शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 13:50 IST

एका छोट्या गावात जन्मलेल्या जयगणेश यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती. त्यांचे वडील एका कारखान्यात काम करत होते. ते कसातरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत होते.

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. वेल्लोर जिल्ह्यातील विनवमंगलम नावाच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या जयगणेश यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती. त्यांचे वडील एका कारखान्यात काम करत होते. ते कसातरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत होते.

जयगणेश हे त्यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा होते. अशा परिस्थितीत घर चालवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आली. त्यांना आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचं होतं. ते अभ्यासात खूप हुशार होते. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही ते खचले नाहीत. आपल्या करिअरला आणि आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी खूप अभ्यास केला. 

के जयगणेश यांना बारावी बोर्डाच्या परीक्षेत जवळपास ९२ टक्के गुण मिळाले होते. यानंतर शिष्यवृत्तीच्या मदतीने त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. इंजिनीअर झाल्यानंतर त्यांनी खासगी नोकरी सुरू केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याप्रमाणेच इतर अनेक कुटुंबही त्यांच्या आर्थिक परिस्थितीशी झगडत आहेत. आपल्या कुटुंबाला आणि इतरांना मदत करण्यासाठी त्यांनी इंजिनिअरची नोकरी सोडली आणि कलेक्टर होण्याची तयारी सुरू केली.

सिनेमा हॉलमध्ये बिलिंग ऑपरेटर म्हणून केलं काम 

के जयगणेश यांनी यूपीएससी परीक्षेची माहिती गोळा केली. त्यानंतर चेन्नई येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. तेथे फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांचा खर्च भागवण्यासाठी आणि UPSC कोचिंग फी भरण्यासाठी त्यांनी सिनेमा हॉलमध्ये बिलिंग ऑपरेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. तेथे त्यांना दरमहा तीन हजार रुपये पगार मिळत असे. २००४ मध्ये ते यूपीएससी परीक्षेत नापास झाले. यानंतर त्यांनी सिनेमा हॉलच्या नोकरीचा राजीनामा दिला.

कोचिंग फीसाठी बनले वेटर 

यूपीएससीची परीक्षा सोपी नाही हे त्यांना समजलं होतं. याची तयारी करण्यासाठी अभ्यासाचे तास वाढवावे लागतील. पण नोकरी सोडून फक्त अभ्यास करायचा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे ते एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करू लागले. त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळू लागला. पहिल्या दोन प्रयत्नात जयगणेश यांना यूपीएससी प्रिलिम्स परीक्षाही पास करता आली नाही. त्यानंतर त्यांनी कोचिंग क्लासमध्ये समाजशास्त्र शिकवायला सुरुवात केली.

सलग ६ वेळा नापास 

UPSC नागरी सेवा परीक्षेत ते सलग ६ वेळा नापास झाले. असं असूनही त्यांनी हार मानली नाही. ते त्यांच्या बाजूने तयारी करत राहिले. त्यांच्या मेहनतीचं फळ होतं की UPSC परीक्षेच्या ७ व्या प्रयत्नात ते UPSC प्रिलिम्स, UPSC Mains आणि UPSC मुलाखतीत यश मिळवू शकले. यामध्ये ते १५६ व्या रँकसह आयआरएस अधिकारी बनले. सध्या ते चेन्नई, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी प्रदेशात एडिशनल सीआयटी (OSD) पदावर कार्यरत आहेत. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी