पत्रकाराच्या मृत्यूने भाजपची कोंडी?
By Admin | Updated: July 5, 2015 23:36 IST2015-07-05T23:36:35+5:302015-07-05T23:36:35+5:30
टीव्ही पत्रकार अक्षयसिंग यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. अक्षयसिंग यांच्या मृत्यूच्या निमित्ताने विविध मुद्दे उपस्थित झाले असल्यामुळे योग्य तपास करून सर्व प्रकारचा संशय दूर केला जावा.

पत्रकाराच्या मृत्यूने भाजपची कोंडी?
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं) प्रवेश आणि भरती घोटाळ््याच्या मुळाशी जाऊ पाहणाऱ्या दिल्लीच्या टीव्ही टुडे वृत्तवाहिनीचे शोध पत्रकार अक्षयसिंग यांच्या मृत्यूने सत्ताधारी भाजपची कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अक्षय यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, असे मत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केले आहे. पण ही अतिशय धक्कादायक बाब असून या घोटाळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन का बाळगून आहेत, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते आरपीएन सिंग यांनी केला आहे.
शनिवारी मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यात अक्षय यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर ४८ तासांच्या आत याच घोटाळ््याचा तपास करणाऱ्या डॉ.शर्मा यांचा मृत्यू झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. घोटाळ्यात नाव असलेली विद्यार्थिनी निर्माता दामोर हिचा मृतदेह ७ जानेवारी २०१२ रोजी उज्जैन जिल्ह्यात रेल्वे रूळावर आढळून आला होता. दोनच दिवसांपूर्वी ३८ वर्षीय अक्षयसिंग यांनी तिच्या मातापित्याची मुलाखत घेतली होती.
अक्षयसिंग यांच्यावर रविवारी पूर्व दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन, दिग्विजयसिंग, रणदीपसिंग सूर्जेवाला आदी नेते उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
--------------
टीव्ही पत्रकार अक्षयसिंग यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. अक्षयसिंग यांच्या मृत्यूच्या निमित्ताने विविध मुद्दे उपस्थित झाले असल्यामुळे योग्य तपास करून सर्व प्रकारचा संशय दूर केला जावा.
- अर्थमंत्री अरुण जेटली
--------------
मोदींचे मौन धक्कादायक- काँग्रेस
> अक्षयसिंग यांचा मृत्यू एक पत्र लिहून केंद्र सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी करणे ही मुख्यमंत्री चौहान यांच्यासाठी अतिशय साधी बाब आहे. व्यापमं घोटाळा असो की छत्तीसगडमधील तांदूळ घोटाळा.
> राजस्थानमध्ये म्हणा की केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्र्यांबाबत जे घडत आहे ते पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन सोडायला तयार नाहीत. या सर्व घोटाळ्यांना त्यांचा आतून पाठिंबा असल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.