शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शानदार जबरदस्त जिंदाबाद! तीन वर्षात एकट्यानं खोदला १६ एकरांचा तलाव, बुंदेलखंडच्या 'मांझी'ची प्रेरणादायी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 13:35 IST

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका साधूने एकट्याने तीन वर्षे कोरडा प्राचीन तलाव खोदला असून ते आता बुंदेलखंडचे 'मांझी' म्हणून प्रसिद्धीस आले आहेत.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका साधूने एकट्याने तीन वर्षे कोरडा प्राचीन तलाव खोदला असून ते आता बुंदेलखंडचे 'मांझी' म्हणून प्रसिद्धीस आले आहेत. दररोज फावडा घेऊन खोदकाम करुन त्यांनी तलावाचं रुपडंच पालटून टाकलं आहे. त्यामुळे आता तलाव वर्षभर पाण्याने भरलेला असतो. गावातील लोकांच्या गरजाही या तलावामुळे पूर्ण होत आहेत. या साधूला शासनाकडूनही सन्मान मिळाला आहे.

हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पचखुरा गावात एका वृद्ध साधूने प्राचीन तलावाचे रुपडे पालण्याचे मोठे काम केले आहे. या गावात १६ एकर क्षेत्रात एक तलाव आहे. हा तलाव देखील शेकडो वर्षे जुना आहे, जो कलारण दाई या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तलावाचे कधीही खोदकाम न झाल्याने त्याचे रूपांतर शेतात झाले. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, एकेकाळी हा तलाव वर्षभर पाण्याने भरलेला असायचा. मात्र गेल्या काही दशकांपासून या प्राचीन तलावात फक्त धूळ उडत होती.

हिवाळ्याच्या काळात गावातील तरुण या कोरड्या तलावाला क्रिकेटचे पीच बनवत असत, त्यामुळे तलाव नकाशावरूनही गायब झाला होता. मात्र तलावाच्या दुर्दशेबाबत कोणीही पुढे आले नाही. तलावाचे रूपांतर शेतात झाल्याने ग्रामस्थ व गुरांसमोर पाण्याचे संकट उभे ठाकले होते. या गावात अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाण्याचे संकट होते, मात्र गावातील कृष्ण नंद महाराज यांनी हे संकट आव्हान म्हणून स्वीकारत फावडा हाती घेतला. त्यानंतर तीन वर्षांत तलावाचे स्वरूपच पालटले आहे. 

तलाव खोदण्यासाठी संताने तीन वर्ष केले खोदकामपाचखुरा बुजुर्ग गावचे रहिवासी संत कृष्ण नंद महाराज यांनी 1982 मध्ये संन्यास घेतला. 1986 मध्ये हरिद्वारमध्येच झालेल्या कुंभमेळ्यात त्यांनी महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज यांच्याकडून गुरुदक्षिणा घेतली आणि तेथेच राहू लागले होते. 2014 मध्ये ते हरिद्वारहून गावी परतले आणि त्यांनी गावातील रामजानकी मंदिराला आपले आश्रयस्थान बनवले. मंदिराजवळील पुरातन तलावाची दुर्दशा पाहून त्यांनी मोठा निर्णय घेत 2015 साली फावडे उचलून एकट्याने तलाव खोदण्यास सुरुवात केली. सलग तीन वर्षे कोरड्या तलावाचे उत्खनन करून गावातील या संताने तलावाच्या तळापासून तीन हजारांहून अधिक ट्रॉली माती खोदून त्याचे पुन्हा तलावात रूपांतर केले आहे.

संत कृष्ण नंद महाराज आता बुंदेलखंडचे 'मांझी' झालेतसंत कृष्ण नंद महाराज यांच्या कामाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. तीन वर्षांत कोरड्या तलावाचे उत्खनन करून त्याला जुन्या स्वरूपात आणल्यानंतर आता गावकरी त्यांना बुंदेलखंडचे 'मांझी' म्हणून लागले आहेत. गेल्यावर्षी हा तलाव उन्हाळ्यात पाण्याने भरला होता. यावेळी तलावातील पाणी कमी होत असल्याचे पाहून संताने पुन्हा फावडे उचलले आहे. गेल्या जानेवारीपासून ते तलावात फावडे घेऊन सातत्याने खोदकाम करत आहेत. त्यामुळे कडक उन्हात ते सुकण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. गावातील इंदलसिंग यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी सांगितले की, हा तलाव शेकडो वर्षे जुना असून, त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले होते. मात्र अवघ्या तीन वर्षांत बाबा कृष्ण नंद महाराज यांनी स्वत:च फावडे वापरून तलावाचे स्वरूप पालटले आहे.

स्वयंसेवी संस्थांनीही केला सन्मानप्राचीन वारसा आणि तलाव जपण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे संत कृष्ण नंद महाराज म्हणतात. 2016 मध्ये तत्कालीन राज्यमंत्री राजकुमारी कुशवाह यांनी गावात येऊन त्यांना वीस हजार रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला होता, तर डेहराडूनच्या मीनाक्षी अरोरा यांनीही गावात येऊन त्यांचा गौरव केला होता. गावातील तलावाचे स्वरूप बदलल्याच्या वृत्तावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही ट्विट केले होते. तर काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीही गावात येऊन त्यांचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी