शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर भावाची हरकत; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 11:03 IST

काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले होते. त्यावर राहुल यांनी म्हटले होते की, ज्योतिरादित्य यांना आपल्याला भेटण्यासाठी वेळ घेण्याची कधीही आवश्यकता नव्हती. यावर देव वर्मन म्हणाले की, राहुल यांनी आपल्या कार्यालयाला या संदर्भात विचारायला हवं. 

नवी दिल्ली - त्रिपुरा काँग्रेसचे माजी प्रमुख आणि माणिक्य शाही कुटुंबातील सदस्य प्रद्योत देव वर्मन यांनी आपले चुलत बंधू ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. भाजपमध्ये प्रवेश करणे योग्य पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना संधी देण्यात येत असल्याचा दावा देववर्मन यांनी केला. गेल्या वर्षीच देववर्मन यांनी त्रिपुरा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

भाजपसोबत जाण्याचा पर्याय योग्य नाही. आपण सर्वांनी एकत्र यायल हवं. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस नेतृत्व देखील युवा नेत्यांना समोर आणण्यास तयार आहे. देशासाठी आपण कसं योगदान देऊ शकतो, याचा विचार होणे गरजेचे आहे. देशाला प्रभावी विरोधकांची आवश्यकता आहे. त्यामुळे युवा नेत्यांनी एकत्र येऊन काम करायला हवं, असंही देव वर्मन यांनी सांगितले.

राजस्थानचे सचिन पायलट आणि झारखंडचे अजय कुमार यांच्यासह अनेक नेत्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे.  भाजपविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेस तयार नसेल तर नवीन पक्ष स्थापन करून त्यात सर्वांना घेऊन काम करायला हवे, असंही देववर्मन यांनी सुचवले. गेल्या वर्षी माजी आयपीएस अधिकारी आणि झारखंड काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार यांनी काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. 

राहुल गांधी यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले होते. त्यावर राहुल यांनी म्हटले होते की, ज्योतिरादित्य यांना आपल्याला भेटण्यासाठी वेळ घेण्याची कधीही आवश्यकता नव्हती. यावर देव वर्मन म्हणाले की, राहुल यांनी आपल्या कार्यालयाला या संदर्भात विचारायला हवं.