शासनाने व्यवसायांना अनुदान देण्यापेक्षा प्रशिक्षण द्यावे कांचन परुळेकर:
By Admin | Updated: October 30, 2015 23:56 IST2015-10-30T23:56:55+5:302015-10-30T23:56:55+5:30
आशिष पाटील/जळगाव: अर्थशास्त्र फार सोपं आहे. घरातला पैसा घरातच राहिला पाहिजे.बाहेरचा पैसा चांगल्या नितीमत्तेने आपल्या घरात यायला पाहिजे. गावातला पैसा गावातच आणि बाहेर गावचा पैसा गावात आला पाहिजे. मला ज्याची गरज आहे.ते निर्माण करता आले पाहिजे. जे निर्माण करता येत नाही त्याची बचत करायची आहे हेच खरे अर्थशास्त्र आहे. शासनाने व्यवसायांना अनुदान देण्यापेक्षा महिलांच्या सबलीकरणासाठी प्रशिक्षणाची गरज आवश्यक असल्याने मत कोल्हापूरच्या स्वयंसिद्ध संस्थेच्या अध्यक्षा कांतनताई परुळेकर यांनी व्यक्त केले. त्या गुरुवारी उद्यमी संस्थेतर्फे आयोजित प्रशिक्षणासाठी शहरात आल्या होत्या. त्यांच्याशी काही मुद्यांवर केलेली चर्चा.

शासनाने व्यवसायांना अनुदान देण्यापेक्षा प्रशिक्षण द्यावे कांचन परुळेकर:
आ िष पाटील/जळगाव: अर्थशास्त्र फार सोपं आहे. घरातला पैसा घरातच राहिला पाहिजे.बाहेरचा पैसा चांगल्या नितीमत्तेने आपल्या घरात यायला पाहिजे. गावातला पैसा गावातच आणि बाहेर गावचा पैसा गावात आला पाहिजे. मला ज्याची गरज आहे.ते निर्माण करता आले पाहिजे. जे निर्माण करता येत नाही त्याची बचत करायची आहे हेच खरे अर्थशास्त्र आहे. शासनाने व्यवसायांना अनुदान देण्यापेक्षा महिलांच्या सबलीकरणासाठी प्रशिक्षणाची गरज आवश्यक असल्याने मत कोल्हापूरच्या स्वयंसिद्ध संस्थेच्या अध्यक्षा कांतनताई परुळेकर यांनी व्यक्त केले. त्या गुरुवारी उद्यमी संस्थेतर्फे आयोजित प्रशिक्षणासाठी शहरात आल्या होत्या. त्यांच्याशी काही मुद्यांवर केलेली चर्चा.प्रश्न:आपल्याला या उपक्रमाची प्रेरणा कशी मिळाली?कांचनताई: वडिल स्वातंत्र्य सैनिक होते. आई कष्टळू होती. गरिब असल्याने साजिककार्य रक्ततच होते. व वयाच्या १३ व्या वर्षापासून डॉ. व्ही.टी. पाटील यांच्या संपर्कात होती. आणि त्यांची मानसकन्या असल्याने. डा पाटील यांच्या रुपात एक विद्यापीठच सोबत होते.याच काळात आई उद्योजक झाली तर संपूर्ण पीढी उद्योजक होईल. गरिबांनीच काम करावे ही चुकीची पद्धत आहे. श्रीमंत महिलांकडे दिवसभातला खुप वेळ रिकामा असतो त्या वेळात त्या सुद्धा मोठे काम करु शकतात. त्यातून महिला सबलीकरन शक्य असल्याने या उपक्रामकडे वळले. प्रश्न: महिलांनी उद्योग कसा निवडावा?कांचनताई: आपल्याला रोजच्या जिवनात सकाळापासून ते दिवसभरात लागणार्या वस्तूंची यादी, येणार्या सणांची यादी, विविध मोसमात काय लागते, आपल्या परिसातील विविध कार्यालय,संस्था, सामाजिक संस्थांना कशाची गरज आहे. ते काय काय घेतात याची यादी तयार करुण. त्यातून आपणास जे सोपे वाटते ते शिकूण बाजारपेठ नुसार ते तयार करुण पुरवठा करणे.अशा प्रकारे उद्योग निवडता येईल.उद्योगात आपले कौशल्य द्या. उत्तम व नाविण्यपूर्ण मुल्यवर्धित वस्तू.आकार,रंग,स्वाद,उत्तमद्या,सारीकरण,विक्री कौशल्याचा बेस द्या.प्रश्न: भांडवल व जागा नसतांना उद्योग कसा उभा राहणार?कांचनताई: अनेक छोट्या-छोट्या व्यवसायातून मोठे उद्योग उभे राहिले आहेत. कमी भांडवालात छोटा व्यवसायांमधून व्यवसाय उभा राहिल्यावर बैंका कडून आपसूक आर्थिक मदत होते. तसे बचत गाटांची मोठ्या रक्कमा जिला बैंका मध्ये आहे त्यांचा उपयोग होऊ शकतो. व्यवसाय सुरु करतांना शुन्यातून सुरुवात करा. जनधन योजनेत सरकार कडून खाते धारकांना बैंक खाते व पाच हजारा पर्यंत रक्कम मिळते.