शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

“पंतप्रधान होण्याचे तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही”; JDUचा राहुल गांधींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 16:39 IST

Congress Vs JDU: राजकारणात काहीतरी साध्य करण्यासाठी खोट्या विधानांचा आधार घेऊ नका. तुमच्या विनोदांमुळे देशाचे केवळ मनोरंजन होत राहील, असा पलटवार जदयूने केला आहे.

Congress Vs JDU: ममता बॅनर्जी यांच्यानंतर आम आदमी पक्षासह जदयूने इंडिया आघाडीपासून फारकत घेतली. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडत थेट भाजपासोबत जाऊन सत्तांतर घडवले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली. राहुल गांधींनी केलेल्या टीकेवर जदयू नेत्यांनी पलटवार केला आहे. 

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगाल, बिहारमध्ये आहे. बिहारमधील शेतकरी आर्थिक अन्यायाचे बळी पडत आहेत. आम्ही त्यांच्या हितासाठी लढत राहू. नितीश कुमार थोडाही दबाव सहन करू शकत नाहीत. ते लगेचच घुमजाव करतात. दबाव आला की पारडे बदलतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. याला आता जदयू नेते ललन सिंह यांनी उत्तर दिले आहे.

पंतप्रधान होण्याचे तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही

तुमच्या दबावाखाली बिहारमध्ये जातिनिहाय जनगणना करण्यात आली, असे तुम्ही म्हणता. इतके मोठे खोटे कुणी बोलू शकत नाही. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, नितीश कुमार कधीही कोणत्याही दबावाखाली काम करत नाहीत. जातिनिहाय जनगणना हा नितीश कुमार यांचा निर्धार होता. जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा नितीश कुमार यांनी व्ही.पी.सिंह यांच्या कार्यकाळात मांडला होता. तेव्हा तर तुमचा राजकीय उदयही झाला नव्हता. असत्याचा आधार कायम घेत राहिलात तर पंतप्रधान होण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. तुम्ही पप्पू आहात आणि पप्पू राहाल. तुमच्या विनोदांमुळे देशाचे केवळ मनोरंजन होत राहील, या शब्दांत ललन सिंह यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, इंडिया आघाडीच्या बंगळुरू आणि मुंबईतील बैठकीत जदयू पक्षाने ठराव मंजूर करायला सांगितला गेला, तेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध केला. तेव्हा तुम्ही गप्प राहून त्यांना पाठिंबा दिला. देशाच्या राजकारणात काहीतरी साध्य करण्यासाठी खोट्या विधानांचा आधार घेऊ नका. यामुळेच तुमचा काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस अधिकाधिक ढासळत चालला आहे, अशी टीकाही ललन सिंह यांनी केली. 

टॅग्स :Janta Dal Unitedजनता दल युनायटेडBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारRahul Gandhiराहुल गांधी