शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

या मुलींना न्याय कधी? व्यवस्था म्हणते ३० वर्षे थांबा! २०२२ मध्ये ३ टक्के प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 06:54 IST

लैंगिक हिंसाचाराला बळी पडलेल्या मुलांना न्याय मिळण्याची प्रतीक्षा लांबत चालली आहे.

नवी दिल्ली : लैंगिक हिंसाचाराला बळी पडलेल्या मुलांना न्याय मिळण्याची प्रतीक्षा लांबत चालली आहे. केंद्राची धोरणे आणि अनेक प्रयत्नानंतरही मुलांवरील लैंगिक हिंसाचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी चार वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या जलदगती न्यायालयांमध्ये  गेल्या ३१ जानेवारीपर्यंत तब्बल २ लाख ४३ हजार २३७ प्रकरणे प्रलंबित होती. तर २०२२ मध्ये पॉस्कोच्या प्रकरणांमध्ये केवळ ३ टक्के प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आल्याचे समोर आले आहे.

कोणत्या राज्यात किती वर्षांनी न्याय?

राज्य          वर्षे

अरुणाचल प्रदेश  ३०

दिल्ली  २७

बिहार   २६

पश्चिम बंगाल   २५

मेघालय २१

उत्तर प्रदेश      २२

कुणाचा अहवाल?

इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन फंड या स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ)   ‘जस्टिस वेट्स’ हा अभ्यास सादर केला आहे.

निकाल कधी लागेल?

या प्रकरणांमध्ये खटल्यांचा निकाल लागण्यासाठी किमान नऊ वर्षे लागू शकतात.

एका वर्षात किती प्रकरणे निकाली?

२०२२ मध्ये बाल लैंगिक अत्याचाराच्या २,६८,०३८ प्रकरणांपैकी केवळ ८९०९ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा होऊ शकली.

प्रत्येक जलदगती विशेष न्यायालयाने एका वर्षात सरासरी केवळ २८ प्रकरणे निकाली काढली.

कोट्यवधी रुपये खर्च करूनही...

जलदगती विशेष न्यायालये स्थापन करण्याचा २०१९ चा ऐतिहासिक निर्णय आणि कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही निकाल लागताना दिसत नाही.

महाराष्ट्रात कधी न्याय मिळेल?

महाराष्ट्रातील पीडितांना न्याय मिळण्यासाठी १३ वर्षे, म्हणजेच २०३६ची वाट पाहावी लागेल.  पॉस्कोअंतर्गत ३३,०७२ खटले महाराष्ट्रात प्रलंबित आहेत.

कोणत्या वयात मुलांवर अत्याचार?

वय     घटना

६ वर्षांखाली     ८४३

६ ते १२ ३,२१८

१२ ते १६       १४,८००

१६ ते १८       १९,५८३