शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कैलास मानसरोवरची यात्रा होणार नथु ला आणि लिपूलेख ला या दोन्ही मार्गे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 15:55 IST

डोकलाम पठारावर भारत आणि चीन एकमेकांसमोर ठाकल्यानंतर नथु ला मार्गे भारतीय यात्रेकरुंना कैलास मानससरोवराला जाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र चीनने या मार्गाला परवानगी दिल्यानंतर तिबेटमधील पवित्रस्थळांना भेट देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देकैलास पर्वत आणि मानससरोवर हे चीनने गिळंकृत केलेल्या तिबेट प्रांतात येते. तिबेटला स्वायत्त प्रांताचा दर्जा देण्यात आलेला आहे. 8 जून ते 8 सप्टेंबर या काळामध्ये यात्रेकरुंच्या तुकड्या ही यात्रा पूर्ण करतील.

नवी दिल्ली-डोकलाम पठारावर भारत आणि चीन एकमेकांसमोर ठाकल्यानंतर नथु ला मार्गे भारतीय यात्रेकरुंना कैलास मानससरोवराला जाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र चीनने या मार्गाला परवानगी दिल्यानंतर तिबेटमधील पवित्रस्थळांना भेट देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यासाठी यात्रेकरुंच्या नोंदणीला सुरुवातही केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयातर्फे या यात्रेचे आयोजन आणि नियमन करण्यात येते. कैलास पर्वत आणि मानससरोवर हे चीनने गिळंकृत केलेल्या तिबेट प्रांतात येते. तिबेटला स्वायत्त प्रांताचा दर्जा देण्यात आलेला आहे. 8 जून ते 8 सप्टेंबर या काळामध्ये यात्रेकरुंच्या तुकड्या ही यात्रा पूर्ण करतील. सिक्किममधील नथु ला आणि उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून ही यात्रा करता येईल. डोकलाम येथे निर्माण झालेल्या पेचप्रसंगानंतर चीनने नथु लाचा मार्ग बंध केला होता. 28 ऑगस्ट रोजी या दोन्ही देशांमधील तणाव निवळला. अर्थात नथु ला बंद झाली तरी लिपुलेख खिंडीचा मार्ग भारतीयांना उपलब्ध होताच.लिपुलेख खिंडीच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांना थोडे ट्रेकिंगही करावे लागते. या मार्गाने जाण्यासाठी प्रतीव्यक्ती 1.6 लाख रुपये खर्च येतो. यावर्षी प्रत्येकी 60 यात्रेकरुंच्या 18 तुकड्या यामार्गे कैलास-मानसला जातील. प्रत्येक तुकडीला या प्रवासासाठी 24 दिवसांचा अवधी लागेल त्यामध्ये तयारीसाठी दिल्लीमध्ये व्यतीत कराव्या लागणाऱ्या 3 दिवसांचाही समावेश आहे.मात्र ट्रेकिंग करु न शकणाऱ्या आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नथु लाचा मार्ग उपलब्ध आहे. सिक्किमची राजधानी गंगटोकपासून जाणारा हा मार्ग हांगू सरोवराजवळून तिबेटला जातो. या मार्गाने जाण्यासाठी 2 लाख रुपये खर्च येतो. या यात्रेसाठी 21 दिवस लागतात, त्यातील 3 दिवस दिल्लीमध्ये तयारीसाठी द्यावे लागतात. यावर्षी 50 सदस्यांच्या 10 तुकड्या या मार्गाने जातील असा अंदाज परराष्ट्र मंत्रालयाने वर्तवला आहे.

टॅग्स :IndiaभारतDoklamडोकलामchinaचीन