शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

झारखंड निवडणूक: 2024 पर्यंत देशातील घुसखोरांना बाहेर काढणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 08:01 IST

२०२४ पर्यंत देशभरात एनआरसी लागू केली जाणार आहे.

रांची - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनआरसीबाबत मोठं विधान केलं आहे. २०२४ पर्यंत संपूर्ण देशात एनआरसी लागू करण्याची मर्यादा आखून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांपर्यत देशातील घुसखोरांना देशाच्या बाहेर काढलं जाईल. देशहितासाठी जे असेल त्यावर विरोधकांनी कितीही टीका केली तरी त्या योजना प्रत्यक्षात आणणार असल्याचंही स्पष्टीकरण अमित शहांनी दिलं. 

अमित शहा यांनी सोमवारी संध्याकाळी झारखंडमधील चक्रधरपुर आणि बहारगोडा याठिकाणी निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, २०२४ पर्यंत देशभरात एनआरसी लागू केली जाणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी घुसखोरांची ओळख पटेल. त्यांना देशाबाहेर काढलं जाईल तसेच राहुल गांधी सांगतात की, त्यांना बाहेर काढू नका, ते कुठे जाणार, काय खाणार? मात्र तरीही २०२४ पर्यंत अवैधरित्या भारतात राहणाऱ्यांना बाहेर काढलं जाईल असं मी ग्वाही देतो असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत दहशतवादी, नक्षलवादी यांना उखडून टाकणे आणि अयोध्या येथे राम मंदिराचं भव्य निर्माण करणं हे झारखंड निवडणुकीच्या प्रचारात इतकं महत्त्वाचं आहे जितकं विकास आणि स्थानिक मुद्दे आहेत. राम मंदिराच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टात अनेकदा काँग्रेसने बाधा आणली. काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, राम मंदिर सुनावणीची गरज नाही. मात्र आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सांगितले की, हा लोकांच्या भावनेचा विषय आहे. ही सुनावणी पुढे जायला हवी. त्यामुळे सुप्रीम कोर्टात राम मंदिराबाबत नियमित सुनावणी घेण्यात आली. त्याचा निकाल आज सर्व देशाच्या पुढे आला आहे असंही अमित शहांनी सांगितले. 

दरम्यान, जेएमएम-काँग्रेस-आरजेडी आघाडीवर निशाणा साधताना अमित शहा म्हणाले की, भाजपा नेत्यांनी, राज्य सरकारने नक्षलवाद्यांना उखडून फेकून विकास केला त्याचं श्रेय त्यांना द्यायला हवं. ज्यावेळी काँग्रेस सत्तेत होती त्यावेळी झारखंड राज्याची मागणी केली जात होती. तेव्हा विद्यार्थ्यांवर गोळीबार आणि लाठीचार्ज करण्याचं काम काँग्रेसने केले असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केला.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाterroristदहशतवादीNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीnaxaliteनक्षलवादीjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019