शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

२२ वरून १७ जागांवर घसरली भाजपाची गाडी, शिवसेनेला आयतीच सापडली नाडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 12:12 IST

बिहारमध्ये झालेलं हे जागावाटप पाहता, भाजपाच्या नाडीचे वाढलेले ठोके ओळखून त्यांच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न शिवसेना करू शकते.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील सत्ता गमावल्यानंतर भाजपाचे आकाशात उडणारे 'तारे जमीं पर' येऊ लागल्याचं चित्र आहे. 'हम हम है, बाकी पानी कम है'च्या थाटात वावरणारी, मित्रांनाही दोन हात लांबच ठेवणारी मंडळी या मित्रांच्या हातात हात देताना दिसत आहेत. बिहारमध्ये एनडीएची झालेली बैठक आणि त्यात ठरलेला जागावाटपाचा फॉर्म्युला हा त्याचंच द्योतक म्हणावा लागेल. बिहारमधील ४० लोकसभा जागांपैकी भाजपा आणि जेडीयू प्रत्येकी १७ जागा लढवणार आहेत, तर रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला (एलजेपी) सहा जागांची 'लॉटरी' लागली आहे. त्यासोबतच, त्यांना राज्यसभेची जागा देण्याचंही भाजपानं मान्य केलंय. हा फॉर्म्युला पाहता, पाच राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपाच्या मित्रांची 'बार्गेनिंग पॉवर' वाढल्याचं स्पष्ट दिसतंय. स्वाभाविकच, भाजपाचा सगळ्यात जुना मित्र असलेल्या शिवसेनेसाठी ही सुवर्णसंधीच मानली जातेय. 

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपानं २२ जागा जिंकल्या होत्या. नरेंद्र मोदींची लाट असूनही भाजपाला बिहारमध्ये ३० टक्क्यांहून कमी मतं मिळाली होती. हे गणित लक्षात घेता, यावेळची निवडणूक स्वबळावर लढणं भाजपासाठी धोक्याचं ठरलं असतं. कारण, यावेळी माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी वेगळी वाट धरली आहे. तसंच, तीन राज्यांमधील पराभवामुळे काँग्रेसला नवं बळ मिळालंय आणि महाआघाडीची घडी बसवण्याच्या प्रयत्नांनाही वेग आलाय. अशावेळी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांची साथ भाजपासाठी महत्त्वाची होती. म्हणूनच, पाच जागा कमी लढू, पण एकत्र लढू, असा सावध पवित्रा त्यांनी घेतला आहे. २००९च्या निवडणुकीत देशभरात काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं होतं; तेव्हा बिहारमध्ये भाजपा-जेडीयू जोडीनं ४० पैकी ३२ जागा जिंकण्याची किमया केली होती. तसाच चमत्कार मोदी - अमित शहा जोडीला यावेळीही अपेक्षित आहे आणि त्यासाठी ते दोन पावलं मागे यायलाही तयार झाल्याचं दिसतंय. 

बिहारमध्ये झालेलं हे जागावाटप पाहता, भाजपाच्या नाडीचे वाढलेले ठोके ओळखून त्यांच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न शिवसेना करू शकते. भाजपा-शिवसेना युतीतील वाद, कुरघोडी, शाब्दिक चकमकी रोज सुरू आहेत. शिवसेनेनं स्वबळाचा नाराही दिला आहे. तरीही, युती होणारच, शिवसेना आमच्यासोबत येईलच, असा विश्वास भाजपाश्रेष्ठी व्यक्त करताहेत. युतीसाठी काही फॉर्म्युले तयार केल्याचं सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह'मध्ये केलं होतं. दुसरीकडे, लोकसभा आणि विधानसभेचा फॉर्म्युला एकत्र ठरवला, तर युतीचा विचार करण्यास शिवसेना तयार असल्याचं समजतंय. आता 'बिहार फॉर्म्युल्या'च्या आधारे ते 'मोठ्या भावा'ला कसं खिंडीत गाठतात, हे पाहावं लागेल. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहShiv Senaशिवसेना