शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

काँग्रेस वारंवार चीनसमोर गुडघे का टेकते? जेपी नड्डा यांचा खरमरीत सवाल

By देवेश फडके | Updated: January 19, 2021 14:26 IST

अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात चीनने गाव वसवल्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी जोरदार पलटवार करत चीनवरून काँग्रेस खोटे बोलणे केव्हा बंद करणार, असा सवाल केला आहे. 

ठळक मुद्देजेपी नड्डा यांचे काँग्रेस आणि राहुल गांधींना एकामागून एक तिखट सवालशेतकऱ्यांना भडकवण्याचे काम काँग्रेस करत असल्याचा आरोपचीनकडून मिळालेली देणगी काँग्रेस परत करणार का - जेपी नड्डा

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात चीनने गाव वसवल्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी जोरदार पलटवार करत चीनवरून काँग्रेस खोटे बोलणे केव्हा बंद करणार, असा सवाल केला आहे. 

जेपी नड्डा यांनी एकामागून एक ट्विट करत, काँग्रेसवर टीका केली आहे. राहुल गांधी महिन्याभराच्या सुट्टीवरून आता परत आले आहेत. तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. राहुल गांधी या प्रश्नांची उत्तरे देतील, अशी अपेक्षा आहे. राहुल गांधी, गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस चीनवरून खोटे बोलणे केव्हा थांबवणार, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अरुणाचल प्रदेशसह हजारो किलोमीटरची जमीन चीनला भेट म्हणून दिली, ही बाब काँग्रेस नाकारणार का, अशी विचारणा जेपी नड्डा यांनी केली आहे. 

काँग्रेस वारंवार चीनसमोर गुघडे का टेकते, असा सवाल करत राहुल गांधींचा चीन आणि कम्युनिस्ट पक्षाशी केलेले करार रद्द करण्याचा काय विचार आहे का, चीनकडून ट्रस्टसाठी मिळालेल्या देणग्या परत करणार का, असे खरमरीत सवाल जेपी नड्डा यांनी विचारले. 

तसेच राहुल गांधी यांनी कोरोना विरोधातील लढाई सुरू असताना देशाला कमीपणा दाखवण्याची एकही संधी सोडली नाही. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. भारतातील शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न करून लस शोधून काढली. राहुल गांधी यांनी शास्त्रज्ञांचे एकदाही अभिनंदन किंवा कौतुक केले नाही, अशी टीका जेपी नड्डा यांनी केली. 

कृषी कायद्याविरोधा शेतकऱ्यांना भडकवणे आणि गैरसमज पसरवणे केव्हा थांबवणार? एपीएमसी सर्व मंडया बंद करणार असल्याचे सांगत राहुल गांधी खोटी माहिती पसरवत आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींवर काँग्रेस सरकारने अंमलबजावणी का केली नाही. विरोधी बाकांवर असतानाच काँग्रेसला शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती का वाटते, काँग्रेस सत्तेत असताना शेतकऱ्यांची प्रगती का झाली नाही, अशी एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती जेपी नड्डा यांनी केली.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाRahul Gandhiराहुल गांधी