शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत जदयूची बैठक सुरू, नितिशकुमारांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 18:25 IST

जदयू पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार आज दिल्लीतील राष्ट्रीय कारणीच्या बैठकीला संबोधित करणार आहेत. आगामी 2019 मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अतिशय महत्व आहे.

नवी दिल्ली - जदयू पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार आज दिल्लीतील राष्ट्रीय कारणीच्या बैठकीला संबोधित  करत आहेत. आगामी 2019 मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अतिशय महत्व आहे. याच बैठकीत लोकसभा निवडणुकांसाठी नितिशकुमारांकडून जयदूची रणनीती आखण्यात येईल. तर भाजपसोबत सुरु असलेल्या अंतर्गत कलहामुळेही या बैठकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

जदयूचे सुप्रिमो नितिशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांना सोडचिठ्ठी देऊन भाजपशी संसार थाटला. भाजपनेही जदयूला पाठिंबा देत नितिशकुमार यांना मुख्यमंत्री केले. मात्र, लवकरच या संसाराचा काडीमोड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एनडीए आघाडीत जागावाटपावरुन नितिशकुमारांचे बिनसले असल्याची माहिती आहे. त्यामुळेच नितिशकुमार पुन्हा काँग्रेस आणि राजदशी आघाडी करतील असाही अंदाज लावला जात आहे. मात्र, जदयूतील वरिष्ठ नेत्यांनी हे वृत्त फेटाळले आहे. शनिवारी नितिशकुमार आणि जदयू नेत्यांच्या झालेल्या बैठकीत बिहारमध्ये एनडीएचा प्रमुख चेहरा नितिशकुमार हेच असतील, असे ठामपणे सांगण्यात आले. तसेच जदयू मोठ्या भावाची भूमिका निभावेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जदयूच्या आज दिल्लीत होत असलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीवर सर्वांच्या नजरा लागून लागल्या आहेत. तर जदयूचा प्रस्ताव भाजप मान्य करणार का ? भाजप आणि जदयूचे लोकसभा निवडणुकांतील जागावाटपासाठी एकमत होणार का हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार