शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

Kangana Ranaut: 'असे बोलणे टाळा'; कंगना रणौत यांचे भाजप नेत्याने टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:03 IST

Kangana Ranaut Controversy: दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना खासदार कंगना रणौत यांनी काही मोठी विधाने केली. त्यामुळे वादाला तोंड फुटले असून, आता भाजपने कंगना रणौत यांचे कान टोचले आहेत.

BJP on Kangana Ranaut's Statement: भाजपच्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत यांनी केलेल्या विधानाने वादाला तोंड फुटले आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाबद्दल कंगना रणौत यांनी एका मुलाखतीत भाष्य केले. त्यातील काही विधानावर बोट ठेवत काँग्रेससह विरोधकांनी भाजपलाच घेरलं. कंगना रणौतच्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादापासून भाजपने स्वतःला बाजूला केले. त्याचबरोबर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने कंगना रणौत यांची कानउघाडणी केली. 

खासदार कंगना रणौत यांनी एका मुलाखतीत असे म्हटले की, शेतकरी आंदोलनाच्या काळात भाजपचे वरिष्ठ पातळीवरील नेतृत्व खंबीर नसते, तर पंजाबमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती तयार झाली असती. 

शेतकरी आंदोलनाबद्दल काय बोलल्या खासदार कंगना रणौत?

मुलाखतीत बोलताना खासदार कंगना रणौत म्हणाल्या की, "सगळ्यानीच बघितले की, शेतकरी आंदोलनाच्या काळात काय झाले. आंदोलनाच्या आडून हिंसा भडकावली गेली. तिथे बलात्कार होत होते. लोकांना मारून फासावर लटकावले जात होते. सरकारने जेव्हा तीन कृषि कायदे मागे घेतले, त्यावेळी सगळ्या उपद्रवी आंदोलकांना धक्का बसला, कारण त्यांचे नियोजन खूप दीर्घकाळाचे होते."

भाजपची भूमिका काय?

कंगना रणौत यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेससह विरोधकांनी टीका केली. पंजाब काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राज कुमार वेरका यांनी कंगना रणौत विरोधात गुन्हा दाखल करून एनएसए कायद्याखाली कारवाई करण्याची मागणी केली. कंगनाने पंजाबमधील शेतकऱ्यांना बदनाम केले. त्यांना डिब्रूगड तुरुंगात पाठवायला पाहिजे, असे ते म्हणाले. काँग्रेसबरोबर इतर प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांकडून यावर टीका करण्यात आली. 

भाजपचे ज्येष्ठ नेते हरजीत सिंह ग्रेवाल यांनी कंगना रणौतच्या विधानाशी भाजपचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. 

"शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचे कंगनाचे काम नाही. कंगनाचे हे वैयक्तिक विधान आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या बाजूने आहे. कंगनाने अशी विधाने करू नये. असे बोलणे टाळले पाहिजे", अशी भूमिका ग्रेवाल यांनी मांडली. काही माध्यमांनी असे वृत्त दिले आहे की, पंजाब भाजपने कंगना रणौतच्या या विधानाबद्दल वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणKangana Ranautकंगना राणौतFarmers Protestशेतकरी आंदोलनPunjabपंजाबBJPभाजपा