शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

"न्याय मिळाला, लोकशाही जिंकली! सत्याच्या या लढाईत..."; आव्हाडांची सरकारवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 17:47 IST

राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर केलं ट्विट

Jitendra Awhad, Rahul Gandhi: मोदी आडनाव बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यांची खासदारकी रद्द केली. तसेच पुढील सात वर्षे त्यांना निवडणूकही लढविता येणार नाही असे सांगितले. पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र या मुद्द्यावर राहुल गांधींना दिलासा दिला आहे. राहुल गांधी यांच्या या प्रकरणातील शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने, ते पुन्हा एकदा खासदार होऊन संसदेत येणार आहेत. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली.

"न्याय अबाधित राहिला, लोकशाहीचा विजय झाला! सरकारवरील टीकेचा सर्वात मजबूत आणि मोठा आवाज दाबण्याचा प्रयत्न करूनही, सत्याच्या या लढाईत राहुल गांधी विजयी झाले. मला खात्री आहे की आपल्या देशाचा लोकशाही पाया पुन्हा स्थापित करण्याचा त्यांचा दृढ निश्चय त्यांना पुढील वाटचालीत विजयाच्या दिशेने नेईल. INDIAच्या अनेक यशांपैकी हे सर्वात महत्त्वाचे यश मानले जाईल. लढेल INDIA, जिंकेल भारत!" अशा शब्दांत आव्हाड यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली.

दरम्यान, राहुल यांना सर्वप्रथम गुजरातमधील विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधींना उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नव्हता, म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाच गेले होते. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या पेक्षा कमी शिक्षा देखील करता आली असती, अशी टिप्पणी केली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात युक्तिवाद करणाऱ्या तक्रारदार पूर्णेश मोदी यांचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी कोणती कारणे दिली आहेत. यापेक्षा कमी शिक्षा देता आली असती. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेचे हक्कही अबाधित राहिले असते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRahul Gandhiराहुल गांधीNCPराष्ट्रवादी काँग्रेस