शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 13:50 IST

एका छोट्या गावात जन्मलेल्या जयगणेश यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती. त्यांचे वडील एका कारखान्यात काम करत होते. ते कसातरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत होते.

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. वेल्लोर जिल्ह्यातील विनवमंगलम नावाच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या जयगणेश यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती. त्यांचे वडील एका कारखान्यात काम करत होते. ते कसातरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत होते.

जयगणेश हे त्यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा होते. अशा परिस्थितीत घर चालवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आली. त्यांना आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचं होतं. ते अभ्यासात खूप हुशार होते. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही ते खचले नाहीत. आपल्या करिअरला आणि आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी खूप अभ्यास केला. 

के जयगणेश यांना बारावी बोर्डाच्या परीक्षेत जवळपास ९२ टक्के गुण मिळाले होते. यानंतर शिष्यवृत्तीच्या मदतीने त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. इंजिनीअर झाल्यानंतर त्यांनी खासगी नोकरी सुरू केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याप्रमाणेच इतर अनेक कुटुंबही त्यांच्या आर्थिक परिस्थितीशी झगडत आहेत. आपल्या कुटुंबाला आणि इतरांना मदत करण्यासाठी त्यांनी इंजिनिअरची नोकरी सोडली आणि कलेक्टर होण्याची तयारी सुरू केली.

सिनेमा हॉलमध्ये बिलिंग ऑपरेटर म्हणून केलं काम 

के जयगणेश यांनी यूपीएससी परीक्षेची माहिती गोळा केली. त्यानंतर चेन्नई येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. तेथे फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांचा खर्च भागवण्यासाठी आणि UPSC कोचिंग फी भरण्यासाठी त्यांनी सिनेमा हॉलमध्ये बिलिंग ऑपरेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. तेथे त्यांना दरमहा तीन हजार रुपये पगार मिळत असे. २००४ मध्ये ते यूपीएससी परीक्षेत नापास झाले. यानंतर त्यांनी सिनेमा हॉलच्या नोकरीचा राजीनामा दिला.

कोचिंग फीसाठी बनले वेटर 

यूपीएससीची परीक्षा सोपी नाही हे त्यांना समजलं होतं. याची तयारी करण्यासाठी अभ्यासाचे तास वाढवावे लागतील. पण नोकरी सोडून फक्त अभ्यास करायचा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे ते एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करू लागले. त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळू लागला. पहिल्या दोन प्रयत्नात जयगणेश यांना यूपीएससी प्रिलिम्स परीक्षाही पास करता आली नाही. त्यानंतर त्यांनी कोचिंग क्लासमध्ये समाजशास्त्र शिकवायला सुरुवात केली.

सलग ६ वेळा नापास 

UPSC नागरी सेवा परीक्षेत ते सलग ६ वेळा नापास झाले. असं असूनही त्यांनी हार मानली नाही. ते त्यांच्या बाजूने तयारी करत राहिले. त्यांच्या मेहनतीचं फळ होतं की UPSC परीक्षेच्या ७ व्या प्रयत्नात ते UPSC प्रिलिम्स, UPSC Mains आणि UPSC मुलाखतीत यश मिळवू शकले. यामध्ये ते १५६ व्या रँकसह आयआरएस अधिकारी बनले. सध्या ते चेन्नई, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी प्रदेशात एडिशनल सीआयटी (OSD) पदावर कार्यरत आहेत. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी