शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

काँग्रेस वारंवार चीनसमोर गुडघे का टेकते? जेपी नड्डा यांचा खरमरीत सवाल

By देवेश फडके | Updated: January 19, 2021 14:26 IST

अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात चीनने गाव वसवल्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी जोरदार पलटवार करत चीनवरून काँग्रेस खोटे बोलणे केव्हा बंद करणार, असा सवाल केला आहे. 

ठळक मुद्देजेपी नड्डा यांचे काँग्रेस आणि राहुल गांधींना एकामागून एक तिखट सवालशेतकऱ्यांना भडकवण्याचे काम काँग्रेस करत असल्याचा आरोपचीनकडून मिळालेली देणगी काँग्रेस परत करणार का - जेपी नड्डा

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात चीनने गाव वसवल्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी जोरदार पलटवार करत चीनवरून काँग्रेस खोटे बोलणे केव्हा बंद करणार, असा सवाल केला आहे. 

जेपी नड्डा यांनी एकामागून एक ट्विट करत, काँग्रेसवर टीका केली आहे. राहुल गांधी महिन्याभराच्या सुट्टीवरून आता परत आले आहेत. तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. राहुल गांधी या प्रश्नांची उत्तरे देतील, अशी अपेक्षा आहे. राहुल गांधी, गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस चीनवरून खोटे बोलणे केव्हा थांबवणार, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अरुणाचल प्रदेशसह हजारो किलोमीटरची जमीन चीनला भेट म्हणून दिली, ही बाब काँग्रेस नाकारणार का, अशी विचारणा जेपी नड्डा यांनी केली आहे. 

काँग्रेस वारंवार चीनसमोर गुघडे का टेकते, असा सवाल करत राहुल गांधींचा चीन आणि कम्युनिस्ट पक्षाशी केलेले करार रद्द करण्याचा काय विचार आहे का, चीनकडून ट्रस्टसाठी मिळालेल्या देणग्या परत करणार का, असे खरमरीत सवाल जेपी नड्डा यांनी विचारले. 

तसेच राहुल गांधी यांनी कोरोना विरोधातील लढाई सुरू असताना देशाला कमीपणा दाखवण्याची एकही संधी सोडली नाही. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. भारतातील शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न करून लस शोधून काढली. राहुल गांधी यांनी शास्त्रज्ञांचे एकदाही अभिनंदन किंवा कौतुक केले नाही, अशी टीका जेपी नड्डा यांनी केली. 

कृषी कायद्याविरोधा शेतकऱ्यांना भडकवणे आणि गैरसमज पसरवणे केव्हा थांबवणार? एपीएमसी सर्व मंडया बंद करणार असल्याचे सांगत राहुल गांधी खोटी माहिती पसरवत आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींवर काँग्रेस सरकारने अंमलबजावणी का केली नाही. विरोधी बाकांवर असतानाच काँग्रेसला शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती का वाटते, काँग्रेस सत्तेत असताना शेतकऱ्यांची प्रगती का झाली नाही, अशी एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती जेपी नड्डा यांनी केली.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाRahul Gandhiराहुल गांधी