शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Kangana Ranaut: 'असे बोलणे टाळा'; कंगना रणौत यांचे भाजप नेत्याने टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:03 IST

Kangana Ranaut Controversy: दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना खासदार कंगना रणौत यांनी काही मोठी विधाने केली. त्यामुळे वादाला तोंड फुटले असून, आता भाजपने कंगना रणौत यांचे कान टोचले आहेत.

BJP on Kangana Ranaut's Statement: भाजपच्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत यांनी केलेल्या विधानाने वादाला तोंड फुटले आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाबद्दल कंगना रणौत यांनी एका मुलाखतीत भाष्य केले. त्यातील काही विधानावर बोट ठेवत काँग्रेससह विरोधकांनी भाजपलाच घेरलं. कंगना रणौतच्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादापासून भाजपने स्वतःला बाजूला केले. त्याचबरोबर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने कंगना रणौत यांची कानउघाडणी केली. 

खासदार कंगना रणौत यांनी एका मुलाखतीत असे म्हटले की, शेतकरी आंदोलनाच्या काळात भाजपचे वरिष्ठ पातळीवरील नेतृत्व खंबीर नसते, तर पंजाबमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती तयार झाली असती. 

शेतकरी आंदोलनाबद्दल काय बोलल्या खासदार कंगना रणौत?

मुलाखतीत बोलताना खासदार कंगना रणौत म्हणाल्या की, "सगळ्यानीच बघितले की, शेतकरी आंदोलनाच्या काळात काय झाले. आंदोलनाच्या आडून हिंसा भडकावली गेली. तिथे बलात्कार होत होते. लोकांना मारून फासावर लटकावले जात होते. सरकारने जेव्हा तीन कृषि कायदे मागे घेतले, त्यावेळी सगळ्या उपद्रवी आंदोलकांना धक्का बसला, कारण त्यांचे नियोजन खूप दीर्घकाळाचे होते."

भाजपची भूमिका काय?

कंगना रणौत यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेससह विरोधकांनी टीका केली. पंजाब काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राज कुमार वेरका यांनी कंगना रणौत विरोधात गुन्हा दाखल करून एनएसए कायद्याखाली कारवाई करण्याची मागणी केली. कंगनाने पंजाबमधील शेतकऱ्यांना बदनाम केले. त्यांना डिब्रूगड तुरुंगात पाठवायला पाहिजे, असे ते म्हणाले. काँग्रेसबरोबर इतर प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांकडून यावर टीका करण्यात आली. 

भाजपचे ज्येष्ठ नेते हरजीत सिंह ग्रेवाल यांनी कंगना रणौतच्या विधानाशी भाजपचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. 

"शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचे कंगनाचे काम नाही. कंगनाचे हे वैयक्तिक विधान आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या बाजूने आहे. कंगनाने अशी विधाने करू नये. असे बोलणे टाळले पाहिजे", अशी भूमिका ग्रेवाल यांनी मांडली. काही माध्यमांनी असे वृत्त दिले आहे की, पंजाब भाजपने कंगना रणौतच्या या विधानाबद्दल वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणKangana Ranautकंगना राणौतFarmers Protestशेतकरी आंदोलनPunjabपंजाबBJPभाजपा