शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

२२ वरून १७ जागांवर घसरली भाजपाची गाडी, शिवसेनेला आयतीच सापडली नाडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 12:12 IST

बिहारमध्ये झालेलं हे जागावाटप पाहता, भाजपाच्या नाडीचे वाढलेले ठोके ओळखून त्यांच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न शिवसेना करू शकते.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील सत्ता गमावल्यानंतर भाजपाचे आकाशात उडणारे 'तारे जमीं पर' येऊ लागल्याचं चित्र आहे. 'हम हम है, बाकी पानी कम है'च्या थाटात वावरणारी, मित्रांनाही दोन हात लांबच ठेवणारी मंडळी या मित्रांच्या हातात हात देताना दिसत आहेत. बिहारमध्ये एनडीएची झालेली बैठक आणि त्यात ठरलेला जागावाटपाचा फॉर्म्युला हा त्याचंच द्योतक म्हणावा लागेल. बिहारमधील ४० लोकसभा जागांपैकी भाजपा आणि जेडीयू प्रत्येकी १७ जागा लढवणार आहेत, तर रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला (एलजेपी) सहा जागांची 'लॉटरी' लागली आहे. त्यासोबतच, त्यांना राज्यसभेची जागा देण्याचंही भाजपानं मान्य केलंय. हा फॉर्म्युला पाहता, पाच राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपाच्या मित्रांची 'बार्गेनिंग पॉवर' वाढल्याचं स्पष्ट दिसतंय. स्वाभाविकच, भाजपाचा सगळ्यात जुना मित्र असलेल्या शिवसेनेसाठी ही सुवर्णसंधीच मानली जातेय. 

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपानं २२ जागा जिंकल्या होत्या. नरेंद्र मोदींची लाट असूनही भाजपाला बिहारमध्ये ३० टक्क्यांहून कमी मतं मिळाली होती. हे गणित लक्षात घेता, यावेळची निवडणूक स्वबळावर लढणं भाजपासाठी धोक्याचं ठरलं असतं. कारण, यावेळी माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी वेगळी वाट धरली आहे. तसंच, तीन राज्यांमधील पराभवामुळे काँग्रेसला नवं बळ मिळालंय आणि महाआघाडीची घडी बसवण्याच्या प्रयत्नांनाही वेग आलाय. अशावेळी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांची साथ भाजपासाठी महत्त्वाची होती. म्हणूनच, पाच जागा कमी लढू, पण एकत्र लढू, असा सावध पवित्रा त्यांनी घेतला आहे. २००९च्या निवडणुकीत देशभरात काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं होतं; तेव्हा बिहारमध्ये भाजपा-जेडीयू जोडीनं ४० पैकी ३२ जागा जिंकण्याची किमया केली होती. तसाच चमत्कार मोदी - अमित शहा जोडीला यावेळीही अपेक्षित आहे आणि त्यासाठी ते दोन पावलं मागे यायलाही तयार झाल्याचं दिसतंय. 

बिहारमध्ये झालेलं हे जागावाटप पाहता, भाजपाच्या नाडीचे वाढलेले ठोके ओळखून त्यांच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न शिवसेना करू शकते. भाजपा-शिवसेना युतीतील वाद, कुरघोडी, शाब्दिक चकमकी रोज सुरू आहेत. शिवसेनेनं स्वबळाचा नाराही दिला आहे. तरीही, युती होणारच, शिवसेना आमच्यासोबत येईलच, असा विश्वास भाजपाश्रेष्ठी व्यक्त करताहेत. युतीसाठी काही फॉर्म्युले तयार केल्याचं सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह'मध्ये केलं होतं. दुसरीकडे, लोकसभा आणि विधानसभेचा फॉर्म्युला एकत्र ठरवला, तर युतीचा विचार करण्यास शिवसेना तयार असल्याचं समजतंय. आता 'बिहार फॉर्म्युल्या'च्या आधारे ते 'मोठ्या भावा'ला कसं खिंडीत गाठतात, हे पाहावं लागेल. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहShiv Senaशिवसेना