शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

“श्रीराम एक महापुरुष होते असे मी मानत नाही”; बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 14:24 IST

बिहारच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. यानंतर वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, भाजपने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

नवी दिल्ली: देशातील अनेक पक्षांचे नेते विविध मुद्द्यांवर आपली मते मांडत असतात. मात्र, ती मांडताना अनेकदा वादग्रस्त विधाने केली जातात. बिहारच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. यानंतर वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, भाजपने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. प्रभु श्रीराम हे एक महापुरुष होते असे मी मानत नाही, असे माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. (jitan ram manjhi on lord ram and ramayan controversy bihar bjp leader replied)

मोठा दिलासा! PMC सह ‘या’ २१ बँकांच्या ठेवीदारांना मिळणार ५ लाखांची विमा भरपाई; पाहा, डिटेल्स

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, त्यातच आता वादग्रस्त विधानांची भर पडताना दिसत आहे. मध्य प्रदेशमध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमात रामचरितमानसचा समावेश करण्यावर प्रतिक्रिया देताना बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी हे विधान केले आहे. यानंतर भाजपकडूनही मांझी यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

“आता मला सीमोल्लंघन करावंच लागेल”; मंदा म्हात्रेंनी दिला भाजपला थेट इशारा

श्रीराम एक महापुरुष होते असे मी मानत नाही

प्रभु श्रीराम एक महापुरुष होते असे मी मानत नाही. रामायण हे काल्पनिक आहे. त्यामुळे श्रीरामांचे जीवंत अस्तित्व मान्य करण्यासारखे नाही. मात्र, रामायणातील ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, त्या कालातीत असून शिकण्यासारख्या आहेत, असे मांझी यांनी म्हटले आहे. तसेच रामायणाचा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करणे चांगली बाब आहे. त्यामुळे मुलांना चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील, असेही मांझी म्हणाले. भाजप प्रवक्ते प्रेम रंजन पटेल यांनी याला प्रत्युत्तर दिले असून, रामाचे अस्तित्व कोणीही नाकारू शकत नाही. अयोध्येत रामजन्मभूमीचे प्रमाण पुरातत्व खात्याला मिळाले आहेत. नासानेही रामसेतू मान्य केला आहे. रामाला काल्पनिक मानणाऱ्यांनी रामायणाचा अभ्यास करावा, असे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

Adani ग्रुपच्या मुंद्रा पोर्टवर ३००० किलो ड्रग्ज जप्त; सोशल मीडियावरील चर्चांनंतर दिले स्पष्टीकरण

दरम्यान, उच्च आणि वैद्यकीय शिक्षणातील अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या बदलांबद्दल झालेल्या टीकेला बाजूस सारून सरकारने आता १६ व्या शतकात कवी तुलसीदास यांनी लिहिलेले महाकाव्य ‘रामचरितमानस’ विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेश सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. केशवराव हेडगेवार आणि आणखी एक नेते दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन व कार्य राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भगवान राम यांच्यावरील विषय कला शाखेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची तयारी केली आहे.  

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारण