शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 09:09 IST

नाशिकला देशातील पहिले सात मजली न्यायालय

नाशिक : सामान्य माणसाला न्याय मिळणे, हे बळकट लाेकशाहीचे प्रतीक आहे. सामाजिक स्तरावर समानता निर्माण व्हावी, यासाठीची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. भारतीय न्यायव्यवस्था अतिशय निरपेक्ष असून, आर्थिक आणि सामजिक समानता निर्माण करणारे अनेक निकाल या न्यायव्यवस्थेने दिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली बंधुभावाची शिकवणूक टिकवून ठेवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सात मजली नूतन इमारतीचे उद्घाटन व १४० वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.शनिवारी  सोहळा पार पडला. व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. मकरंद कर्णिक, न्या. रेवती मोहिते डेरे, न्या. सारंग कोतवाल, न्या. जितेंद्र जैन, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सी. सिंग, महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सिंग, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. श्रीचंद्र जगमलानी उपस्थित होते.

राज्यघटना महत्वाचा ग्रंथ

न्या. गवई म्हणाले की, संविधानाने भारताला नवी दिशा दिली. भारताची राज्यघटना हा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. समता, बंधुत्व याची शिकवण या ग्रंथाने दिली. नाशिकला न्यायालयाची जी इमारत आज भव्यपणे उभी राहिली आहे, ही देशातील सर्वात मोठी इमारत असल्याचे गवई यांनी सांगितले.

न्याय जलद हवा

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे म्हणाल्या की, न्यायालयाच्या इमारती फक्त भव्य राहून उपयोग नाही तर त्यात न्यायनिवाडादेखील जलद व्हायला हवा. त्या दृष्टीने वकील व न्यायाधीशांची भूमिका असावी. सामान्य नागरिकास न्यायालयात आल्यावर न्याय मिळतो, अशी मानसिकता व्हायला हवी.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय