शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

"न्याय मिळाला, लोकशाही जिंकली! सत्याच्या या लढाईत..."; आव्हाडांची सरकारवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 17:47 IST

राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर केलं ट्विट

Jitendra Awhad, Rahul Gandhi: मोदी आडनाव बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यांची खासदारकी रद्द केली. तसेच पुढील सात वर्षे त्यांना निवडणूकही लढविता येणार नाही असे सांगितले. पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र या मुद्द्यावर राहुल गांधींना दिलासा दिला आहे. राहुल गांधी यांच्या या प्रकरणातील शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने, ते पुन्हा एकदा खासदार होऊन संसदेत येणार आहेत. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली.

"न्याय अबाधित राहिला, लोकशाहीचा विजय झाला! सरकारवरील टीकेचा सर्वात मजबूत आणि मोठा आवाज दाबण्याचा प्रयत्न करूनही, सत्याच्या या लढाईत राहुल गांधी विजयी झाले. मला खात्री आहे की आपल्या देशाचा लोकशाही पाया पुन्हा स्थापित करण्याचा त्यांचा दृढ निश्चय त्यांना पुढील वाटचालीत विजयाच्या दिशेने नेईल. INDIAच्या अनेक यशांपैकी हे सर्वात महत्त्वाचे यश मानले जाईल. लढेल INDIA, जिंकेल भारत!" अशा शब्दांत आव्हाड यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली.

दरम्यान, राहुल यांना सर्वप्रथम गुजरातमधील विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधींना उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नव्हता, म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाच गेले होते. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या पेक्षा कमी शिक्षा देखील करता आली असती, अशी टिप्पणी केली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात युक्तिवाद करणाऱ्या तक्रारदार पूर्णेश मोदी यांचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी कोणती कारणे दिली आहेत. यापेक्षा कमी शिक्षा देता आली असती. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेचे हक्कही अबाधित राहिले असते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRahul Gandhiराहुल गांधीNCPराष्ट्रवादी काँग्रेस