शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

...म्हणून भारताच्या या भागात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात लोक, आता 105 जोडप्यांनी घेतले 'सात फेरे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 14:48 IST

एका संस्थेने या जोडप्यांना सामाजिक मान्यता देण्याचा विडा उचलला होता. आता यासंस्थेने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या या जोडप्यांना लग्नाच्या बंधनापर्यंत पोहोचवले आहे.  संबंधित संस्था 2017पासून यासाठी प्रयत्न करत होती. (live in relationship)

ठळक मुद्देझारखंडमधील खुंटी येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारे 105 जोडपे आज वैवाहिक बंधनात अडकले. गरीबीमुळे या जोडप्यांची लग्न करण्याची आणि लोकांना भोजन देण्याची परिस्थिती नव्हती. या लग्न सोहळ्याला डीसी आणि एसपींसह सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

रांची -झारखंडमधील (Jharkhand) खुंटी (khunti) येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारे 105 जोडपे (couples ) आज वैवाहिक बंधनात अडकले. गरीबीमुळे या जोडप्यांची लग्न करण्याची आणि लोकांना भोजन देण्याची परिस्थिती नव्हती. समाजाज 'ढुकू' म्हणून या लोकांचा तिरस्कार केला जातो. मात्र, आता हे जोडपे विवाहाच्या बंधनात अडकल्याने त्यांना सामाजिक न्याय मिळाला आहे. राज्यपाल द्रोपदी मुर्मू आणि केंद्रीय सचिव एन एन सिन्हा यांनी या जोडप्यांना आशीर्वाद दिले. या लग्न सोहळ्याला डीसी आणि एसपींसह सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सरना पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. (Jharkhand live in relationship 105 couples in marital bondage in khunti)105 जोडप्यांनी घेतले सात फेरे - एका संस्थेने या जोडप्यांना सामाजिक मान्यता देण्याचा विडा उचलला होता. आता यासंस्थेने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या या जोडप्यांना लग्नाच्या बंधनापर्यंत पोहोचवले आहे.  संबंधित संस्था 2017पासून यासाठी प्रयत्न करत होती.

बोंबला! शाळेऐवजी घरातच अभ्यास व्हावा म्हणून विद्यार्थ्यानं शिक्षिकेशीच बांधली लग्नगाठ; लोक म्हणाले....

...म्हणून येथील लोकांवर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याची येते वेळ -येथील लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. हे लोक लग्न आणि लग्नाचे भोजनही देऊ शकत नाहीत. यामुळे या लोकांवर लिव्ह इनमध्ये राहण्याची वेळ येते. यामुळे या लोकांना ढुकू म्हणून संबोधले जाते. सामाजिक कार्यक्रमांत भाग घेण्याचा त्यांचा अधिकारही काढून घेतला जातो. तसेच या लोकांना नेहमीच टोमणे ऐकावे लागतात. दहावीची परीक्षा देण्यासाठी युवती घरातून बाहेर पडली अन् प्रियकरासोबत लग्न करून घरी परतलीसरकारी सुविधांपासून राहावे लागते वंचित -लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या दोघांनाच नाही, तर त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांनाही समाज्याच्या तिरस्काराचा सामना करावा लागतो. तसेच सरकारी योजना, जसे विधवा पेन्शन, आधार कार्ड, राशन कार्ड तयार करण्यातही या समाजातील लोकांना प्रचंड त्रास होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून संबंधित संस्थेने यांचे आयुष्य अधिक चांगले करण्यासाठी त्यांच्या सामूहिक विवाहाचे आयोजन केले. यावेळी राज्यपालांनी स्वतःच, या लोकांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. 

 

टॅग्स :Jharkhandझारखंडmarriageलग्न