शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
3
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
4
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
5
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
6
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
7
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
8
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
9
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
10
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
11
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
12
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
13
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
14
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
15
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
16
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
17
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
18
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
19
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
20
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?

भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 11:50 IST

आधी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता वेगळीच माहिती समोर येत आहेत.

उत्तर प्रदेशातील झाशी येथील मेडिकल कॉलेजच्या चाईल्ड वॉर्डमध्ये शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत १० मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या कालावधीत १६ मुलं गंभीर जखमी झाली. आधी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता वेगळीच माहिती समोर येत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, एका नर्सने ऑक्सिजन सिलिंडरच्या पाईपला जोडण्यासाठी माचिसची काडी पेटवली आणि आग लागली. यानंतर संपूर्ण वॉर्डने पेट घेतला.

झाशीच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, एनआयसीयू वॉर्डमध्ये ५४ मुलांना दाखल करण्यात आलं होतं, अचानक ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटरला आग लागली ज्यामुळे ऑक्सिजनने भरलेल्या एनआयसीयू वॉर्डमध्ये आग पसरली. झाशी विभागाचे डीआयजी म्हणाले की, आग पूर्णपणे आटोक्यात आली असून जखमींना हलवण्याचं काम सुरू आहे. सीएम योगी यांनी या घटनेची दखल घेत १२ तासांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हमीरपूरचे रहिवासी भगवान दास यांच्या मुलाला झाशीच्या राणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल आग लागली तेव्हा भगवान दास वॉर्डमध्ये उपस्थित होते. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट हे कारण सांगितलं जात असलं तरी भगवान दास हा या घटनेचे एकमेव प्रत्यक्षदर्शी असून यामागचं खरं कारण सांगत आहे.

भगवान दास यांच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या वॉर्डमध्ये ऑक्सिजन सिलेंडरच्या पाईपला जोडण्यासाठी नर्सने माचिसची काडी पेटवली. त्यानंतर आग लागली आणि संपूर्ण वॉर्ड पेटला. आग लागल्याचं लक्षात येताच भगवान दास यांनी त्यांच्या गळ्यात असलेला कपडा घेतला आणि ३ ते ४ मुलांना वाचवलं, इतर लोकांच्या मदतीने आणखी काही मुलंही वाचली.

धक्कादायक बाब म्हणजे आग लागल्यानंतर ना फायर अलार्म वाजला, ना वॉर्डात ठेवलेल्या सिलिंडरचा काही उपयोग झाला. सिलिंडर फिलिंग डेट २०१९ आहे आणि एक्सपायरी डेट २०२० आहे. म्हणजे अग्निशमन यंत्राची मुदत संपून अनेक वर्षे लोटली होती आणि हे सिलिंडर नुसते दाखवण्यासाठी येथे ठेवण्यात आले होते.

"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो

१० चिमुकल्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर ३७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आगीमुळे रुग्णालयात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांनी आपली मुलं गमावली. आज तकशी बोलताना एका लहान मुलाचे वडील कुलदीप यांनी टाहो फोडला. त्यांनी सांगितलं की, माझा मुलगा ७-८ तासांपासून बेपत्ता होता. मदतीच्या नावाखाली आजपर्यंत एकही अधिकारी भेटायला आलेला नाही. ही दुर्घटना घडली त्यावेळी वॉर्डमध्ये जवळपास ५० मुलं होती. आग लागल्यावर ज्यांची मुलं होती ते थेट आत घुसले आणि त्यांनीच आपल्या मुलांना वाचवलं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटलfireआग