शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांमागे काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर, भाजपा-जेडीयूचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 14:16 IST

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून राजकारणालाही तोंड फुटले असून, या हल्ल्यांसाठी काँग्रेसला जबाबदार धरत जेडीयूने राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. तर काँग्रेसने या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे उत्तर मागितले आहे. 

अहमदाबाद - गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसक रूप घेतले असून, स्थानिकांकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे हजारो उत्तर भारतीयांनी पलायन केले आहे. आता गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून राजकारणालाही तोंड फुटले असून, या हल्ल्यांसाठी काँग्रेसला जबाबदार धरत जेडीयूने राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. तर काँग्रेसने या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे उत्तर मागितले आहे. बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडने गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खुले पत्र लिहिले असून, या हल्ल्ल्यांसाठी काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या मनात बिहारील नागरिकांविषयी एवढा द्वेष का आहे, असा सवाल जेडीयूने या पत्रामधून केला आहे. भाजपानेही या हिंसाचारासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.  काँग्रेस एका रणनीतीनुसार ठरवून हिंसाचार घडवत असून, काँग्रेसचे नेते देशाचे विभाजन करण्याच्या कार्यात गुंतले आहेत. गुजरातमधील हिंसाचार हा अल्पेश ठाकोर यांची सेना करत आहे, असा आरोप भाजपा नेते गिरिराज सिंह यांनी केला आहे. मात्र ठाकोर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.  मात्र या हिंसाचाराप्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच सवाल केला आहे. गुजरातमध्ये होत असलेल्या हिंसाचाराकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसचे उत्तर प्रदेश अध्यक्ष राज बब्बर यांनी या हिंसाचारावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.   28 सप्टेंबर रोजी एका बिहारी मजुराने  14 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये आंदोलनांना सुरुवात झाली.  त्यातून उत्तर भारतीयांवर हल्ले होत असून, अनेक उत्तर भारतीय कुटुंबांनी राज्यातून पलायन केले आहे. उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत 42 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 342 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी दिली आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस