शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 11:50 IST

आधी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता वेगळीच माहिती समोर येत आहेत.

उत्तर प्रदेशातील झाशी येथील मेडिकल कॉलेजच्या चाईल्ड वॉर्डमध्ये शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत १० मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या कालावधीत १६ मुलं गंभीर जखमी झाली. आधी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता वेगळीच माहिती समोर येत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, एका नर्सने ऑक्सिजन सिलिंडरच्या पाईपला जोडण्यासाठी माचिसची काडी पेटवली आणि आग लागली. यानंतर संपूर्ण वॉर्डने पेट घेतला.

झाशीच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, एनआयसीयू वॉर्डमध्ये ५४ मुलांना दाखल करण्यात आलं होतं, अचानक ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटरला आग लागली ज्यामुळे ऑक्सिजनने भरलेल्या एनआयसीयू वॉर्डमध्ये आग पसरली. झाशी विभागाचे डीआयजी म्हणाले की, आग पूर्णपणे आटोक्यात आली असून जखमींना हलवण्याचं काम सुरू आहे. सीएम योगी यांनी या घटनेची दखल घेत १२ तासांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हमीरपूरचे रहिवासी भगवान दास यांच्या मुलाला झाशीच्या राणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल आग लागली तेव्हा भगवान दास वॉर्डमध्ये उपस्थित होते. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट हे कारण सांगितलं जात असलं तरी भगवान दास हा या घटनेचे एकमेव प्रत्यक्षदर्शी असून यामागचं खरं कारण सांगत आहे.

भगवान दास यांच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या वॉर्डमध्ये ऑक्सिजन सिलेंडरच्या पाईपला जोडण्यासाठी नर्सने माचिसची काडी पेटवली. त्यानंतर आग लागली आणि संपूर्ण वॉर्ड पेटला. आग लागल्याचं लक्षात येताच भगवान दास यांनी त्यांच्या गळ्यात असलेला कपडा घेतला आणि ३ ते ४ मुलांना वाचवलं, इतर लोकांच्या मदतीने आणखी काही मुलंही वाचली.

धक्कादायक बाब म्हणजे आग लागल्यानंतर ना फायर अलार्म वाजला, ना वॉर्डात ठेवलेल्या सिलिंडरचा काही उपयोग झाला. सिलिंडर फिलिंग डेट २०१९ आहे आणि एक्सपायरी डेट २०२० आहे. म्हणजे अग्निशमन यंत्राची मुदत संपून अनेक वर्षे लोटली होती आणि हे सिलिंडर नुसते दाखवण्यासाठी येथे ठेवण्यात आले होते.

"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो

१० चिमुकल्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर ३७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आगीमुळे रुग्णालयात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांनी आपली मुलं गमावली. आज तकशी बोलताना एका लहान मुलाचे वडील कुलदीप यांनी टाहो फोडला. त्यांनी सांगितलं की, माझा मुलगा ७-८ तासांपासून बेपत्ता होता. मदतीच्या नावाखाली आजपर्यंत एकही अधिकारी भेटायला आलेला नाही. ही दुर्घटना घडली त्यावेळी वॉर्डमध्ये जवळपास ५० मुलं होती. आग लागल्यावर ज्यांची मुलं होती ते थेट आत घुसले आणि त्यांनीच आपल्या मुलांना वाचवलं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटलfireआग