शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

JNU Attack : जेएनयूवरील हल्ल्यावर काय म्हणाल? लष्करप्रमुखांनी दिले हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 20:41 IST

माजी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जेएनयूवर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये काही दिवसांपूर्वी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह 18 जणांना गंभीर मारहाण करण्यात आली होती. यामुळे देशभरात संतापाचे वातावरण होते. दिल्ली पोलिसांनी मारहाणकर्त्यांऐवजी मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवरच गुन्हे दाखल केले होते. आज देशाचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी जेएनयूबाबत भाष्य केले. 

माजी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जेएनयूवर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. यावर पत्रकारपरिषदेमध्ये नरवणे यांना प्रश्न विचारण्यात आला. जेएनयूच्या नावावर राष्ट्रीय सुरक्षा अकादमी एनडीएची पदवी दिली जाते. त्याच विद्यापीठामध्ये वादंग सुरू आहेत. तेथील विद्यार्थ्यांवर मास्कधारी हल्लेखोरांनी मारहाण केली होती. याविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. एवढे सगळे घडत असताना तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने विचारला. 

यावर नरवणे यांनी सांगितले की, एनडीए देशाची सर्वोत्तम संस्था आहे. मी देखील त्याच एनडीएमधून आलोय ज्या एनडीएमध्ये सध्याचे हवाईदल प्रमुख आणि नौसेना प्रमुख आले आहेत. एनडीच्या कार्यप्रणालीची अनेक उदाहरणे दिली जातात. मात्र नरवणे यांनी जेएनयू हल्ला आणि वादावर बोलणे टाळले. रावत यांनी वाद ओढवून घेतला होता. त्यांना सैन्यदलातूनही विरोध झाला होता. एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याने असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. 

PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले.... 

 संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा संसदीय संकल्प आपण केलेला आहे. पीओकेभारतात आला पाहिजे अशी जर संसदेची इच्छा असेल तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू, असेही नरवणे यांनी म्हटले होते.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानjnu attackजेएनयू