शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

न्यायाला मानवी चेहरा असावा- सरन्यायाधीश दीपक मिश्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 19:59 IST

मावळत्या सरन्यायाधीशांकडून तरुण वकिलांचं कौतुक

नवी दिल्ली: लोकांचा भूतकाळ पाहून मी त्यांची पारख करत नाही. त्याऐवजी मी त्यांची कृती आणि दृष्टीकोन लक्षात घेतो. त्यातूनच मी त्यांना पारखतो, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीश म्हणून आपल्या अखेरच्या भाषणात मिश्रा यांनी न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक मुद्यांवर भाष्य केलं. भारतीय न्यायव्यवस्था जगातील एक भक्कम न्यायव्यवस्था असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. न्यायाला मानवी चेहरा असायला हवा, असं दीपक मिश्रा यांनी भाषणात म्हटलं. 'मी बार असोसिएशनबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या कारकिर्दीबद्दल मी पूर्णपणे संतुष्ट आहे. आपली न्यायव्यवस्था जगातील सर्वात भक्कम न्यायव्यवस्थांपैकी एक असून यात न्यायाधीशांची भूमिका महत्त्वाची आहे,' असं मावळत्या सरन्यायाधीशांनी म्हटलं. यावेळी त्यांनी तरुण वकिलांची मुक्तकंठानं स्तुती केली. तरुण वकिलांकडे अफाट क्षमता असल्याचं ते म्हणाले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा उद्या निवृत्त होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी न्यायाधीश आणि वकिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समाजावरही भाष्य केलं. 'समाज हा प्रत्येक लहान मुलासाठी आईसारखा असतो. श्रीमंत आणि गरिबांचे अश्रू सारखेच असतात,' असं मिश्रा म्हणाले. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचाही उल्लेख केला. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी दीपक मिश्रा यांच्या दूरदर्शीपणाचं कौतुक केलं. दीपक मिश्रा हे एक असाधारण न्यायाधीश आहेत. नागरिकांचं स्वातंत्र्य जपण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली, असं गोगोई म्हणाले. यापुढे रंजन गोगोई यांच्याकडे सरन्यायाधीशपदाची जबाबदारी असणार आहे.  

टॅग्स :Deepak Mishraदीपक मिश्राSupreme Courtसर्वोच्च न्यायालय