शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Jharkhand Assembly Elections 2019: भाजपाकडून जाहीरनामा प्रसिद्ध; जनतेला दिली 'ही' आश्वासनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 16:22 IST

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

रांचीः झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याला भाजपानं संकल्पपत्र असं नाव दिलं आहे. मुख्यमंत्री रघुवर दास, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि अर्जुन मुंडा यांच्या उपस्थितीत भाजपानं संकल्पपत्र जारी केलं आहे. या संकल्पपत्रात मुलींना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसेच महिलांना नोकरीमध्ये 33 टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे. 2022पर्यंत प्रत्येक गरिबाला सरकार घर देणार आहे. शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देणार आहे.  2022पर्यंत 70 नवी एकलव्य विद्यालयं उघडण्यात येणार असून, विद्यालयांची संख्या दुप्पट होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन मेगा कौशल्य केंद्र उघडली जाणार असून, आयटीआय उघडण्याचं आश्वासन दिलं आहे. कृषी उद्योगाच्या विकासाला चालना देण्यात येणार आहे. ज्ञान आणि कौशल्यावर आधारित कृषी क्षेत्राचा विस्तार होणार आहे. झारखंडमध्येही दुग्ध उत्पादनालाही चालना देण्यात येणार आहे. तसेच राज्यात स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांना पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे. तसेच एँटी ट्रॅफिकिंग पोलीस युनिटचीही स्थापना होणार असून, 2024पर्यंत 22 हजार किमीचे नवे मार्ग बनवण्याचा भाजपाचा संकल्प आहे. 'हो' भाषा समृद्ध करण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहे. संकल्प पत्र जारी केल्यानंतर सीएम रघुवर दास झारखंडला नव्या उंचीवर नेण्यासाठी भाजपा प्रयत्नशील राहणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यात मजबूत सरकार देणं गरजेचं आहे. गेल्या पाच वर्षांत सर्वांचा विकास झाला आहे. यापुढेही विकास होत राहील, राज्यातील सरकारवर एकही भ्रष्टाचारा आरोप नाही, असंही रघुवर दास म्हणाले आहेत.   

टॅग्स :BJPभाजपाjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019