शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताचे कारण समोर; मृतांची संख्या पोहोचली ८ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 14:21 IST

पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडीजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली.

Kanchanjunga Express Accident : पश्चिम बंगालमध्ये मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून ६० प्रवासी जखमी झाले आहेत. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास न्यू जलपाईगुडी येथे मालगाडीने धडक दिल्यानंतर कांचनजंगा एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. दरम्यान या दुर्घटनेतील बचावकार्य पूर्ण झाले असून रेल्वे प्रशासनाने या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आठ जणांचे बळी घेणाऱ्या या घटनेचे कारण आता समोर आलं आहे.

पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी येथे मालगाडी आणि कांचनजंगा एक्स्प्रेस यांच्यात झालेल्या धडकेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० जण जखमी झाले आहेत. मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. आता रेल्वेच्या लोको पायलटने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. कांचनजंगा रेल्वे दुर्घटनेवर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा आणि सीईओ जया वर्मा सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मालगाडीच्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पॅकांचनजंगा एक्स्प्रेसच्या मागील बाजूच्या गार्डच्या डब्याचे पूर्णपणे नुकसान झाले. या अपघातात मालगाडीचा चालक आणि कांचनजंगाच्या गार्डचाही मृत्यू झाला. "या दुर्घटनेत मानवी चूक असल्याचे दिसते. सिग्नलकडे दुर्लक्ष करून ट्रेन पुढे चालवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आम्हाला 'कवच' यंत्रणा वाढवावी लागेल, त्यामुळे गाड्यांची टक्कर टाळता येईल," असे रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा जया वर्मा यांनी सांगितले.

"या अपघातात प्रथमदर्शनी मानवी चूक असल्याचे समोर आलं आहे. मात्र तपास पूर्ण झाल्यानंतरच योग्य माहिती कळेल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, मिशन मोडमध्ये कवचचा विस्तार केला जात आहे," असेही जया वर्मा म्हणाल्या.

कसा झाला अपघात?

त्रिपुरातील आगरतळा येथून कोलकात्याच्या सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने मागून धडक दिली. मालगाडीने सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि न्यू जलपाईगुडी स्थानकापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर रंगपानी स्टेशनजवळ उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून धडक दिली. मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. या घटनेत तीन रेल्वे कर्मचारी आणि पाच प्रवाशांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने कांचनचंगा एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला धडक बसल्याने मोठी जिवित हानी झाली नाही.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालIndian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीAccidentअपघात