शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

झारखंड निवडणूक: 2024 पर्यंत देशातील घुसखोरांना बाहेर काढणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 08:01 IST

२०२४ पर्यंत देशभरात एनआरसी लागू केली जाणार आहे.

रांची - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनआरसीबाबत मोठं विधान केलं आहे. २०२४ पर्यंत संपूर्ण देशात एनआरसी लागू करण्याची मर्यादा आखून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांपर्यत देशातील घुसखोरांना देशाच्या बाहेर काढलं जाईल. देशहितासाठी जे असेल त्यावर विरोधकांनी कितीही टीका केली तरी त्या योजना प्रत्यक्षात आणणार असल्याचंही स्पष्टीकरण अमित शहांनी दिलं. 

अमित शहा यांनी सोमवारी संध्याकाळी झारखंडमधील चक्रधरपुर आणि बहारगोडा याठिकाणी निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, २०२४ पर्यंत देशभरात एनआरसी लागू केली जाणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी घुसखोरांची ओळख पटेल. त्यांना देशाबाहेर काढलं जाईल तसेच राहुल गांधी सांगतात की, त्यांना बाहेर काढू नका, ते कुठे जाणार, काय खाणार? मात्र तरीही २०२४ पर्यंत अवैधरित्या भारतात राहणाऱ्यांना बाहेर काढलं जाईल असं मी ग्वाही देतो असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत दहशतवादी, नक्षलवादी यांना उखडून टाकणे आणि अयोध्या येथे राम मंदिराचं भव्य निर्माण करणं हे झारखंड निवडणुकीच्या प्रचारात इतकं महत्त्वाचं आहे जितकं विकास आणि स्थानिक मुद्दे आहेत. राम मंदिराच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टात अनेकदा काँग्रेसने बाधा आणली. काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, राम मंदिर सुनावणीची गरज नाही. मात्र आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सांगितले की, हा लोकांच्या भावनेचा विषय आहे. ही सुनावणी पुढे जायला हवी. त्यामुळे सुप्रीम कोर्टात राम मंदिराबाबत नियमित सुनावणी घेण्यात आली. त्याचा निकाल आज सर्व देशाच्या पुढे आला आहे असंही अमित शहांनी सांगितले. 

दरम्यान, जेएमएम-काँग्रेस-आरजेडी आघाडीवर निशाणा साधताना अमित शहा म्हणाले की, भाजपा नेत्यांनी, राज्य सरकारने नक्षलवाद्यांना उखडून फेकून विकास केला त्याचं श्रेय त्यांना द्यायला हवं. ज्यावेळी काँग्रेस सत्तेत होती त्यावेळी झारखंड राज्याची मागणी केली जात होती. तेव्हा विद्यार्थ्यांवर गोळीबार आणि लाठीचार्ज करण्याचं काम काँग्रेसने केले असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केला.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाterroristदहशतवादीNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीnaxaliteनक्षलवादीjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019