शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताचे कारण समोर; मृतांची संख्या पोहोचली ८ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 14:21 IST

पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडीजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली.

Kanchanjunga Express Accident : पश्चिम बंगालमध्ये मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून ६० प्रवासी जखमी झाले आहेत. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास न्यू जलपाईगुडी येथे मालगाडीने धडक दिल्यानंतर कांचनजंगा एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. दरम्यान या दुर्घटनेतील बचावकार्य पूर्ण झाले असून रेल्वे प्रशासनाने या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आठ जणांचे बळी घेणाऱ्या या घटनेचे कारण आता समोर आलं आहे.

पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी येथे मालगाडी आणि कांचनजंगा एक्स्प्रेस यांच्यात झालेल्या धडकेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० जण जखमी झाले आहेत. मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. आता रेल्वेच्या लोको पायलटने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. कांचनजंगा रेल्वे दुर्घटनेवर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा आणि सीईओ जया वर्मा सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मालगाडीच्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पॅकांचनजंगा एक्स्प्रेसच्या मागील बाजूच्या गार्डच्या डब्याचे पूर्णपणे नुकसान झाले. या अपघातात मालगाडीचा चालक आणि कांचनजंगाच्या गार्डचाही मृत्यू झाला. "या दुर्घटनेत मानवी चूक असल्याचे दिसते. सिग्नलकडे दुर्लक्ष करून ट्रेन पुढे चालवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आम्हाला 'कवच' यंत्रणा वाढवावी लागेल, त्यामुळे गाड्यांची टक्कर टाळता येईल," असे रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा जया वर्मा यांनी सांगितले.

"या अपघातात प्रथमदर्शनी मानवी चूक असल्याचे समोर आलं आहे. मात्र तपास पूर्ण झाल्यानंतरच योग्य माहिती कळेल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, मिशन मोडमध्ये कवचचा विस्तार केला जात आहे," असेही जया वर्मा म्हणाल्या.

कसा झाला अपघात?

त्रिपुरातील आगरतळा येथून कोलकात्याच्या सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने मागून धडक दिली. मालगाडीने सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि न्यू जलपाईगुडी स्थानकापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर रंगपानी स्टेशनजवळ उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून धडक दिली. मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. या घटनेत तीन रेल्वे कर्मचारी आणि पाच प्रवाशांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने कांचनचंगा एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला धडक बसल्याने मोठी जिवित हानी झाली नाही.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालIndian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीAccidentअपघात