शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 13:59 IST

Jyotiraditya Scindia, Madhya Pradesh Political Crisis ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या वडिलांची 75 वी जयंती आहे. याच दिवशी सिंधिया मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देराज्यसभा सदस्यता आणि केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. सिंधिया यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तर त्यांच्या आजी विजयाराजे सिंधिया यांचे स्वप्न ते पूर्ण करू शकणार आहेत. 

भोपाळ : गेल्या 15 वर्षांपासूनचे भाजपाचे सरकार उलथवून काँग्रेसने काठावर बहुमत मिळवत मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती. मात्र, कमलनाथ यांचे सरकार अल्पायुषी ठरताना दिसत आहे. कारण काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंडखोरी केली असून 6 मंत्र्यांसह 17 आमदारांना कर्नाटकात नेऊन ठेवले आहे. तर सिंधिया गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मोदींना भेटून नुकतेच बाहेर पडले आहेत. त्यांनी काँग्रेसचा राजीनामाही दिला आहे. 

आज ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या वडिलांची 75 वी जयंती आहे. याच दिवशी सिंधिया मोठी घोषणा करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात असून त्यांना राज्यसभा सदस्यता आणि केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. जर सिंधिया यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तर त्यांच्या आजी विजयाराजे सिंधिया यांचे स्वप्न ते पूर्ण करू शकणार आहेत. 

राजमाता नावाने प्रसिद्ध असलेल्या विजयाराजे सिंधिया या राष्ट्रीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांमध्ये होत्या. त्यांना असे वाटत होते की त्यांचे पूर्ण कुटुंब भाजपमध्ये यावे. आता त्यांचे हे स्वप्न ज्योतिरादित्य पूर्ण करताना दिसत आहेत. ग्वाल्हेरवर राज्य करणाऱ्या राजमातानी 1957 मध्ये काँग्रेसमधून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. त्या गुना लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या. केवळ 10 वर्षांत त्यांचा अपेक्षभंग झाला आणि 1967 मध्ये त्यांनी संघाची वाट धरली. त्यांच्या नेतृत्वातच ग्वाल्हेर क्षेत्रात संघाची ताकद वाढली. एवढी की 1971 मध्ये इंदिरा गांधीच्या लाटेतही या भागातून भाजपाचे तीन खासदार निवडून लोकसभेवर गेले होते. या लाटेने भारताला भावी, कणखर असा पंतप्रधान दिला. ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. राजमाता भिंडमधून, वाजपेयी ग्वाल्हेर आणि राजमाता यांचे पूत्र आणि ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव गुनामधून खासदार झाले. 

गुनावर सिंधियांचे वर्चस्व होते. माधवराव हे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी खासदार झाले होते. मात्र, त्यांचे मन जनसंघात लागले नाही. 1977 मध्ये आणीबाणीवेळी त्यांचे आणि राजमाता यांचे रस्ते वेगवेगळे झाले. 1980 मध्ये माधवरावांनी काँग्रेसमधून निवडणूक लढविली आणि केंद्रीय मंत्री बनले. तर मुलगा फुटल्याने राजमातांनी मुलगी वसुंधरा राजे सिधियांना राजकारणात आणले. 1984 मध्ये त्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिनीमध्ये सहभागी झाल्या. त्यानंतर त्या राजस्थानच्या मुख्यमंत्रीही राहिल्या आहेत. तर ज्योतिरादित्य यांची आणखी एक आत्या यशोधरा या भाजपमधून पाचवेळा आमदार आणि मंत्री राहिल्या आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाIndira Gandhiइंदिरा गांधीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे