शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

UP Elelction: “कोणतीही डील करून नाही तर देशहितासाठी भाजपमध्ये आलोय”: जितीन प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 14:04 IST

UP Elelction: पुढील काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे (Uttar Pradesh election)  रणशिंग फुंकले जाणार असून, भाजपने आतापासूनच यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली: पुढील काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे (Uttar Pradesh election)  रणशिंग फुंकले जाणार असून, भाजपने आतापासूनच यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये इनकमिंगला सुरुवात झाली असून, जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कोणतीही डील करून नाही तर देशहितासाठी भाजपमध्ये आलोय, असे जितीन प्रसाद यांनी म्हटले आहे. (jitin prasad says that i joined BJP for national interest)

भाजप देशहित आणि पुढील पीढीसाठी काम करत आहे. त्यामुळे मी या देशहिताच्या कार्यात सहभागी झालो आहे. कोणत्याही पदासाठी किंवा स्वार्थासाठी भाजपप्रवेश केला नाही, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. काँग्रेस पक्ष जनतेपासून दूर गेला आहे. जनतेच्या अपेक्षेनुसार काँग्रेस काम करत नाहीए. मी ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो, तेथे काँग्रेसला काहीच महत्त्व राहिलेले नाही, असेही जितीन प्रसाद म्हणाले. 

देशाची अर्थव्यवस्था वाचवण्याचा ‘हाच’ एकमेव उपाय; माजी गव्हर्नरांनी दिला महत्त्वाचा पर्याय

काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला आहे

काँग्रेस पक्षात नेतृत्व बदलाची गरज आहे. गेल्या ६ ते ७ वर्षांमध्ये काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झाली आहे. अनेकदा याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझे कोणीच ऐकून घेतले नाही. काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय कठीण होता. मात्र, आता भाजपमध्ये आलोय, तर पक्ष सांगेल, ती जबाबदारी पार पाडेन, असेही प्रसाद यांनी सांगितले. 

कोरोनाचे मृत्यू लपवले! राज्यात ९,३७५ जणांनी गमावले प्राण; बिहार सरकारची कबुली

सर्वजण टीका करण्यास स्वतंत्र आहेत

जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. यावर बोलताना जितीन प्रसाद म्हणाले की, प्रत्येकाला टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. मी त्यावर भाष्य करू इच्छित नाही. प्रत्येकाची टीका ही प्रसाद म्हणून स्वीकारतो. ज्यांची विचारसरणी लहान आहे, ती तशीच राहणार आहे. मी घेतलेला निर्णय योग्य असून, तो देशहिताचा ठरू शकेल, अशा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला.

ठाकरे सरकार फक्त PR करत ‘बेस्ट सीएम’चे गोडवे गात राहिले; कोरोना मृत्यूवरुन भाजपची टीका

दरम्यान, जितिन प्रसाद यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेस सुस्त पडलेली असताना भाजपने मुख्यमंत्र्यांपासून आमदारांच्या कामाचा आढावा आणि मतदारसंघातील वातावरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथpiyush goyalपीयुष गोयलBJPभाजपा