शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कन्हैया कुमारवर डाव्या नेत्यांची घणाघाती टीका, केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 22:17 IST

Kanhaiya Kumar News: कन्हैया कुमारने भाकप सोडल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी कन्हैया कुमारवर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - जेएनयूमधील विद्यार्थी चळवळीतून देशभरात चर्चेत आलेला विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने आज डाव्या भाकपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, कन्हैया कुमारने भाकप सोडल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी कन्हैया कुमारवर जोरदार टीका केली आहे. ( Kanhaiya Kumar, who has joined the Congress, has been sharply criticized by Left leaders)

ते म्हणाले की, कन्हैया कुमारने आमच्या पक्षातून स्वत:च स्वत:ला बाहेर काढून घेतले आहे. सीपीआयने नेहमीच जातीविहीन आणि वर्गविहीन समाजासाठी लढाई लढली आहे. कन्हैया कुमारच्या स्वत:च्या काही  वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि अपेक्षा राहिल्या असतील. यावरून हे समजते की, त्याचा कम्युनिस्ट आणि वर्किंग क्लासच्या विचारसरणीवर विश्वास नव्हता. कन्हैया कुमारच्या येण्याआधीही कम्युनिस्ट पक्ष होता आणि त्याच्या जाण्यानंतरही पक्ष कायम राहील. त्याच्या जाण्याने पक्ष संपुष्टात येणार नाही. आमचा पक्ष निस्वार्थ संघर्ष आणि बलिदानासाठी आहे. कन्हैया आमच्या पक्षासाठी स्पष्ट आणि ईमानदार राहिला नाही.

तत्पूर्वी आज कन्हैया कुमार याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी तो म्हणाला की, आज देशातील कोट्यवधी तरुणांना असं वाटतंय की, काँग्रेस पक्ष वाचला नाही तर देशसुद्धा वाचणार नाही. असा परिस्थितीत मी लोकशाही भक्कम करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच देशात वैचारिक संघर्षाला काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते. यावेळी कन्हैया कुमार याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचेही आभार मानले.

कन्हैया म्हणाला की, मला वाटते की, या देशाच्या सत्तेमध्ये एका अशा विचारसरणीचे लोक आहेत जे या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, त्याची मूल्ये, इतिहास आणि वर्तमान संपवत आहेत. या विचारसरणीविरोधात लढले पाहिजे. देशातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लोकशाहीवादी पक्षात मी अशासाठी प्रवेश करत आहे की, जर हा पक्ष राहिला नाही तर हा देशही राहणार नाही.

मूळचा बिहारमधील असलेला कन्हैया कुमार जेएनयूमधील कथित देशविरोधी घोषणाबाजीनंतर झालेल्या अटकेच्या कारवाईमुळे चर्चेत आला होता. कन्हैयाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय मतदारसंघातून भाजपा नेते गिरिराज सिंह यांना आव्हान दिले होते. मात्र त्या निवडणुकीत कन्हैयाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण