शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

झारखंड निवडणूक: 2024 पर्यंत देशातील घुसखोरांना बाहेर काढणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 08:01 IST

२०२४ पर्यंत देशभरात एनआरसी लागू केली जाणार आहे.

रांची - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनआरसीबाबत मोठं विधान केलं आहे. २०२४ पर्यंत संपूर्ण देशात एनआरसी लागू करण्याची मर्यादा आखून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांपर्यत देशातील घुसखोरांना देशाच्या बाहेर काढलं जाईल. देशहितासाठी जे असेल त्यावर विरोधकांनी कितीही टीका केली तरी त्या योजना प्रत्यक्षात आणणार असल्याचंही स्पष्टीकरण अमित शहांनी दिलं. 

अमित शहा यांनी सोमवारी संध्याकाळी झारखंडमधील चक्रधरपुर आणि बहारगोडा याठिकाणी निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, २०२४ पर्यंत देशभरात एनआरसी लागू केली जाणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी घुसखोरांची ओळख पटेल. त्यांना देशाबाहेर काढलं जाईल तसेच राहुल गांधी सांगतात की, त्यांना बाहेर काढू नका, ते कुठे जाणार, काय खाणार? मात्र तरीही २०२४ पर्यंत अवैधरित्या भारतात राहणाऱ्यांना बाहेर काढलं जाईल असं मी ग्वाही देतो असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत दहशतवादी, नक्षलवादी यांना उखडून टाकणे आणि अयोध्या येथे राम मंदिराचं भव्य निर्माण करणं हे झारखंड निवडणुकीच्या प्रचारात इतकं महत्त्वाचं आहे जितकं विकास आणि स्थानिक मुद्दे आहेत. राम मंदिराच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टात अनेकदा काँग्रेसने बाधा आणली. काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, राम मंदिर सुनावणीची गरज नाही. मात्र आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सांगितले की, हा लोकांच्या भावनेचा विषय आहे. ही सुनावणी पुढे जायला हवी. त्यामुळे सुप्रीम कोर्टात राम मंदिराबाबत नियमित सुनावणी घेण्यात आली. त्याचा निकाल आज सर्व देशाच्या पुढे आला आहे असंही अमित शहांनी सांगितले. 

दरम्यान, जेएमएम-काँग्रेस-आरजेडी आघाडीवर निशाणा साधताना अमित शहा म्हणाले की, भाजपा नेत्यांनी, राज्य सरकारने नक्षलवाद्यांना उखडून फेकून विकास केला त्याचं श्रेय त्यांना द्यायला हवं. ज्यावेळी काँग्रेस सत्तेत होती त्यावेळी झारखंड राज्याची मागणी केली जात होती. तेव्हा विद्यार्थ्यांवर गोळीबार आणि लाठीचार्ज करण्याचं काम काँग्रेसने केले असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केला.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाterroristदहशतवादीNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीnaxaliteनक्षलवादीjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019