शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताचे कारण समोर; मृतांची संख्या पोहोचली ८ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 14:21 IST

पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडीजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली.

Kanchanjunga Express Accident : पश्चिम बंगालमध्ये मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून ६० प्रवासी जखमी झाले आहेत. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास न्यू जलपाईगुडी येथे मालगाडीने धडक दिल्यानंतर कांचनजंगा एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. दरम्यान या दुर्घटनेतील बचावकार्य पूर्ण झाले असून रेल्वे प्रशासनाने या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आठ जणांचे बळी घेणाऱ्या या घटनेचे कारण आता समोर आलं आहे.

पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी येथे मालगाडी आणि कांचनजंगा एक्स्प्रेस यांच्यात झालेल्या धडकेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० जण जखमी झाले आहेत. मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. आता रेल्वेच्या लोको पायलटने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. कांचनजंगा रेल्वे दुर्घटनेवर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा आणि सीईओ जया वर्मा सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मालगाडीच्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पॅकांचनजंगा एक्स्प्रेसच्या मागील बाजूच्या गार्डच्या डब्याचे पूर्णपणे नुकसान झाले. या अपघातात मालगाडीचा चालक आणि कांचनजंगाच्या गार्डचाही मृत्यू झाला. "या दुर्घटनेत मानवी चूक असल्याचे दिसते. सिग्नलकडे दुर्लक्ष करून ट्रेन पुढे चालवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आम्हाला 'कवच' यंत्रणा वाढवावी लागेल, त्यामुळे गाड्यांची टक्कर टाळता येईल," असे रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा जया वर्मा यांनी सांगितले.

"या अपघातात प्रथमदर्शनी मानवी चूक असल्याचे समोर आलं आहे. मात्र तपास पूर्ण झाल्यानंतरच योग्य माहिती कळेल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, मिशन मोडमध्ये कवचचा विस्तार केला जात आहे," असेही जया वर्मा म्हणाल्या.

कसा झाला अपघात?

त्रिपुरातील आगरतळा येथून कोलकात्याच्या सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने मागून धडक दिली. मालगाडीने सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि न्यू जलपाईगुडी स्थानकापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर रंगपानी स्टेशनजवळ उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून धडक दिली. मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. या घटनेत तीन रेल्वे कर्मचारी आणि पाच प्रवाशांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने कांचनचंगा एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला धडक बसल्याने मोठी जिवित हानी झाली नाही.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालIndian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीAccidentअपघात