शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"न्याय मिळाला, लोकशाही जिंकली! सत्याच्या या लढाईत..."; आव्हाडांची सरकारवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 17:47 IST

राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर केलं ट्विट

Jitendra Awhad, Rahul Gandhi: मोदी आडनाव बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यांची खासदारकी रद्द केली. तसेच पुढील सात वर्षे त्यांना निवडणूकही लढविता येणार नाही असे सांगितले. पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र या मुद्द्यावर राहुल गांधींना दिलासा दिला आहे. राहुल गांधी यांच्या या प्रकरणातील शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने, ते पुन्हा एकदा खासदार होऊन संसदेत येणार आहेत. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली.

"न्याय अबाधित राहिला, लोकशाहीचा विजय झाला! सरकारवरील टीकेचा सर्वात मजबूत आणि मोठा आवाज दाबण्याचा प्रयत्न करूनही, सत्याच्या या लढाईत राहुल गांधी विजयी झाले. मला खात्री आहे की आपल्या देशाचा लोकशाही पाया पुन्हा स्थापित करण्याचा त्यांचा दृढ निश्चय त्यांना पुढील वाटचालीत विजयाच्या दिशेने नेईल. INDIAच्या अनेक यशांपैकी हे सर्वात महत्त्वाचे यश मानले जाईल. लढेल INDIA, जिंकेल भारत!" अशा शब्दांत आव्हाड यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली.

दरम्यान, राहुल यांना सर्वप्रथम गुजरातमधील विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधींना उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नव्हता, म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाच गेले होते. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या पेक्षा कमी शिक्षा देखील करता आली असती, अशी टिप्पणी केली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात युक्तिवाद करणाऱ्या तक्रारदार पूर्णेश मोदी यांचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी कोणती कारणे दिली आहेत. यापेक्षा कमी शिक्षा देता आली असती. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेचे हक्कही अबाधित राहिले असते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRahul Gandhiराहुल गांधीNCPराष्ट्रवादी काँग्रेस