शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शानदार जबरदस्त जिंदाबाद! तीन वर्षात एकट्यानं खोदला १६ एकरांचा तलाव, बुंदेलखंडच्या 'मांझी'ची प्रेरणादायी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 13:35 IST

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका साधूने एकट्याने तीन वर्षे कोरडा प्राचीन तलाव खोदला असून ते आता बुंदेलखंडचे 'मांझी' म्हणून प्रसिद्धीस आले आहेत.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका साधूने एकट्याने तीन वर्षे कोरडा प्राचीन तलाव खोदला असून ते आता बुंदेलखंडचे 'मांझी' म्हणून प्रसिद्धीस आले आहेत. दररोज फावडा घेऊन खोदकाम करुन त्यांनी तलावाचं रुपडंच पालटून टाकलं आहे. त्यामुळे आता तलाव वर्षभर पाण्याने भरलेला असतो. गावातील लोकांच्या गरजाही या तलावामुळे पूर्ण होत आहेत. या साधूला शासनाकडूनही सन्मान मिळाला आहे.

हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पचखुरा गावात एका वृद्ध साधूने प्राचीन तलावाचे रुपडे पालण्याचे मोठे काम केले आहे. या गावात १६ एकर क्षेत्रात एक तलाव आहे. हा तलाव देखील शेकडो वर्षे जुना आहे, जो कलारण दाई या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तलावाचे कधीही खोदकाम न झाल्याने त्याचे रूपांतर शेतात झाले. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, एकेकाळी हा तलाव वर्षभर पाण्याने भरलेला असायचा. मात्र गेल्या काही दशकांपासून या प्राचीन तलावात फक्त धूळ उडत होती.

हिवाळ्याच्या काळात गावातील तरुण या कोरड्या तलावाला क्रिकेटचे पीच बनवत असत, त्यामुळे तलाव नकाशावरूनही गायब झाला होता. मात्र तलावाच्या दुर्दशेबाबत कोणीही पुढे आले नाही. तलावाचे रूपांतर शेतात झाल्याने ग्रामस्थ व गुरांसमोर पाण्याचे संकट उभे ठाकले होते. या गावात अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाण्याचे संकट होते, मात्र गावातील कृष्ण नंद महाराज यांनी हे संकट आव्हान म्हणून स्वीकारत फावडा हाती घेतला. त्यानंतर तीन वर्षांत तलावाचे स्वरूपच पालटले आहे. 

तलाव खोदण्यासाठी संताने तीन वर्ष केले खोदकामपाचखुरा बुजुर्ग गावचे रहिवासी संत कृष्ण नंद महाराज यांनी 1982 मध्ये संन्यास घेतला. 1986 मध्ये हरिद्वारमध्येच झालेल्या कुंभमेळ्यात त्यांनी महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज यांच्याकडून गुरुदक्षिणा घेतली आणि तेथेच राहू लागले होते. 2014 मध्ये ते हरिद्वारहून गावी परतले आणि त्यांनी गावातील रामजानकी मंदिराला आपले आश्रयस्थान बनवले. मंदिराजवळील पुरातन तलावाची दुर्दशा पाहून त्यांनी मोठा निर्णय घेत 2015 साली फावडे उचलून एकट्याने तलाव खोदण्यास सुरुवात केली. सलग तीन वर्षे कोरड्या तलावाचे उत्खनन करून गावातील या संताने तलावाच्या तळापासून तीन हजारांहून अधिक ट्रॉली माती खोदून त्याचे पुन्हा तलावात रूपांतर केले आहे.

संत कृष्ण नंद महाराज आता बुंदेलखंडचे 'मांझी' झालेतसंत कृष्ण नंद महाराज यांच्या कामाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. तीन वर्षांत कोरड्या तलावाचे उत्खनन करून त्याला जुन्या स्वरूपात आणल्यानंतर आता गावकरी त्यांना बुंदेलखंडचे 'मांझी' म्हणून लागले आहेत. गेल्यावर्षी हा तलाव उन्हाळ्यात पाण्याने भरला होता. यावेळी तलावातील पाणी कमी होत असल्याचे पाहून संताने पुन्हा फावडे उचलले आहे. गेल्या जानेवारीपासून ते तलावात फावडे घेऊन सातत्याने खोदकाम करत आहेत. त्यामुळे कडक उन्हात ते सुकण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. गावातील इंदलसिंग यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी सांगितले की, हा तलाव शेकडो वर्षे जुना असून, त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले होते. मात्र अवघ्या तीन वर्षांत बाबा कृष्ण नंद महाराज यांनी स्वत:च फावडे वापरून तलावाचे स्वरूप पालटले आहे.

स्वयंसेवी संस्थांनीही केला सन्मानप्राचीन वारसा आणि तलाव जपण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे संत कृष्ण नंद महाराज म्हणतात. 2016 मध्ये तत्कालीन राज्यमंत्री राजकुमारी कुशवाह यांनी गावात येऊन त्यांना वीस हजार रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला होता, तर डेहराडूनच्या मीनाक्षी अरोरा यांनीही गावात येऊन त्यांचा गौरव केला होता. गावातील तलावाचे स्वरूप बदलल्याच्या वृत्तावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही ट्विट केले होते. तर काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीही गावात येऊन त्यांचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी