शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kangana Ranaut: 'असे बोलणे टाळा'; कंगना रणौत यांचे भाजप नेत्याने टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:03 IST

Kangana Ranaut Controversy: दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना खासदार कंगना रणौत यांनी काही मोठी विधाने केली. त्यामुळे वादाला तोंड फुटले असून, आता भाजपने कंगना रणौत यांचे कान टोचले आहेत.

BJP on Kangana Ranaut's Statement: भाजपच्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत यांनी केलेल्या विधानाने वादाला तोंड फुटले आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाबद्दल कंगना रणौत यांनी एका मुलाखतीत भाष्य केले. त्यातील काही विधानावर बोट ठेवत काँग्रेससह विरोधकांनी भाजपलाच घेरलं. कंगना रणौतच्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादापासून भाजपने स्वतःला बाजूला केले. त्याचबरोबर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने कंगना रणौत यांची कानउघाडणी केली. 

खासदार कंगना रणौत यांनी एका मुलाखतीत असे म्हटले की, शेतकरी आंदोलनाच्या काळात भाजपचे वरिष्ठ पातळीवरील नेतृत्व खंबीर नसते, तर पंजाबमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती तयार झाली असती. 

शेतकरी आंदोलनाबद्दल काय बोलल्या खासदार कंगना रणौत?

मुलाखतीत बोलताना खासदार कंगना रणौत म्हणाल्या की, "सगळ्यानीच बघितले की, शेतकरी आंदोलनाच्या काळात काय झाले. आंदोलनाच्या आडून हिंसा भडकावली गेली. तिथे बलात्कार होत होते. लोकांना मारून फासावर लटकावले जात होते. सरकारने जेव्हा तीन कृषि कायदे मागे घेतले, त्यावेळी सगळ्या उपद्रवी आंदोलकांना धक्का बसला, कारण त्यांचे नियोजन खूप दीर्घकाळाचे होते."

भाजपची भूमिका काय?

कंगना रणौत यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेससह विरोधकांनी टीका केली. पंजाब काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राज कुमार वेरका यांनी कंगना रणौत विरोधात गुन्हा दाखल करून एनएसए कायद्याखाली कारवाई करण्याची मागणी केली. कंगनाने पंजाबमधील शेतकऱ्यांना बदनाम केले. त्यांना डिब्रूगड तुरुंगात पाठवायला पाहिजे, असे ते म्हणाले. काँग्रेसबरोबर इतर प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांकडून यावर टीका करण्यात आली. 

भाजपचे ज्येष्ठ नेते हरजीत सिंह ग्रेवाल यांनी कंगना रणौतच्या विधानाशी भाजपचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. 

"शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचे कंगनाचे काम नाही. कंगनाचे हे वैयक्तिक विधान आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या बाजूने आहे. कंगनाने अशी विधाने करू नये. असे बोलणे टाळले पाहिजे", अशी भूमिका ग्रेवाल यांनी मांडली. काही माध्यमांनी असे वृत्त दिले आहे की, पंजाब भाजपने कंगना रणौतच्या या विधानाबद्दल वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणKangana Ranautकंगना राणौतFarmers Protestशेतकरी आंदोलनPunjabपंजाबBJPभाजपा