते आणि पैशांअभावी वकील कोणतंही काम करत नव्हते. म्हणूनच निश्चय केला की, आता आपणच आपल्या वडिलांची निर्दोष मुक्तता करून त्यांना जेलमधून बाहेर काढू. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशjailतुरुंग