शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी वाचेल पण... केंद्र सरकार कठोर उपाय योजणार; कर्मचाऱ्यांना फायदा की तोटा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 11:56 IST

CoronaVirus : दिवाळी बोनस रोखणे, किमान पगारामध्ये होणारी इन्क्रीमेंट, ओव्हरटाईम पेमेंट रेटमध्ये घट करणे आणि कामाचे तास वाढविण्यासंबंधीत मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन सुरु केले आहे. यामुळे अनेक कंपन्यांचे कंबरडे मोडणार असून मोठ्या प्रमाणावर नोकर कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारनेही धास्ती घेतली असून यावर उपाययोजना करण्यासाठी पाऊले उचलत आहे. यासाठी कंपन्यांना काही नियमांमध्ये मोठी सूट देण्यात येण्याची शक्यता आहे. 

केंद्र सरकार पगार आणि कामाच्या बाबतीत काही नियम ढीले करण्याची शक्यता असल्याचे वृत्त एनबीटीने दिले आहे. यामध्ये दिवाळी बोनस रोखणे, किमान पगारामध्ये होणारी इन्क्रीमेंट, ओव्हरटाईम पेमेंट रेटमध्ये घट करणे आणि कामाचे तास वाढविण्यासंबंधीत मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, हे बदल नोटिफिकेशन किंवा सुधारणा विधेयकाद्वारे केले जाऊ शकतात. कोरोना व्हायरसच्या उपद्रवामुळे आर्थिक संकट ओढवणार आहे. याविरोधात लढण्यासाठी केलेले हे बदल वर्षभर लागू राहण्याची शक्यताही या अधिकाऱ्याने वर्तविली आहे. यामुळे केंद्र सरकारवर कोणतेही अतिरिक्त आर्थिक ओझे राहणार नाही. मात्र, कंपन्यांचा कर्मचाऱ्यांवरील खर्च वाचणार आहे.  

पगारवाढ टाळल्यास कंपन्यांचा पैसा वाचणारपगारवाढ टाळल्यास कंपन्यांचा पैसा वाचणार आहे. पेमेंट ऑफ बोनस अॅक्ट १९६५ नुसार काही श्रेणीच्या कंपन्यांना फायदा किंवा उत्पादनाच्या उत्पादकतेच्या आधारे कर्मचाऱ्यांना वर्षाला ८.३३ टक्क्यांच्या आधारे बोनस देणे बंधनकारक आहे. याशिवाय कंझ्यूमर प्राईस इंडेक्सनुसार कामगारांना मिनिमम वेज वर्षाला ८ ते १२ टक्के वाढ देणेही बंधनकारक असते. सरकारच्या विचानानुसार जर ही वाढ टाळल्यास कंपन्यांचा पैसा वाचेल. 

सरकारला कंपन्यांची काळजी? हे बदल झाल्यास ते संघटीत क्षेत्रातील कंपन्यांना लागू होणार आहेत. देशात ५० कोटी कामगारांपैकी जास्तीतजास्त १० टक्के कामगार या क्षेत्रात मोडतात. मात्र, यामुळे लघु, छोट्या आणि मध्यम कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. इंडियन स्टाफिंग फेडरेशनचे अध्यक्ष लोहित भाटिया यांनी सांगितले की, कायद्यामध्ये छोटे बदल केल्याने सरकारला नोकरी देणाऱ्यांचीच अधिक काळजी असल्याचा संदेश जाऊ शकतो. मात्र, याद्वारे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्याही वाचणार आहेत. 

कामाचे तास वाढणार? सध्याच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना ८ ते ९ तास काम करावे लागते. मात्र, बदल झाल्यास १२ तास काम करावे लागणार आहे. यावर विचार सुरु असून या अतिरिक्त तासाचे पैसे दुप्पट देण्य़ाऐवजी सामान्य पगाराप्रमाणे देण्याबाबत विचार सुरु आहे. 

 

आणखी वाचा...

अमेरिकेने वाळीत टाकले, चीनने WHO साठी अख्खी तिजोरीच खुली केली

सावधान! आता पीएफ अ‍ॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल

मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह

विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात

कोरोनाचे दुष्परिणाम; तब्बल २५ कोटी  बळी जाण्याची भीती 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाjobनोकरी