शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

Assembly Elections 2022: '4 राज्यात भाजपची सत्ता येणार, यूपीमध्ये 300+ जागा जिंकणार';जेपी नड्डांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:08 IST

Assembly Elections 2022: सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत, यात सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशावर लागल्या आहेत.

नवी दिल्ली: सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. यात सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशावर लागल्या आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nadda) यांनी दावा केला आहे की, भाजप पाचपैकी चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल. त्यांच्या मते, सध्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे तेथे सत्ताविरोधी घटक नाही.

न्यूज18इंडियाला दिलेल्या मुलाखतीत जेपी नड्डा म्हणतात की, चार राज्यांमध्ये लाट आमच्या बाजूने आहे. उत्तर प्रदेशात तर भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल. गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान पार पडले असून, यूपीमध्ये चार फेऱ्यांचे मतदान झाले आहे. तर मणिपूरमध्ये दोन्ही टप्प्यात निवडणूक होणे बाकी आहे. निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे.

आम्ही तुष्टीकरणाच्या विरोधात

नड्डा पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालप्रमाणे उत्तर प्रदेशात निकाल येणार नाहीत. भाजपने बंगालमध्ये पक्ष मजबूत केला, पण उत्तर प्रदेशात आधीच पक्ष मजबूत आहे. बंगालमध्ये पक्ष 3 वरुन 77 जागांवर पोहोचल्या, हीदेखील मोठे यश आहे. मुस्लिमांना भाजपची भीती का वाटते, असे विचारले असता नड्डा म्हणाले, आम्ही तुष्टीकरणाच्या विरोधात आहोत. सर्वांचा विकास हेच आमचे ध्येय आहे. जन धन, सौभाग्य आणि उज्ज्वला सर्वांसाठी समान आहेत.

अखिलेशवर निशाणा जेपी नड्डा यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अखिलेश तुष्टीकरणाचे राजकारण करतात. अखिलेश यादव यांची राजकीय समज मर्यादित आहे. त्यांचा दहशतवाद्यांना वाचवण्याचा इतिहास आहे. अखिलेश यांनी बॉम्बस्फोटांचे आरोपी मोकळे केले. सायकलवर मतदान म्हणजे दहशतवाद्यांच्या समर्थकाला मत. समाजवादी पक्षाने नेहमीच संधीसाधू युती केली. 

अखिलेशच्या राजवटीत दंगली झाल्यानड्डा म्हणाले की, योगी आदित्यनाथ जे काही बोलले ते खरे आहे. अखिलेश सरकारच्या काळात 200 दंगली झाल्या. सबका साथ सबका विकास या मंत्रावर आमचा विश्वास आहे. भाजपला मुस्लिमांचाही पाठिंबा मिळेल. व्होट बँकेचे राजकारण हे विरोधकांचे काम आहे, असे ते म्हणाले. तसेच, नड्डा यांनी प्रियांका गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, चांदीचा चमचा घेऊन जन्मलेले लोक गंभीर नसतात, असा टोलाही लगावला.  

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२