शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाला मानवी चेहरा असावा- सरन्यायाधीश दीपक मिश्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 19:59 IST

मावळत्या सरन्यायाधीशांकडून तरुण वकिलांचं कौतुक

नवी दिल्ली: लोकांचा भूतकाळ पाहून मी त्यांची पारख करत नाही. त्याऐवजी मी त्यांची कृती आणि दृष्टीकोन लक्षात घेतो. त्यातूनच मी त्यांना पारखतो, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीश म्हणून आपल्या अखेरच्या भाषणात मिश्रा यांनी न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक मुद्यांवर भाष्य केलं. भारतीय न्यायव्यवस्था जगातील एक भक्कम न्यायव्यवस्था असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. न्यायाला मानवी चेहरा असायला हवा, असं दीपक मिश्रा यांनी भाषणात म्हटलं. 'मी बार असोसिएशनबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या कारकिर्दीबद्दल मी पूर्णपणे संतुष्ट आहे. आपली न्यायव्यवस्था जगातील सर्वात भक्कम न्यायव्यवस्थांपैकी एक असून यात न्यायाधीशांची भूमिका महत्त्वाची आहे,' असं मावळत्या सरन्यायाधीशांनी म्हटलं. यावेळी त्यांनी तरुण वकिलांची मुक्तकंठानं स्तुती केली. तरुण वकिलांकडे अफाट क्षमता असल्याचं ते म्हणाले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा उद्या निवृत्त होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी न्यायाधीश आणि वकिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समाजावरही भाष्य केलं. 'समाज हा प्रत्येक लहान मुलासाठी आईसारखा असतो. श्रीमंत आणि गरिबांचे अश्रू सारखेच असतात,' असं मिश्रा म्हणाले. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचाही उल्लेख केला. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी दीपक मिश्रा यांच्या दूरदर्शीपणाचं कौतुक केलं. दीपक मिश्रा हे एक असाधारण न्यायाधीश आहेत. नागरिकांचं स्वातंत्र्य जपण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली, असं गोगोई म्हणाले. यापुढे रंजन गोगोई यांच्याकडे सरन्यायाधीशपदाची जबाबदारी असणार आहे.  

टॅग्स :Deepak Mishraदीपक मिश्राSupreme Courtसर्वोच्च न्यायालय